शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

अखेर शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय झाला; महाराष्ट्र शुगरचे २ कोटी खात्यावर आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 13:17 IST

परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या कारखान्याने गाळप हंगाम २०१५-१६ मध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, आदी जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपासाठी नेला होता

नांदेड : तब्बल सहा वर्षांच्या संघर्षशील पाठपुराव्यानंतर अखेर महाराष्ट्र शुगर कारखान्याकडे असलेले एफआरपीचे दोन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती ऊसदर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी दिली. हा शेतकऱ्यांच्या एकीचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले.

परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या कारखान्याने गाळप हंगाम २०१५-१६ मध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, आदी जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपासाठी नेला; परंतु जानेवारी २०१६ नंतर नेलेल्या उसाचा एकही रुपया शेतकऱ्यांना दिला नव्हता. कालांतराने तो कारखाना बंद पडला. नंतर विविध संघटनांच्या माध्यमांतून आंदोलने झाली. काहीजणांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अनेक वेळा संघर्ष झाला. त्यावर आरआरसीच्या कारवाया झाल्या, लिलाव झाले; तरीही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत.

एनसीएलटी न्यायालयातून हा कारखाना ट्वेन्टी शुगर या ग्रुपने विकत घेतला. ४ कोटी २२ लाख रुपये शेतकऱ्यांनी देणी असताना एनसीएलटीने केवळ २ कोटी देऊ केले. सदर पैसे कुण्या शेतकऱ्याचे बाकी आहेत, याबाबत कोणतेही रेकॉर्ड नसल्याने हे पैसे द्यायचे कोणाला हा प्रश्न निर्माण झाला होता. उच्च न्यायालयाचे निर्देश व राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस दर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केलेल्या सूचनेनुसार नवीन रेकॉर्ड तयार करण्यात आले.

दोन कोटी रुपये परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे येऊन दोन वर्षे झाली तरीही ते शेतकऱ्यांना मिळत नव्हते. त्यासाठी शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने झाली. सततचा पाठपुरावा करून अखेर सदर दोन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात आले. एकही रुपया न मिळालेल्या शेतकऱ्यांना यापूर्वी प्रतिटन ३३३.५७ देण्यात आले होते. १० ऑगस्टला ऊर्वरित प्रतिटन १२६४.६९ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. एकूण १५९८.२६ नुसार पैसे शेतकऱ्यांना देण्यात आले.

आता व्याजासाठी लढाईतब्बल सात वर्षांपूर्वी गेलेल्या उसाचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. केवळ एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे; परंतु सहा वर्षांचं व्याज अद्याप बाकी आहे. यासाठी काय कायदेशीर भूमिका घ्यावी लागेल, याचा तज्ज्ञांशी विचारविनिमय करून पुढील लढा सुरूच राहणार आहे. - प्रल्हाद इंगोले, माजी सदस्य, ऊसदर नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती