शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

मग्रारोहयोची कामे नसल्याने मजूर परप्रांतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:16 IST

किनवट या आदिवासी तालुक्यात १९१ गावे, १०५ वाडी- तांडे असून या गाव व वाडी- तांड्याचा कारभार १३४ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ...

किनवट या आदिवासी तालुक्यात १९१ गावे, १०५ वाडी- तांडे असून या गाव व वाडी- तांड्याचा कारभार १३४ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून बघितला जातो. मात्र, मग्रारोहयोच्या कामावर मजुरांची वानवा असल्याने मजुरांचा फुगलेला आकडा पाहता कामे उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीची व यंत्रणेची उदासीनता की मजुरांची या योजनेच्या कामाकडे पाठ, हे समजायला मार्ग नाही. यंत्रणेची केवळ २१ कामे सुरू असून त्यात केवळ पाच कामे रोपवाटिकेची आहेत. ग्रामपंचायतीच्या कामात घरकुल, सार्वजनिक विहीर, सिंचन विहीर, अनगड दगडी बांध ही व इतर कामे सुरू आहेत.

१३४ ग्रामपंचायतींपैकी केवळ ३४ ग्रामपंचायतींच्या हद्दीत ही कामे सुरू असून १०० ग्रामपंचायतींत अजून एकही काम सुरू नसल्याची माहिती आहे. सध्या बोथ, फुलेनगर, टेम्भी, जरूर, उनकदेव, उमरी (बा.), शिवणी, लोणी, थारा यासह ३४ ग्रामपंचायतींच्या हद्दीत कामे सुरू आहेत. हाताला कामे नसल्याने बरेच मजूर सीमावर्ती तेलंगणाच्या आदिलाबाद व इतर गावांत काम करण्यासाठी स्थलांतरित झालेले आहेत. ३४ ग्रामपंचायतींच्या हद्दीत जी कामे सुरू आहेत त्या कामावर जेमतेम मजूर आहेत.

याबाबत बीडीओ सुभाष धनवे यांना विचारले असता सध्या कामांची मागणी नाही. मार्चपासून तर कामे मोठ्या प्रमाणावर सुरू होतील, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.