शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

तस्करीसाठी कुख्यात चिखलीत पुन्हा धाड; अख्या गावाचा आहे सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 20:20 IST

१९९५ पासून वनविभागाची सलग कारवाई तरीही सागवानाची तस्करी थांबेना

ठळक मुद्देगावातील शेकडो जणांवर तस्करीचे गुन्हेगावातील नागरिक पिढ्यान्पिढ्या जंगलातील वनसंपदेवर गुजराण

किनवट : सागवानासह इतर मौल्यवान लाकडांच्या तस्करीसाठी नांदेड जिल्ह्यात कूप्रसिद्ध असलेल्या चिखली गावात पुन्हा ७ जानेवारीच्या पहाटे वनविभागाच्या पथकाने धाड मारली़ या धाडीत सव्वालाख रुपयांचे सागवान जप्त करण्यात आले आहे़ १९९५ पासून या गावावर वनविभागाच्या वतीने धाडी मारल्या जात असल्या तरी, तेथील सागवानाची तस्करी थांबत नसल्याने चिखली ग्रामस्थांच्या या तस्करी प्रकरणाकडे आता वेगळ्या अंगाने पाहण्याची गरज दिसत आहे़ 

तालुक्यात लाकूड तस्करीसाठी कूप्रसिद्ध असलेल्या चिखली (बु) येथे वनविभागाने महसूल विभागाच्या उपस्थितीत ७ जानेवारी रोजी भल्या पहाटे धाड टाकली़ यावेळी १ लाख १४ हजार ६२५ रुपये किमतीचे सागवानाचे मौल्यवान कटसाईज व गोल माल १९४ नग जप्त केले़  यापूर्वी आॅपरेशन ब्ल्यू मुन ,आॅपरेशन चिखली यासारखी मोहीम राबवून लाखों रुपये किमतीचा माल जप्त केला होता़

चिखली (बु) गावात अवैध सागवानी लाकडाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली  होती़ त्यावरून नांदेडचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, किनवटचे प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक व्ही़ एऩ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेसहा वाजता नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम व  वनक्षेत्रपाल के़ एऩ खंदारे, बी़पी़आडे, पीक़े़शिंदे, किनवट फिरत्या पथकाचे योगेश शेरेकार,  अविनाश तैनाक, श्रीकांत जाधव, आऱआऱचोबे, वनपाल के़जी़ गायकवाड, एस़ एऩ सांगळे, आऱ एऩ सोनकांबळे, मोकले व महिला कर्मचाऱ्यांनी चिखली (बु) येथे धाड टाकली़

यावेळी अवैध साठवून ठेवलेले ७६ हजार ३१९ रुपये किमतीचे १५७ कटसाईज मौल्यवान सागवान व ३८ हजार ३०६ रुपये किमतीचे गोल माल ३७ नग असा १ लाख १४ हजार ५२५ रुपये किमतीचे १९४ नग जप्त केले़ पहाटेच वनविभागाने चिखली गावाला अक्षरश: गराडा घातला होता़ यावेळी घरांची झडती सुरु असताना, काही जणांनी नायब तहसीलदार            सर्वेश मेश्राम व वनविभागाच्या  कर्मचाऱ्याला जाब विचारला़ महिला वन कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक दिली़ 

गावातील शेकडो जणांवर तस्करीचे गुन्हेचिखली हे गाव सागवान तस्करीसाठी जिल्ह्यात कूप्रसिद्ध आहे़ १९९५ मध्ये उपवनसंरक्षक असलेल्या एमक़े़राव त्यानंतर खांडेकर, राजेंद्र नाळे, आशिष ठाकरे यांच्या कार्यकाळात चिखली गावावर अनेकवेळा धाडी टाकण्यात आल्या़ आॅपरेशन ब्लू मून, आॅपरेशन चिखली राबविण्यात आले़ या ठिकाणाहून प्रत्येकवेळी दोन ते तीन ट्रक भरुन सागवान जप्त करण्यात आले़ तस्करी प्रकरणात आतापर्यंत शेकडो जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़चिखली गावातील नागरिक पिढ्यान्पिढ्या जंगलातील वनसंपदेवर गुजराण करीत आले आहेत़ गाव व परिसरात दुसरे काम नसल्यामुळे नवीन पिढीही सागवान तस्करीला लागली आहे़ सागवान तस्करीतून चांगले पैसेही मिळतात़ गावात निरक्षतेचे प्रमाणही अधिक आहे़ त्यामुळे या गावातील लोकांसाठी एखादा प्रकल्प सुरु केल्यास सागवान तस्करीला आळा घालता येवू शकतो़ 

टॅग्स :forest departmentवनविभागSmugglingतस्करीNandedनांदेडraidधाड