शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

किवळा तलावाच्या मंजुरीवरून श्रेयाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:46 IST

लोहा तालुक्यातील किवळा येथील साठवण तलावासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे़ त्याचवेळी या तलावाच्या मंजुरीवरुन आ़प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आ़ शंकर धोंडगे यांच्यात श्रेयाची लढाई सुरु झाली आहे़ दोघांनीही पत्रपरिषदा घेवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले़

ठळक मुद्दे४३ कोटी ७३ लाखांचा निधी मंजूरचिखलीकर अन् धोंडगेंच्या एकमेकांवर आरोपांच्या फैरी

नांदेड : लोहा तालुक्यातील किवळा येथील साठवण तलावासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे़ त्याचवेळी या तलावाच्या मंजुरीवरुन आ़प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आ़ शंकर धोंडगे यांच्यात श्रेयाची लढाई सुरु झाली आहे़ दोघांनीही पत्रपरिषदा घेवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले़आ़प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, किवळा साठवण तलावाला मंजुरी देण्यासाठी २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून मागणी केली होती़ त्यानंतर २० मे २०१८ रोजीच्या बैठकीत या साठवण तलावाचा प्रस्ताव मंजूर करुन सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती़ परंतु, साठवण तलावाचा खर्च महापालिका प्रशासनाने करावा, अशी अट टाकण्यात आली होती़ परंतु या तलावाचा खर्च करण्याची क्षमता महापालिकेत नसल्याचे पत्र आयुक्तांनी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले होते़ त्यामुळे या तलावाचे काम रखडले होते़ त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेवून हे काम जलसंपदा विभागा मार्फत करण्यात यावे, अशी मागणी केली होती़ त्यानंतर औरंगाबाद जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना सुधारित प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले होते़मुख्य अभियंत्यांनी पंचम सुधारित प्रशासकीय मान्यतेबाबतची अट रद्द करुन तलावाचा सर्व खर्च जलसंपदा विभागाने करावा यास मान्यता दिली़ त्यानंतर नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत साठवण तलावास मंजुरी देण्यात आली असून ४३ कोटी ७३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ अशी माहिती आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली़तर किवळा साठवण तलावाला फडणवीस सरकारने मंजूर दिली अशी खोटी माहिती देवून आ़प्रताप पाटील चिखलीकर हे जनतेची दिशाभूल करीत असून या साठवण तलावाची मंजुरी निविदा आणि कार्यारंभ आदेश मागील आघाडी सरकारच्या काळात आम्हा सर्वांच्या प्रयत्नातून निघाले़ अशी माहिती माजी आ़ शंकर धोंडगे यांनी दिली़पत्रपरिषदेत धोंडगे म्हणाले, गोदावरी पात्रातील अंतेश्वर बंधारा व किवळा येथील साठवण तलाव झाल्यास विष्णूपुरीवरील शहराच्या पिण्याच्या पाण्याचा भार कमी होवून विष्णूपुरी पूर्णपणे शेतीसाठी उपयोगात येईल़ या हेतूने आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्या माध्यमातून मंजुरी घेण्यात आली होती़ त्यामध्ये अंतेश्वर बंधारा पूर्ण झाला़ किवळा साठवणाला पाण्याचा येवा कमी असल्यामुळे पावसाळ्यात विष्णूपुरी जेव्हा ओव्हर फ्लो होते़ त्या काळात इन्फ्लोमधून तलाव भरुन नंतरच्या काळात एमआयडीसी, सिडको, हडको व कृष्णूर एमआयडीसीला वर्षभर पाणी पुरवठा करता येतो़या संकल्पनेतून किवळ्याला १६ मे २०१२ रोजी निविदा मंजुरी व २७ जून २०१३ ला प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश निघाला़ भूसंपादनासाठी दहा कोटींचा निधीही दिला होता़ असे असताना चिखलीकर मात्र भाजप सरकारचे अपयश लपविण्यासाठी जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही धोंडगे यांनी केला आहे़त्यामुळे एवढी वर्षे रखडलेल्या या पुलाला निधी मंजूर होताच विद्यमान आणि माजी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत़ आगामी काळात हा वाद आणखी वाढत जाणार आहे़

  • आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता लोहा-कंधार मतदारसंघासाठी किवळा साठवण प्रकल्पाचा मुद्दा सर्वांसाठीच महत्त्वाचा झाला आहे़ येत्या काळात माजी आ़शंकर धोंडगे आणि विद्यमान आ़प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातील वाक्युद्ध चांगलेच रंगणार असल्याचे दिसते़
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीDamधरणPoliticsराजकारण