शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

नांदेडात शाळांच्या दुर्लक्षामुळे ७२ हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड ‘इनव्हॅलिड’

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: March 20, 2024 18:28 IST

३१ मार्चपर्यंत व्हॅलिड न केल्यास शासनाच्या सर्वच योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार

नांदेड : राज्याच्या वित्त विभागाने स्पष्ट आदेश दिलेले असताना शाळा प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील ७२ हजार ९७० विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व्हॅलिडच केले नसल्याची बाब समोर आली आहे. ३१ मार्चपर्यंत आधार व्हॅलिड न केल्यास १ एप्रिलपासून संबंधित विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्वच योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ११ मे २०२२ रोजी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचा डेटाबेस तयार करून तो आधारशी संलग्नीकृत करण्यात यावा तसेच पोषण आहार योजनेंतर्गत महिला व बालविकास, शालेय शिक्षण व क्रीडा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, आदिवासी विकास आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागांनी पोषण आहाराशी संबंधित सर्व लाभार्थ्यांची नावे आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करूनच संबंधित योजनांना निधी वितरित करण्यात यावा, असे या निर्णयात म्हटले होते. जिल्ह्यात युडायसनुसार ६ लाख ३८ हजार ९९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, त्यापैकी ५ लाख ६६ हजार २० विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन झाले आहे, तर ७२ हजार ९७० विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्यापही व्हॅलिड करणे बाकी आहे. युडायसप्रमाणे आधार व्हॅलिडेशनचे प्रमाण ८८.५८ टक्के इतके असून, यापुढे आधार व्हॅलिड विद्यार्थीसंख्येवरच शाळांना अनुदान मिळणार आहे.

सरल पोर्टलवर ९४ टक्के आधार व्हॅलीडेशनसरल पोर्टलवर एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ६ लाख २३ हजार ६५८ विद्यार्थ्यांनी आधार व्हॅलिड केले असून, ३९ हजार ७३३ विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड करणे बाकी आहे. सरल पोर्टलवर याचे प्रमाण ९४.०१ टक्के इतके आहे, तर सरल आणि युडायसप्रमाणे ६७ हजार २३९ विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड झालेच नाहीत.

१ एप्रिलपासून लाभ होणार बंदशासनाच्या विविध विभागातील वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभधारक, लाभार्थ्यांचे आधार कार्डशी संलग्नीकरण करण्याची कार्यवाही शंभर टक्के ३१ मार्च २०२४ पर्यंत करण्याचे आदेश वित्त विभागाने दिले आहेत. ही कार्यवाही शंभर टक्के करण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या सचिवांवर राहणार असून, शंभर टक्के कार्यवाहीनंतर हमीपत्र सादर करावे लागणार आहे. आधार कार्ड व्हॅलिडची कार्यवाही शंभर टक्के न झाल्यास संबंधित योजनांचा निधी १ एप्रिल २०२४ पासून वितरित करण्यात येणार नसल्याचे या निर्णयात म्हटले आहे.

व्हॅलिड कसे समजायचे नावजन्मतारखेत चूक किंवा नावातील स्पेलिंगमध्ये चूक असली तर ते आधार कार्ड इनव्हॅलिड ठरते. त्यामुळे आवश्यक कार्यवाही शाळांना करावी लागेल. आधारवरील स्पष्ट नोंद शाळांनी यू-डायसमधील माहितीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय आधार व्हॅलिड समजले जात नाही.

युडायस व्हॅलिड नसलेले तालुकानिहाय आधार कार्डनांदेड ग्रामीण ९४१६, मुखेड ८२९९, नांदेड शहर २२,८६९, भोकर ४१८९, हिमायतनगर ३१३८, मुदखेड ३८१६, लोहा ५०४०, हदगाव ३८२०, कंधार २०७९, उमरी ८०३, किनवट २७०३, धर्माबाद १०१५, नायगाव २३४४, अर्धापूर ६७८, देगलूर १३९१, बिलोली ८६३, माहुर ५०७ असे तालुकानिहाय आधार कार्ड अद्यापही व्हॅलिड नाहीत.

अन्यथा शाळांना अनुदान नाही शाळांना गणवेश, शालेय पोषण आहार, पाठ्यपुस्तके तसेच सर्व प्रकारचे अनुदान मिळण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन करावे, अन्यथा कुठल्याच प्रकारचे अनुदान मिळणार नाही.-सविता बिरगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

टॅग्स :Educationशिक्षणNandedनांदेड