शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

फोडणीच्या भातातून ९ जणांना विषबाधा; अर्धापूर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 18:58 IST

विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.

- गोविंद टेकाळेअर्धापूर (नांदेड) : फोडणीचा भात खाल्ल्याने ९ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील आमराबाद तांडा ता. अर्धापूर येथे घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. त्यांना उपचारासाठी  नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पुढे येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्धापूर तालुक्यातील आमराबाद तांडा येथे बुधवारी सकाळी काही जणांनी शिळा भात फोडणी देऊन खाल्ला. काही वेळातच काहींना उलटी, मळमळ तसेच पोटदुखीचा त्रास सुरू झाला. यापैकी अनेकांनी बारड अर्धापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. औषधी घेऊन घरी परतले पण तब्येतीवर कुठलाही फरक न पडल्याने त्यांनी गुरुवारी रात्री आरोग्य विभागाच्या १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधून नांदेड विष्णुपुरी येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय गाठले.

विषबाधा झालेल्यांमध्ये राजू गुलाब पवार (वय ४०), संजय गुलाब पवार (वय ४२), स्वीटी राजू पवार (वय ११), धनश्री संजय पवार (वय ११), वंश राजू पवार (वय ५), वैष्णवी संजय पवार (वय १२), सुजाता संजय पवार  (वय ३५), पूर्वी राजू पवार  (वय १३), उषा राजू पवार (वय ३१) आदी रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, घटना समजल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, सा.जि.आरोग्य अधिकारी डॉ.संतोष सूर्यवंशी, अर्धापूर ता. आरोग्य अधिकारी डॉ.श्रीकांत देसाई, गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम, वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब पवार,वि.आ. डॉ.एस.पी.गोखले, ग्रामपंचायत अधिकारी डी.व्ही. देशमुख, सरपंच अश्विन पवार आदींनी रुग्णालयात धाव घेऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच त्यांची प्रकृती जाणून घेतली.

पावसाळ्यात बाहेरचे अन्न खाण्यापूर्वी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच शिळे अन्न खाणे टाळावे. यावेळी गावातील नागरिकांची तपासणी करण्यात आली, सार्वजनिक स्त्रोताचे शुद्धीकरण करण्यात आले व नाले स्वच्छ करण्यात आली.- डॉ.श्रीकांत देसाई, आरोग्य अधिकारी ता.अर्धापूर

टॅग्स :Nandedनांदेडfood poisoningअन्नातून विषबाधा