शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील रस्ते कामांसाठी २ लाख कोटी उभारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:08 IST

नांदेड : दरवर्षी नवीन रस्ते निर्माण होत आहेत, रस्त्यांची लांबी वाढत आहे. दोन पदरी, चार पदरी रस्त्यांची नागरिकांना सवय ...

नांदेड : दरवर्षी नवीन रस्ते निर्माण होत आहेत, रस्त्यांची लांबी वाढत आहे. दोन पदरी, चार पदरी रस्त्यांची नागरिकांना सवय होत आहे. दुसरीकडे आवश्यक ते एवढ्या पैशांची उपलब्धता नाही. त्यामुळे राज्यातील प्रमुख रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी तीन-साडेतीन वर्षासाठी विशेष कार्यक्रम राबवावा लागणार आहे. यासाठी बाहेरून दीड ते दोन लाख कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न असून यासाठीची प्राथमिक चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. सोमवारी अशोक चव्हाण खास ‘लोकमत’शी बोलत होते. सध्या बांधकाम विभागाचे प्लॅन आणि नॉन प्लॅन असे बजेट प्रोव्हीजन सुमारे १२ ते १५ हजार कोटींच्या आसपास आहे. या निधीमध्ये पूर्ण राज्यातील कामांना गती मिळू शकत नाही. त्यातच जिल्हा परिषदेकडील रस्ते बांधकाम विभागाकडे घ्यावेत अशी मागणी होत असते. अशा स्थितीत वेळेत दर्जेदार कामे करण्यासाठी बाहेरून निधी उभारावा लागणार आहे. असे झाले तरच राज्यातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा देता येतील. एशियन डेव्हल्पमेंट बँकेच्या माध्यमातून १५ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. त्यातून राज्य, प्रमुख जिल्हा, तीर्थक्षेत्र तसेच राज्यातील महत्त्वाचे स्थान असलेेले रस्ते करण्याचा प्रयत्न आहे. ज्या जिल्ह्यात कामे झाली नाहीत तेथे अधिकचा पैसा देऊन बॅलेन्स डेव्हलपमेंटचा माझा प्रयत्न असल्याचेही चव्हाण म्हणाले. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात केवळ ३० टक्केच पैसा सरकारच्या तिजोरीत आला. या ३० टक्क्यातील साधारण ७५ टक्के रक्कम आरोग्य सेवेसाठी वर्ग करावी लागली. आता परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे राज्यातील रस्ते कामाला वेग देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसमध्ये पक्षांतर निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या चर्चा सुरू आहे. या विषयावरून केंद्रीय नेतृत्वात कसलेही मतभेद नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या काळात बंगाल, आसामसह इतर राज्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांना प्राधान्य द्यावे, असे अनेकांचे मत आहे. तरीही माझ्या माहितीनुसार जूनमध्ये काँग्रेस अध्यक्षांची निवड होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदा संदर्भात काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील सर्वांशी चर्चा करून जनमत समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा व्यक्तिगत नव्हे तर जबाबदारीचा विषय आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता हा निर्णय अचूक व्हावा हाच पक्षश्रेष्टींचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

चौकट.......

मराठा आरक्षणप्रश्नी केंद्राने भूमिका घ्यावी

आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रापुरता नाही हरियाणा, राजस्थानसह इतर राज्यातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ठ आहेत. हे सर्व प्रश्न एकत्रितरित्या घ्यायला हवेत. यासाठी आता केंद्राने भूमिका घेण्याची गरज आहे. मी तर भाजपाला ही संधी आहे असे मानतो. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या प्रश्नी पहिल्यांदाच नोटीस बजावली आहे. पंतप्रधानांनी केंद्राच्या अधिकाऱ्यांना याबाबत दिशानिर्देश देऊन हा प्रश्न अंतिमरित्या मार्गी लावावा असे आवाहनही चव्हाण यांनी केले. या संदर्भात मी केंद्रीय कायदा मंत्र्यांना तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांना पत्र पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट.........

फडणवीस यांनी ग्रामपंचायतीची गावनिहाय माहिती द्यावी

ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. काँग्रेस-शिवसेनेसह राष्ट्रवादीने आपापल्या वर्चस्व क्षेत्रात आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र त्यानंतरही देवेंद्र फडणवीस भाजपाच मोठा पक्ष ठरल्याचे सांगत असतील तर त्यांनी केवळ दावे न करता गावनिहाय माहिती द्यावी असे आव्हानही अशोक चव्हाण यांनी दिले. जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर बोलताना ही मागणी विकासासाठी आहे की राजकीय हेतूने हे तपासावे लागेल. कारण भाजपाचा इतिहास जातीय तेढ निर्माण करणारा राहिला असल्याचे ते म्हणाले.