शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

किवळा तलावाच्या मंजुरीवरून श्रेयाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:46 IST

लोहा तालुक्यातील किवळा येथील साठवण तलावासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे़ त्याचवेळी या तलावाच्या मंजुरीवरुन आ़प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आ़ शंकर धोंडगे यांच्यात श्रेयाची लढाई सुरु झाली आहे़ दोघांनीही पत्रपरिषदा घेवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले़

ठळक मुद्दे४३ कोटी ७३ लाखांचा निधी मंजूरचिखलीकर अन् धोंडगेंच्या एकमेकांवर आरोपांच्या फैरी

नांदेड : लोहा तालुक्यातील किवळा येथील साठवण तलावासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे़ त्याचवेळी या तलावाच्या मंजुरीवरुन आ़प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आ़ शंकर धोंडगे यांच्यात श्रेयाची लढाई सुरु झाली आहे़ दोघांनीही पत्रपरिषदा घेवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले़आ़प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, किवळा साठवण तलावाला मंजुरी देण्यासाठी २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून मागणी केली होती़ त्यानंतर २० मे २०१८ रोजीच्या बैठकीत या साठवण तलावाचा प्रस्ताव मंजूर करुन सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती़ परंतु, साठवण तलावाचा खर्च महापालिका प्रशासनाने करावा, अशी अट टाकण्यात आली होती़ परंतु या तलावाचा खर्च करण्याची क्षमता महापालिकेत नसल्याचे पत्र आयुक्तांनी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले होते़ त्यामुळे या तलावाचे काम रखडले होते़ त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेवून हे काम जलसंपदा विभागा मार्फत करण्यात यावे, अशी मागणी केली होती़ त्यानंतर औरंगाबाद जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना सुधारित प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले होते़मुख्य अभियंत्यांनी पंचम सुधारित प्रशासकीय मान्यतेबाबतची अट रद्द करुन तलावाचा सर्व खर्च जलसंपदा विभागाने करावा यास मान्यता दिली़ त्यानंतर नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत साठवण तलावास मंजुरी देण्यात आली असून ४३ कोटी ७३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ अशी माहिती आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली़तर किवळा साठवण तलावाला फडणवीस सरकारने मंजूर दिली अशी खोटी माहिती देवून आ़प्रताप पाटील चिखलीकर हे जनतेची दिशाभूल करीत असून या साठवण तलावाची मंजुरी निविदा आणि कार्यारंभ आदेश मागील आघाडी सरकारच्या काळात आम्हा सर्वांच्या प्रयत्नातून निघाले़ अशी माहिती माजी आ़ शंकर धोंडगे यांनी दिली़पत्रपरिषदेत धोंडगे म्हणाले, गोदावरी पात्रातील अंतेश्वर बंधारा व किवळा येथील साठवण तलाव झाल्यास विष्णूपुरीवरील शहराच्या पिण्याच्या पाण्याचा भार कमी होवून विष्णूपुरी पूर्णपणे शेतीसाठी उपयोगात येईल़ या हेतूने आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्या माध्यमातून मंजुरी घेण्यात आली होती़ त्यामध्ये अंतेश्वर बंधारा पूर्ण झाला़ किवळा साठवणाला पाण्याचा येवा कमी असल्यामुळे पावसाळ्यात विष्णूपुरी जेव्हा ओव्हर फ्लो होते़ त्या काळात इन्फ्लोमधून तलाव भरुन नंतरच्या काळात एमआयडीसी, सिडको, हडको व कृष्णूर एमआयडीसीला वर्षभर पाणी पुरवठा करता येतो़या संकल्पनेतून किवळ्याला १६ मे २०१२ रोजी निविदा मंजुरी व २७ जून २०१३ ला प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश निघाला़ भूसंपादनासाठी दहा कोटींचा निधीही दिला होता़ असे असताना चिखलीकर मात्र भाजप सरकारचे अपयश लपविण्यासाठी जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही धोंडगे यांनी केला आहे़त्यामुळे एवढी वर्षे रखडलेल्या या पुलाला निधी मंजूर होताच विद्यमान आणि माजी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत़ आगामी काळात हा वाद आणखी वाढत जाणार आहे़

  • आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता लोहा-कंधार मतदारसंघासाठी किवळा साठवण प्रकल्पाचा मुद्दा सर्वांसाठीच महत्त्वाचा झाला आहे़ येत्या काळात माजी आ़शंकर धोंडगे आणि विद्यमान आ़प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातील वाक्युद्ध चांगलेच रंगणार असल्याचे दिसते़
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीDamधरणPoliticsराजकारण