शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

किवळा तलावाच्या मंजुरीवरून श्रेयाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:46 IST

लोहा तालुक्यातील किवळा येथील साठवण तलावासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे़ त्याचवेळी या तलावाच्या मंजुरीवरुन आ़प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आ़ शंकर धोंडगे यांच्यात श्रेयाची लढाई सुरु झाली आहे़ दोघांनीही पत्रपरिषदा घेवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले़

ठळक मुद्दे४३ कोटी ७३ लाखांचा निधी मंजूरचिखलीकर अन् धोंडगेंच्या एकमेकांवर आरोपांच्या फैरी

नांदेड : लोहा तालुक्यातील किवळा येथील साठवण तलावासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे़ त्याचवेळी या तलावाच्या मंजुरीवरुन आ़प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आ़ शंकर धोंडगे यांच्यात श्रेयाची लढाई सुरु झाली आहे़ दोघांनीही पत्रपरिषदा घेवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले़आ़प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, किवळा साठवण तलावाला मंजुरी देण्यासाठी २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून मागणी केली होती़ त्यानंतर २० मे २०१८ रोजीच्या बैठकीत या साठवण तलावाचा प्रस्ताव मंजूर करुन सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती़ परंतु, साठवण तलावाचा खर्च महापालिका प्रशासनाने करावा, अशी अट टाकण्यात आली होती़ परंतु या तलावाचा खर्च करण्याची क्षमता महापालिकेत नसल्याचे पत्र आयुक्तांनी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले होते़ त्यामुळे या तलावाचे काम रखडले होते़ त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेवून हे काम जलसंपदा विभागा मार्फत करण्यात यावे, अशी मागणी केली होती़ त्यानंतर औरंगाबाद जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना सुधारित प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले होते़मुख्य अभियंत्यांनी पंचम सुधारित प्रशासकीय मान्यतेबाबतची अट रद्द करुन तलावाचा सर्व खर्च जलसंपदा विभागाने करावा यास मान्यता दिली़ त्यानंतर नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत साठवण तलावास मंजुरी देण्यात आली असून ४३ कोटी ७३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ अशी माहिती आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली़तर किवळा साठवण तलावाला फडणवीस सरकारने मंजूर दिली अशी खोटी माहिती देवून आ़प्रताप पाटील चिखलीकर हे जनतेची दिशाभूल करीत असून या साठवण तलावाची मंजुरी निविदा आणि कार्यारंभ आदेश मागील आघाडी सरकारच्या काळात आम्हा सर्वांच्या प्रयत्नातून निघाले़ अशी माहिती माजी आ़ शंकर धोंडगे यांनी दिली़पत्रपरिषदेत धोंडगे म्हणाले, गोदावरी पात्रातील अंतेश्वर बंधारा व किवळा येथील साठवण तलाव झाल्यास विष्णूपुरीवरील शहराच्या पिण्याच्या पाण्याचा भार कमी होवून विष्णूपुरी पूर्णपणे शेतीसाठी उपयोगात येईल़ या हेतूने आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्या माध्यमातून मंजुरी घेण्यात आली होती़ त्यामध्ये अंतेश्वर बंधारा पूर्ण झाला़ किवळा साठवणाला पाण्याचा येवा कमी असल्यामुळे पावसाळ्यात विष्णूपुरी जेव्हा ओव्हर फ्लो होते़ त्या काळात इन्फ्लोमधून तलाव भरुन नंतरच्या काळात एमआयडीसी, सिडको, हडको व कृष्णूर एमआयडीसीला वर्षभर पाणी पुरवठा करता येतो़या संकल्पनेतून किवळ्याला १६ मे २०१२ रोजी निविदा मंजुरी व २७ जून २०१३ ला प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश निघाला़ भूसंपादनासाठी दहा कोटींचा निधीही दिला होता़ असे असताना चिखलीकर मात्र भाजप सरकारचे अपयश लपविण्यासाठी जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही धोंडगे यांनी केला आहे़त्यामुळे एवढी वर्षे रखडलेल्या या पुलाला निधी मंजूर होताच विद्यमान आणि माजी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत़ आगामी काळात हा वाद आणखी वाढत जाणार आहे़

  • आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता लोहा-कंधार मतदारसंघासाठी किवळा साठवण प्रकल्पाचा मुद्दा सर्वांसाठीच महत्त्वाचा झाला आहे़ येत्या काळात माजी आ़शंकर धोंडगे आणि विद्यमान आ़प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातील वाक्युद्ध चांगलेच रंगणार असल्याचे दिसते़
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीDamधरणPoliticsराजकारण