शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खातेवाटपावर अजित दादा भडकले; पत्रकारांना म्हणाले, ‘अरे, गप्प बसा रे !’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 18:09 IST

खातेवाटपावरून महायुतीमधील नेत्यांमध्येदेखील मतभेद असल्याची चर्चा आहे.

नांदेड : महायुतीला जनकौल मिळूनदेखील सत्तास्थापनेसाठी अन् त्यानंतर मंत्री, खातेवाटपासाठीही मोठा विलंब लागला. शनिवारी खातेवाटपानंतर नांदेड जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्रकारांनी खातेवाटपाबाबत प्रतिक्रिया विचारली असता दादा भडकले अन् म्हणाले, ‘गप्प बसा रे.’ त्यावरून महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे, असे नाही.

लोकसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेला आत्मविश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना नडला आणि विधानसभेत महायुतीने बाजी मारली. विरोधकांना शंभरचा आकडादेखील पार करता आला नाही. महायुतीला मिळालेल्या भरघोस यशानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचे खलबते अनेक दिवस दिल्लीदरबारी चालली. तद्नंतर शिवसेना नेते एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री नाही तर किमान गृह खाते आपल्याकडे द्यावे, असा आग्रह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे धरला होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध खात्यांवरून महायुतीमध्ये बरेच दिवस खल चालला. 

तद्नंतर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी मंत्रिमंडळाचे खातेवाटप करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह, ऊर्जा, जीएडी अशी महत्वाची खाती त्यांच्याकडे ठेवली. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास, एमएसआरडीसी आणि गृहनिर्माण तर अजित पवार यांना वित्त-नियोजन आणि उत्पादन शुल्क हे खाते देण्यात आले; परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अपेक्षित खाती मिळाली नाहीत. त्यामुळे काहीजणांनी पक्षश्रेष्ठींकडे नाराजीदेखील व्यक्त केली. खातेवाटपावरून महायुतीमधील नेत्यांमध्येदेखील मतभेद असल्याची चर्चा आहे. शनिवारी नांदेड जिल्हा दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी विमानतळावर गाठले. यावेळी खातेवाटपाबाबत दादांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ‘गप्प बसा रे,’एवढेच उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी उशीर होत असल्याचे सांगत पत्रकारांशी संवाद न साधताच विमानतळामध्ये प्रवेश केला.

टॅग्स :laturलातूरAjit Pawarअजित पवार