शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

नांदेड जिल्ह्यात ९ हजार गुरुजी शोधणार शाळाबाह्य मुले; साडेपाच लाख कुटूंबांचे करणार सर्वेक्षण

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: July 4, 2024 19:36 IST

वीटभट्टी तसेच वाडी, तांड्यावरील तसेच कारखाने व अन्य कुठल्याच ठिकाणची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात येते.

नांदेड : अनियमित व स्थलांतरित कोणतेही मूल शाळेपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यात ५ जुलै ते २० जुलै २०२४ या कालावधीत शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी नांदेड जिल्ह्यात तब्बल ९ हजार गुरुजी जिल्ह्यातील ५ लाख ४७ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करणार आहेत.

वीटभट्टी तसेच वाडी, तांड्यावरील तसेच कारखाने व अन्य कुठल्याच ठिकाणची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात येते. यावर्षीही तब्बल १५ दिवस शाळाबाह्य शोधमोहीम राबविण्यात येत आहे. एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, हा मुख्य उद्देश आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक, वीटभट्ट्या, कारखाने,  ऊसतोड कामगार  तसेच अन्य १२१ ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे.

गतवर्षी सापडली होती ५६ शाळाबाह्य मुले गतवर्षी जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून राबविण्यात आलेल्या शाळाबाह्य मोहिमेत तब्बल ५६ विद्यार्थी शाळाबाह्य सापडली होती. सदर मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठ्यपुस्तके, गणवेश यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत. 

शाळा सुरू होण्याच्या प्रारंभी मोहीम यापूर्वीही स्थलांतरित आणि शिक्षणाच्या प्रवाहात नसलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यात सर्वेक्षण केले जायचे; पण त्यावेळी शाळाबाह्य मुले शोधूनही त्यांना शाळेत टाकण्यासाठी अर्धे शैक्षणिक सत्र संपायचे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी यावर्षी सत्राच्या प्रारंभीच ही शोधमोहीम सुरू केली आहे.

जिल्ह्यात जवळपास ३५० वीटभट्ट्या नांदेड जिल्ह्यातील ५ लाख ४७  हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याशिवाय नांदेड शहर व जिल्ह्यात ३५० पेक्षा अधिक वीटभट्ट्या आहेत. तेथे काम करणाऱ्या वीटभट्टी कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये,  यासाठी या वीटभट्ट्यांवर गुरुजी प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. याशिवाय साखर कारखाने, गुऱ्हाळ अशा १२१ ठिकाणांचे सर्वेक्षण करून शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात येणार आहे. दरम्यान प्रशासनाकडून दरवर्षी शाळाबाह्य मुलांच्या शोधासाठी मोहीम राबवली जाते. त्यात शाळाबाह्य मुलेही आढळतात. परंतु काही दिवस शाळेत आल्यानंतर पालकांचे स्थलांतर झाल्यास ही मुले परत दुसऱ्या गावी जातात.

टॅग्स :NandedनांदेडStudentविद्यार्थीEducationशिक्षण