शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अखेर शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय झाला; महाराष्ट्र शुगरचे २ कोटी खात्यावर आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 13:17 IST

परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या कारखान्याने गाळप हंगाम २०१५-१६ मध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, आदी जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपासाठी नेला होता

नांदेड : तब्बल सहा वर्षांच्या संघर्षशील पाठपुराव्यानंतर अखेर महाराष्ट्र शुगर कारखान्याकडे असलेले एफआरपीचे दोन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती ऊसदर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी दिली. हा शेतकऱ्यांच्या एकीचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले.

परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या कारखान्याने गाळप हंगाम २०१५-१६ मध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, आदी जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपासाठी नेला; परंतु जानेवारी २०१६ नंतर नेलेल्या उसाचा एकही रुपया शेतकऱ्यांना दिला नव्हता. कालांतराने तो कारखाना बंद पडला. नंतर विविध संघटनांच्या माध्यमांतून आंदोलने झाली. काहीजणांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अनेक वेळा संघर्ष झाला. त्यावर आरआरसीच्या कारवाया झाल्या, लिलाव झाले; तरीही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत.

एनसीएलटी न्यायालयातून हा कारखाना ट्वेन्टी शुगर या ग्रुपने विकत घेतला. ४ कोटी २२ लाख रुपये शेतकऱ्यांनी देणी असताना एनसीएलटीने केवळ २ कोटी देऊ केले. सदर पैसे कुण्या शेतकऱ्याचे बाकी आहेत, याबाबत कोणतेही रेकॉर्ड नसल्याने हे पैसे द्यायचे कोणाला हा प्रश्न निर्माण झाला होता. उच्च न्यायालयाचे निर्देश व राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस दर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केलेल्या सूचनेनुसार नवीन रेकॉर्ड तयार करण्यात आले.

दोन कोटी रुपये परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे येऊन दोन वर्षे झाली तरीही ते शेतकऱ्यांना मिळत नव्हते. त्यासाठी शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने झाली. सततचा पाठपुरावा करून अखेर सदर दोन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात आले. एकही रुपया न मिळालेल्या शेतकऱ्यांना यापूर्वी प्रतिटन ३३३.५७ देण्यात आले होते. १० ऑगस्टला ऊर्वरित प्रतिटन १२६४.६९ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. एकूण १५९८.२६ नुसार पैसे शेतकऱ्यांना देण्यात आले.

आता व्याजासाठी लढाईतब्बल सात वर्षांपूर्वी गेलेल्या उसाचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. केवळ एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे; परंतु सहा वर्षांचं व्याज अद्याप बाकी आहे. यासाठी काय कायदेशीर भूमिका घ्यावी लागेल, याचा तज्ज्ञांशी विचारविनिमय करून पुढील लढा सुरूच राहणार आहे. - प्रल्हाद इंगोले, माजी सदस्य, ऊसदर नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती