शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

बाभळी कोरडीठाक, पाणी गेले तेलंगणात, मुख्यमंत्री स्तरावर तोडग्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 06:39 IST

नियमांच्या जटीलतेमुळे महाराष्ट्रावर गरजेच्यावेळी पाणी सोडण्याची नामुष्की येत असल्याने ‘बाभळी’चे काटे आता टोचू लागले आहेत.

- विशाल सोनटक्केनांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १ जुलैला बाभळी धरणाचे १४ दरवाजे उघडून सुमारे ३२ टक्के पाणी तेलंगणात सोडल्याने जिल्ह्यातील चार तालुक्यांची भिस्त असलेला बाभळी बंधारा कोरडाठाक पडला आहे़ नियमांच्या जटीलतेमुळे महाराष्ट्रावर गरजेच्यावेळी पाणी सोडण्याची नामुष्की येत असल्याने ‘बाभळी’चे काटे आता टोचू लागले आहेत़ या प्रश्नी मुख्यमंत्रीस्तरावर तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे़...मग धरणाचा उपयोग काय?महाराष्ट्र व तेलंगण यांच्यामध्ये बाभळी बंधारानिर्मितीवरुन मोठा वाद झाला होता़ प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर २०१३ मध्ये न्यायालयाने निकाल देत १ जुलैला बाभळीचे दरवाजे उघडावेत व १ आॅक्टोबरला दरवाजे बंद करावेत, असे निर्देश दिले़उपलब्ध झालेल्या पाणी साठ्यापैकी ०़६० टी़एम़सी़ पाणी दरवर्षी १ मार्चला तीव्र पाणी टंचाई असताना सोडावे लागते़ त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चुन बांधलेल्या धरणाच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़बाभळी प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करण्याची मागणी होत आहे़ मात्र ही वेळ खाऊप्रक्रिया आहे़ आॅक्टोबर महिन्यामध्ये आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन, केंद्रीय जल आयोगाकडे दाद मागण्याची तसेच महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी बैठक घेवून तोडगा काढण्याची मागणी केली होती़ - प्रा़ डॉ़ बालाजी कोम्पलवार,सचिव, बाभळी संघर्ष समिती

टॅग्स :WaterपाणीNandedनांदेड