शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

कापसाच्या अत्यल्प भावामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याने माहुरचे शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 18:59 IST

श्रीक्षेत्र माहूर ( नांदेड ) : माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतक-यांना मजुरासाठी शोधाशोध करावी ...

ठळक मुद्देएकरी कापसाच्या पिकाला वेचण्यापर्यंतचा खर्च अंदाजे २५ हजार रुपयांच्या आसपास आहे़यात उत्पादन ५ ते ७ क्विंटल होत असते़ मात्र सध्या प्रतिक्विंटल ४३५० ते ४४०० इतका कापसाला दर मिळत आहे़

श्रीक्षेत्र माहूर ( नांदेड ) : माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतक-यांना मजुरासाठी शोधाशोध करावी लागत आहे़ अशातच शासनाने कापसाला जाहीर केलेला हमीभाव अत्यंत कमी व खाजगी व्यापारीही अल्पदर देत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़

एकरी कापसाच्या पिकाला वेचण्यापर्यंतचा खर्च अंदाजे २५ हजार रुपयांच्या आसपास आहे़ यात उत्पादन ५ ते ७ क्विंटल होत असते़ मात्र सध्या प्रतिक्विंटल ४३५० ते ४४०० इतका कापसाला दर मिळत आहे़ याची आकडेवारी काढली तर शेतक-याच्या हाती काहीच लागत नाही़ त्यामुळे शेतकरी संतापला असून कापसाला कमीत कमी ५ हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी होत आहे़

मजुरांचा अभावमाहूर तालुक्यातील ग्रामीण भागात मजुरांचा अभाव असल्यामुळे बाहेर गावातून कापूस वेचणीसाठी मजूर आणावे लागत आहेत़ त्यांना प्रती ७ रुपये किलो दराने भाव द्यावा लागत आहे़ मजुरांना आणणाºया गाडीच्या खर्चाचा अधिकचा भर पडत असल्याने पुढील वर्षी कापसाचे पीक घ्यावे की नाही या विवंचनेत शेतकरी सापडला आहे़

वन्यप्राण्यांचा हैदोसएकीकडे आस्मानी संकटांना तोंड द्यावे लागत असताना वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेतकºयांना हैराण केले आहे़ रोही, डुक्कर, हरीण हे वन्यप्राणी कापूस पिकाला जमीनदोस्त करीत आहेत़ त्यामुळे उभे पीक खाली पाडून नासधूस करीत असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे़

दलाल सक्रीयशेतक-याच्या थेट दरवाजापर्यंत जावून त्यांना फूस लावून व्यापा-यांकडून शेतक-यांची मोठ्या प्रमाणावर लुटमार होत आहे़ शेतकºयांची दिशाभूल करीत हमीभावापेक्षा कवडीमोल दराने कापसाची खरेदी व्यापारी करीत असून यात अनेक दलाल सक्रीय आहेत़ अशा प्रकारची खरेदी न करण्याचे आदेश सरकारने दिले होते़ मात्र त्याला न जुमानता व्यापारी वर्गाने आपला व्यवसाय चालू ठेवला आहे़शासनाने जाहीर केलेल्या भावात उत्पादन खर्चही भरून निघत नाही़ त्यामुळे मोठी नामुष्की ओढावली आहे़ शासनाने विचार करून कमीत कमी ५ हजार रुपये भाव द्यावा - दत्ता बनसोडे, शेतकरी, वानोळा.

टॅग्स :FarmerशेतकरीcottonकापूसNandedनांदेड