शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अतिवृष्टीची कंपनीकडून महिनाभराने पाहणी, शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान अन् घेऊन आले १२ नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 19:37 IST

अतिवृष्टीच्या पाहणीची कंपनीला महिनाभराने जाग; दोन हजार शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पोर्टलवर ऑनलाइन नोंदी केल्या असताना १२ शेतकऱ्यांची नावे कशी, अशी प्रश्नांची सरबत्ती कर्मचाऱ्यांवर केली.

- गोविंद शिंदेबारूळ (ता. कंधार) : कंधार तालुक्यातील बारूळ, मजरे वरवंट शिवारात १ आणि २ सप्टेंबर असे सलग दोन दिवस अतिवृष्टीमुळे परिसरातील जवळपास दोन हजार शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकाचे मातेरं झाले होते. शासनाच्या निर्देशानुसार ७२ तासांच्या आत १९४७ शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रारी नोंदविल्या; परंतु त्याच्या तब्बल २६ दिवसांनंतर पीक विमा कंपनीला या गावात नुकसानीची पाहणी करण्याची जाग आली. त्यानंतर सोमवारी गावात आलेल्या पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फक्त १२ शेतकऱ्यांच्या नावाची यादी घेऊन आल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला.

जिल्ह्यात १ आणि २ सप्टेंबरला अनेक मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. शासनाने नुकसानीची माहिती पीक विमा कंपनीला ७२ तासांच्या आत कळवावे, असे बंधन टाकले. त्यानुसार बारूळ परिसरातील १९४७ शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे ऑनलाइन नोंदी केल्या. एक ते दोन दिवसांत पीक विमा कंपनीचे कर्मचारी गावात नुकसानीची पाहणी करण्यासाठी येतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु तब्बल २६ दिवसांनंतर पीक विमा कंपनीचे कर्मचारी गावात प्रकटले. त्यामुळे महिनाभरानंतर आता शेतातील अतिवृष्टीची काय पाहणी करणार? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. यावेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्यासोबत केवळ १२ शेतकऱ्यांच्या नावाची यादी आणली होती. कंपनीकडून या १२ शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मात्र शेतकऱ्यांचा पारा चांगलाच चढला.

दोन हजार शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पोर्टलवर ऑनलाइन नोंदी केल्या असताना १२ शेतकऱ्यांची नावे कशी, अशी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने पीक विमा कर्मचाऱ्यांना सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, पीक विमा कंपनीच्या महिनाभरानंतर उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार म्हणजे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाNandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी