शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

नांदेड जिल्ह्यात ९ हजार गुरुजी शोधणार शाळाबाह्य मुले; साडेपाच लाख कुटूंबांचे करणार सर्वेक्षण

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: July 4, 2024 19:36 IST

वीटभट्टी तसेच वाडी, तांड्यावरील तसेच कारखाने व अन्य कुठल्याच ठिकाणची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात येते.

नांदेड : अनियमित व स्थलांतरित कोणतेही मूल शाळेपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यात ५ जुलै ते २० जुलै २०२४ या कालावधीत शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी नांदेड जिल्ह्यात तब्बल ९ हजार गुरुजी जिल्ह्यातील ५ लाख ४७ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करणार आहेत.

वीटभट्टी तसेच वाडी, तांड्यावरील तसेच कारखाने व अन्य कुठल्याच ठिकाणची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात येते. यावर्षीही तब्बल १५ दिवस शाळाबाह्य शोधमोहीम राबविण्यात येत आहे. एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, हा मुख्य उद्देश आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक, वीटभट्ट्या, कारखाने,  ऊसतोड कामगार  तसेच अन्य १२१ ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे.

गतवर्षी सापडली होती ५६ शाळाबाह्य मुले गतवर्षी जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून राबविण्यात आलेल्या शाळाबाह्य मोहिमेत तब्बल ५६ विद्यार्थी शाळाबाह्य सापडली होती. सदर मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठ्यपुस्तके, गणवेश यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत. 

शाळा सुरू होण्याच्या प्रारंभी मोहीम यापूर्वीही स्थलांतरित आणि शिक्षणाच्या प्रवाहात नसलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यात सर्वेक्षण केले जायचे; पण त्यावेळी शाळाबाह्य मुले शोधूनही त्यांना शाळेत टाकण्यासाठी अर्धे शैक्षणिक सत्र संपायचे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी यावर्षी सत्राच्या प्रारंभीच ही शोधमोहीम सुरू केली आहे.

जिल्ह्यात जवळपास ३५० वीटभट्ट्या नांदेड जिल्ह्यातील ५ लाख ४७  हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याशिवाय नांदेड शहर व जिल्ह्यात ३५० पेक्षा अधिक वीटभट्ट्या आहेत. तेथे काम करणाऱ्या वीटभट्टी कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये,  यासाठी या वीटभट्ट्यांवर गुरुजी प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. याशिवाय साखर कारखाने, गुऱ्हाळ अशा १२१ ठिकाणांचे सर्वेक्षण करून शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात येणार आहे. दरम्यान प्रशासनाकडून दरवर्षी शाळाबाह्य मुलांच्या शोधासाठी मोहीम राबवली जाते. त्यात शाळाबाह्य मुलेही आढळतात. परंतु काही दिवस शाळेत आल्यानंतर पालकांचे स्थलांतर झाल्यास ही मुले परत दुसऱ्या गावी जातात.

टॅग्स :NandedनांदेडStudentविद्यार्थीEducationशिक्षण