शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

निकाल हाती येताच उद्धव ठाकरेंनी धोका दिला; नांदेडमधील सभेत अमित शहा यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 06:13 IST

महाजनसंपर्क अभियानाची सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड :  उद्धव ठाकरे यांना कोणीही धोका दिला नाही. सत्तेसाठी ते काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. निवडणुकीआधी त्यांच्याशी झालेल्या चर्चेत बहुमत मिळाल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री राहतील, असे ठरविले होते. परंतु, निकाल हाती येताच त्यांनी धोका देऊन काँग्रेस अन् राष्ट्रवादीशी जवळीक केली, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केली. 

भारतीय जनता पार्टीच्या महाजनसंपर्क अभियानांतर्गत शाह यांची नांदेड शहरात शनिवारी सायंकाळी सभा झाली. मोदी सरकारचे हे नववे वर्ष भारत गौरव, भारत उत्कर्ष, गरीब कल्याण, सुरक्षित भारत असे आहे. काँग्रेसकडून राम मंदिर वही बनायेंगे, मगर तारीख नही बतायेंगे...अशा अफवा पसरविण्यात येत होती. परंतु, मोदींनी देशातील संस्कृती आणि इतिहासाचा सन्मान केला असून, २०२४ मध्ये प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर अयोध्येत उभे राहत आहे, असेही शाह म्हणाले.

विदेशात देशाच्या विरोधात बोलू नये याचे भानही राहुल गांधींना नाही. त्यांना ही बाब माहीत नसेल तर त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांचा सल्ला घ्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी मंचावर केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री अतुल सावे, खा. प्रतापराव चिखलीकर, खा. सुधाकर श्रृंगारे उपस्थित होते.

धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, त्यामुळे मुस्लीम आरक्षण असंवैधानिक आहे. देशात लवकरच समान नागरी कायदा लागू करण्यात येईल. - अमित शाह , केंद्रीय गृहमंत्री

शरद पवार यांना सत्तेत नसताना ओबीसी, मुस्लीम, ख्रिश्चन यांची चिंता वाटते. महाराष्ट्राला पेटविण्याचे काम पवार करीत आहेत. त्यामुळे हे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे. - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहNandedनांदेड