शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

स्वयंचलित हवामान केंद्रच कुचकामी; हवामानाच्या आकडेवारीवर होतोय परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 19:07 IST

हवामान केंद्रांची कृषी हवामानशास्त्रज्ञ व स्कायमेट कंपनीच्या तज्ज्ञ प्रतिनिधींच्या उपस्थितीत तपासणी

ठळक मुद्देहवामानाच्या आकडेवारीवर परिणाम होत असल्याचे तपासणी अभ्यासातून पुढे आले समितीने दिला अभिप्राय शासनाकडे प्रस्ताव पाठविणार

नांदेड :  जिल्ह्यातील सहा महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्राची कृषी हवामान शास्त्रज्ञ व स्कायमेट कंपनीच्या तज्ञ प्रतिनिधीच्या उपस्थितीत तपासणी केली असता बहुतांश हवामान केंद्रांची भारतीय हवामान खात्याच्या निकषाप्रमाणे उभारणी झााली नसल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे या हवामान केंद्राच्या परिसरात कुठे घराचे बांधकाम झाले आहे तर कुठे प्रशासकीय इमारत उभी राहिली आहे. त्यामुळे हवामानाच्या आकडेवारीवर परिणाम होत असल्याचे तपासणी अभ्यासातून पुढे आले आहे.

जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे तेथे फळ पीक विमा मंजूर झाला नाही. तर कमी विमा नोंदविलेल्या महसूल मंडळामध्ये फळ पीक विमा मंजूर झाल्याचा प्रकार यंदा पुनर्रचित हवामाना आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये घडला आहे. या संदर्भात अर्धापूर, दाभड,  लिंबगाव, तरोडा, तुप्यासह इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची १३ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.या समितीने गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे आपला अहवाल सादर केला. समितीने पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना अंबीया बहार सन २०१९-२० योजनेअंतर्गत केळी या फळ पीकासाठी एकूण अधिसूचित महसूल मंडळापैकी रॅन्डम पद्धतीने सहा महसूल मंडळाची तपासणीसाठी निवड केली. यातील तीन मंडळे विमा मंजूर झालेल्या पैकी तर उर्वरित तीन मंडळे विमा ना मंजूर झालेल्या पैकी होती. समितीला या तपासणीत बहुतांश ठिकाणची स्वयंचलित हवामान केंद्र भारतीय हवामान खात्याच्या निकषाप्रमाणे बसविली नसल्याचे दिसून आले. 

समितीने दिला अभिप्राय शासनाकडे प्रस्ताव पाठविणारजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे आपला अहवाल सादर करतानाच समितीचा अभिप्राय स्पष्ष्टपणे नोंदविला आहे. फळ पीक विमा नामंजूर झालेल्या महसूल मंडळामध्ये शेजारील विमा मंजूर झालेल्या महसूल मंडळाच्या हवामानाची आकडेवारी ग्राह्य पकडून नुकसान भरपाई द्यावी अथवा सलग चार दिवस अनुक्रमे ४२ व ४५ अथवा तीन दिवस ४२ व ४५ तापमान असल्यास एकूण नुकसान भरपाईच्या सलग चार दिवसासाठी ८० टक्के व तीन दिवसांसाठी ६० टक्के या प्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्याचा अभिप्राय देण्यात आला आहे. आता हा प्रस्ताव उचित कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

केंद्राच्या देखभालीची स्ंयुक्त जबाबदारी घ्यावीसमितीने सहा महसूल मंडळातील अर्धापूर, दाभड, बारड, मुदखेड आणि मुगट या स्वयंचलित हवामान केंद्राची संयुक्त पाहणी केली.  यातील बहुतांश ठिकाणी केंद्राची उभारणी निकषाप्रमाणे झाली नसल्याचे दिसून आले. याचा परिणाम हवामानच्या आकडेवारीवर होत आहे. समितीने केंद्राची उभारणी निकषाप्रमाणे करण्यास सूचित केले आहे.याबरोबरच केंद्राच्या सुरक्षेची व देखभालीची जबाबदारी ग्राम पंचायत व स्कायमेट प्रतिनिधी यांनी करावी असे सांगितले आहे.- बाळासाहेब पाटील रावणगावकर, सभापती तथा समिती सदस्य, नांदेड

टॅग्स :Rainपाऊसenvironmentपर्यावरणFarmerशेतकरी