शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
2
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
5
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
6
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
7
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
8
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
9
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
10
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
11
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
12
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
13
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
14
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
15
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
16
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
17
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
18
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
19
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
20
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...

फोडणीच्या भातातून ९ जणांना विषबाधा; अर्धापूर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 18:58 IST

विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.

- गोविंद टेकाळेअर्धापूर (नांदेड) : फोडणीचा भात खाल्ल्याने ९ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील आमराबाद तांडा ता. अर्धापूर येथे घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. त्यांना उपचारासाठी  नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पुढे येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्धापूर तालुक्यातील आमराबाद तांडा येथे बुधवारी सकाळी काही जणांनी शिळा भात फोडणी देऊन खाल्ला. काही वेळातच काहींना उलटी, मळमळ तसेच पोटदुखीचा त्रास सुरू झाला. यापैकी अनेकांनी बारड अर्धापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. औषधी घेऊन घरी परतले पण तब्येतीवर कुठलाही फरक न पडल्याने त्यांनी गुरुवारी रात्री आरोग्य विभागाच्या १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधून नांदेड विष्णुपुरी येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय गाठले.

विषबाधा झालेल्यांमध्ये राजू गुलाब पवार (वय ४०), संजय गुलाब पवार (वय ४२), स्वीटी राजू पवार (वय ११), धनश्री संजय पवार (वय ११), वंश राजू पवार (वय ५), वैष्णवी संजय पवार (वय १२), सुजाता संजय पवार  (वय ३५), पूर्वी राजू पवार  (वय १३), उषा राजू पवार (वय ३१) आदी रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, घटना समजल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, सा.जि.आरोग्य अधिकारी डॉ.संतोष सूर्यवंशी, अर्धापूर ता. आरोग्य अधिकारी डॉ.श्रीकांत देसाई, गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम, वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब पवार,वि.आ. डॉ.एस.पी.गोखले, ग्रामपंचायत अधिकारी डी.व्ही. देशमुख, सरपंच अश्विन पवार आदींनी रुग्णालयात धाव घेऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच त्यांची प्रकृती जाणून घेतली.

पावसाळ्यात बाहेरचे अन्न खाण्यापूर्वी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच शिळे अन्न खाणे टाळावे. यावेळी गावातील नागरिकांची तपासणी करण्यात आली, सार्वजनिक स्त्रोताचे शुद्धीकरण करण्यात आले व नाले स्वच्छ करण्यात आली.- डॉ.श्रीकांत देसाई, आरोग्य अधिकारी ता.अर्धापूर

टॅग्स :Nandedनांदेडfood poisoningअन्नातून विषबाधा