शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बारडची मॉडेल व्हिलेजकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:32 AM

गावातील सर्व धार्मिक स्थळावरील कर्णकर्कश आवाज करणारे भोंगे काढण्याचा ग्रामसभेत एकमताने निर्णय घेऊन प्रकाशझोतात आलेल्या मुदखेड तालुक्यातील बारड ग्रामपंचायतने या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे़ मंगळवारच्या निर्णयानंतर बुधवारी गावातील जवळपास सर्वच धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्यात आले होते़ त्याचबरोबर ग्रामपंचायतकडून राबविण्यात येणा-या नवनवीन उपक्रमामुळे या गावाची आता मॉडेल व्हिलेजकडे घोडदौड सुरु असल्याची चित्र पहावयास मिळाले़

ठळक मुद्दे ग्रामस्थांकडून निर्णयाची काटेकोर अंमलबजावणीध्वनिप्रदूषणाच्या विरोधात एकजूट

लोकमत न्यूज नेटवर्कबारड : गावातील सर्व धार्मिक स्थळावरील कर्णकर्कश आवाज करणारे भोंगे काढण्याचा ग्रामसभेत एकमताने निर्णय घेऊन प्रकाशझोतात आलेल्या मुदखेड तालुक्यातील बारड ग्रामपंचायतने या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे़ मंगळवारच्या निर्णयानंतर बुधवारी गावातील जवळपास सर्वच धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्यात आले होते़ त्याचबरोबर ग्रामपंचायतकडून राबविण्यात येणा-या नवनवीन उपक्रमामुळे या गावाची आता मॉडेल व्हिलेजकडे घोडदौड सुरु असल्याची चित्र पहावयास मिळाले़मुदखेड तालुक्यातील बारड या गावाची लोकसंख्या जवळपास दहा हजारावऱ दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे गावाचा कायापालट झाला़ सत्ताधारी आणि विरोधक गावाच्या विकासासाठी गळ्यात गळे घालून कामाला लागत असल्याचे येथील उदाहरणही विरळच़ जवळपास वर्षभरापूर्वी ग्रामपंचायतने सर्व गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले़ त्यामुळे चोरी व इतर गुन्हेगारीच्या घटनांवर आळा बसला़ जिल्हा परिषद शाळा, आरोग्य केंद्र या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाºयांच्या हजेरीसाठी ग्रामपंचायतमध्ये बायोमेट्रीक बसविण्यात आले आहे़ त्यामुळे दांडीबहाद्दरांचा बंदोबस्त झाला़ रस्ते आणि स्वच्छतेची कामेही समाधानकारक़सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदत असताना केवळ भोंग्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे दुधात मिठाचा खडा टाकण्याचे काम होत आहे़ गावात आठ मंदिरे, दोन बुद्धविहार आणि एक मशीद आहे़ या आवाजामुळे सर्वत्र गोंगाटाचे वातावरण निर्माण झाले होते़ ही बाब ग्रामपंचायत पदाधिकाºयांच्या लक्षात आली़ त्याचबरोबर शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणारा परिणाम ही बाबही त्यांना खटकत होती़ त्यानंतर पदाधिकारी व सदस्यांनी जवळपास दोन महिन्यांपासून गावातील सर्व समाजातील प्रतिनिधींच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली़ भोंग्याच्या आवाजामुळे होणारे दुष्पपरिणाम पटवून दिले़ग्रामस्थांनाही त्यांचे म्हणणे पटले़ त्यानंतर ३० रोजी झालेल्या ग्रामसभेत सर्व धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब झाले़ निर्णयानंतर त्याच दिवशी धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्यास सुरुवात करण्यात आली़ बुधवारी दुपारपर्यंत जवळपास सर्वच धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्यात आले होते़ बारड ग्रामपंचायतने घेतलेला हा निर्णय इतर ग्रामपंचायतीसाठी आदर्श निर्माण करणारा आहे़जि़प़शाळेचे उपमुख्याध्यापक बालाजी बोंडलेवार म्हणाले, भोंग्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे लक्ष राहत नव्हते़ परंतु धार्मिक बाब असल्यामुळे विरोधही करता येत नव्हता़ परंतु आता ग्रामपंचायतचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने लाभदायक आहे़ तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विशाल राऊत, दिव्या आठवले यांनी निर्णयाचे स्वागत करीत, आता अभ्यासात आवाजामुळे व्यत्यय येणार नसल्याचे सांगितले़गावातून यापुढे कुठल्याही मिरवणुका काढावयाच्या असल्यास त्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे़