शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नांदेडात शाळांच्या दुर्लक्षामुळे ७२ हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड ‘इनव्हॅलिड’

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: March 20, 2024 18:28 IST

३१ मार्चपर्यंत व्हॅलिड न केल्यास शासनाच्या सर्वच योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार

नांदेड : राज्याच्या वित्त विभागाने स्पष्ट आदेश दिलेले असताना शाळा प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील ७२ हजार ९७० विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व्हॅलिडच केले नसल्याची बाब समोर आली आहे. ३१ मार्चपर्यंत आधार व्हॅलिड न केल्यास १ एप्रिलपासून संबंधित विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्वच योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ११ मे २०२२ रोजी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचा डेटाबेस तयार करून तो आधारशी संलग्नीकृत करण्यात यावा तसेच पोषण आहार योजनेंतर्गत महिला व बालविकास, शालेय शिक्षण व क्रीडा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, आदिवासी विकास आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागांनी पोषण आहाराशी संबंधित सर्व लाभार्थ्यांची नावे आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करूनच संबंधित योजनांना निधी वितरित करण्यात यावा, असे या निर्णयात म्हटले होते. जिल्ह्यात युडायसनुसार ६ लाख ३८ हजार ९९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, त्यापैकी ५ लाख ६६ हजार २० विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन झाले आहे, तर ७२ हजार ९७० विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्यापही व्हॅलिड करणे बाकी आहे. युडायसप्रमाणे आधार व्हॅलिडेशनचे प्रमाण ८८.५८ टक्के इतके असून, यापुढे आधार व्हॅलिड विद्यार्थीसंख्येवरच शाळांना अनुदान मिळणार आहे.

सरल पोर्टलवर ९४ टक्के आधार व्हॅलीडेशनसरल पोर्टलवर एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ६ लाख २३ हजार ६५८ विद्यार्थ्यांनी आधार व्हॅलिड केले असून, ३९ हजार ७३३ विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड करणे बाकी आहे. सरल पोर्टलवर याचे प्रमाण ९४.०१ टक्के इतके आहे, तर सरल आणि युडायसप्रमाणे ६७ हजार २३९ विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड झालेच नाहीत.

१ एप्रिलपासून लाभ होणार बंदशासनाच्या विविध विभागातील वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभधारक, लाभार्थ्यांचे आधार कार्डशी संलग्नीकरण करण्याची कार्यवाही शंभर टक्के ३१ मार्च २०२४ पर्यंत करण्याचे आदेश वित्त विभागाने दिले आहेत. ही कार्यवाही शंभर टक्के करण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या सचिवांवर राहणार असून, शंभर टक्के कार्यवाहीनंतर हमीपत्र सादर करावे लागणार आहे. आधार कार्ड व्हॅलिडची कार्यवाही शंभर टक्के न झाल्यास संबंधित योजनांचा निधी १ एप्रिल २०२४ पासून वितरित करण्यात येणार नसल्याचे या निर्णयात म्हटले आहे.

व्हॅलिड कसे समजायचे नावजन्मतारखेत चूक किंवा नावातील स्पेलिंगमध्ये चूक असली तर ते आधार कार्ड इनव्हॅलिड ठरते. त्यामुळे आवश्यक कार्यवाही शाळांना करावी लागेल. आधारवरील स्पष्ट नोंद शाळांनी यू-डायसमधील माहितीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय आधार व्हॅलिड समजले जात नाही.

युडायस व्हॅलिड नसलेले तालुकानिहाय आधार कार्डनांदेड ग्रामीण ९४१६, मुखेड ८२९९, नांदेड शहर २२,८६९, भोकर ४१८९, हिमायतनगर ३१३८, मुदखेड ३८१६, लोहा ५०४०, हदगाव ३८२०, कंधार २०७९, उमरी ८०३, किनवट २७०३, धर्माबाद १०१५, नायगाव २३४४, अर्धापूर ६७८, देगलूर १३९१, बिलोली ८६३, माहुर ५०७ असे तालुकानिहाय आधार कार्ड अद्यापही व्हॅलिड नाहीत.

अन्यथा शाळांना अनुदान नाही शाळांना गणवेश, शालेय पोषण आहार, पाठ्यपुस्तके तसेच सर्व प्रकारचे अनुदान मिळण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन करावे, अन्यथा कुठल्याच प्रकारचे अनुदान मिळणार नाही.-सविता बिरगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

टॅग्स :Educationशिक्षणNandedनांदेड