शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

रोहित्र काढण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेनंतरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:34 IST

शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातून सुरू असलेला अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी प्रकल्प क्षेत्रातील विद्युत रोहित्र काढण्याची सूचना महापालिकेने महावितरणकडे केली होती. मात्र, ही कार्यवाही जिल्हाधिका-यांशी चर्चा करुन केली जाईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

नांदेड : शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातून सुरू असलेला अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी प्रकल्प क्षेत्रातील विद्युत रोहित्र काढण्याची सूचना महापालिकेने महावितरणकडे केली होती. मात्र, ही कार्यवाही जिल्हाधिका-यांशी चर्चा करुन केली जाईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.शहराला पाणीपुरवठा करणाºया विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला ३७ दलघमी जलसाठा आहे. पण त्याचवेळी प्रत्यक्षात दरमहा १२ दलघमी पाणीउपसा विष्णूपुरी प्रकल्पातून होत आहे. ही बाब नांदेड शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने गंभीर आहे. त्यामुळे प्रकल्प क्षेत्रातील अवैध पाणीउपसा रोखावा, यासाठी महापालिकेने महावितरणला १४ जानेवारी रोजी एक पत्र देवून प्रकल्प क्षेत्रातील विद्युत रोहित्र बंद करण्याची सूचना केली होती. पाटबंधारे विभागानेही महावितरणला याच विषयावर कळवले होते. १५ दिवसानंतरही कोणतीही कार्यवाही महावितरणने केली नाही. याबाबत ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले.तसेच आगामी काळात नांदेडवरील जलसंकटाची जाणीव करुन दिली. याच विषयावर महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष वाहाने यांच्याशी संपर्क साधला असता महावितरणला महापालिका आणि पाटबंधारे विभागाने विद्युत रोहित्र बंद करण्यास कळवले असले तरीही, महावितरण स्वतंत्र आहे. या विषयावर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याशी चर्चा करुन रोहित्र काढण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.एकूणच महावितरणने महापालिका आणि पाटबंधारे विभागाच्या पत्राला केराचीच टोपली दाखविली आहे. महावितरणच्या या भूमिकेने आगामी काळात नांदेड शहरावरील जलसंकट मात्र आणखी गडद होत आहे.महावितरणची महापालिकेला नोटीसमहापालिकेकडे थकीत असलेल्या वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने महापालिकेला नोटीस बजावली आहे. महापालिकेकडे महावितरणची ८ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. महापालिका दरमहा काही रक्कम महावितरणकडे भरत असते. प्रतिमाह जवळपास सव्वाकोटी रुपये वीजबिल महापालिकेला येत असते. यातील ५० टक्के रक्कम भरणे अपेक्षित आहे. मात्र महापालिका २५ ते ३० लाख रुपये भरते. ३१ जानेवारीपर्यंत वीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :NandedनांदेडArun Dongareअरुण डोंगरेWaterपाणीelectricityवीज