थंडीच्या कडाक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST2020-12-29T04:16:33+5:302020-12-29T04:16:33+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीकरिता ते २३ ते ३० डिसेंबर नामांकन अर्ज भरण्याची तारीख देण्यात आली आहे. ३१ डिसेंबर रोजी चार जानेवारी ...

थंडीच्या कडाक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण जोरात
ग्रामपंचायत निवडणुकीकरिता ते २३ ते ३० डिसेंबर नामांकन अर्ज भरण्याची तारीख देण्यात आली आहे. ३१ डिसेंबर रोजी चार जानेवारी ही नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख देण्यात आले आहे. ग्रामपंचायत करिता १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून अठरा रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीकरिता २३ पासून नामांकन अर्ज भरायची लगबग सुरू होणार झाली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा असल्याने आतापासूनच इच्छुकांनी वतीने नेट कॅफेचा दुकानात जाऊन तालुका विविध राजकीय पक्षाने व गटाने नेतृत्व करणा-या कडून निवडणुकीत उभे करण्या करिता उमेदवाराची कागदपत्रे जुळवाजुळव करत आहेत. ग्रामपंचायत मध्ये समावेश आहे.
आपल्या गावाची ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेण्याकरिता पुढारी सरसावले आहेत. सरपंच पदाचे आरक्षण सुद्धा रद्द करण्यात आले आहे. नव्या सरपंच आरक्षण सदस्यांची निवड झाल्यानंतर काढण्यात येणार असल्याने त्याबाबतची इच्छुकांमध्ये दिसून येत आहे .त्यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध निवड होणार की नाही याकडे सुद्धा सर्व नागरिकांचे लक्ष लागले असून कमीतकमी बिनविरोध ग्रामपंचायत होणार मात्र जास्तीत जास्त विरोध पार्टीचे मतदान केले जाणार आहेत.तालुक्यातील कुंटूर सालेगाव सांगली बळेगाव राहेर कोकलेगाव हंगरगा परडवाडी या ६८ ग्रामपंचायत निवडणुका होणार असून निवडणुकीकरिता गावखेड्यातील नेते सज्ज झाले असून मतदारांची भेटी घेतल्या जात आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले. यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून सध्या परिसरातील खेड्यांमध्ये नऊ तरुण मंडळीही राजकारणाच्या आखाड्यात उतरले असून यंदा मात्र तरुण तडफदार नेतृत्व ग्रामपंचायतचे नेतृत्व करणार असल्याची चर्चा व चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पुढाऱ्यांना बाजूला सारून गावा परिसराचा विकास करण्याची जिद्द मनात बाळगून नवतरुण सदस्य ग्रामपंचायतीमध्ये उतरणार असल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे.