शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

८५ वर्षाचा हरा बुढ्ढा पदयात्रेतून करतोय जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 18:29 IST

अखेरच्या श्वासापर्यंत हे कार्य सुरुच ठेवण्याचा दृढ निश्चय

ठळक मुद्देप्रसाद घ्या अन् वृक्षसंवर्धन करादिले तर खायचे़

- शिवराज बिचेवार

नांदेड : गेल्या ५० वर्षापासून पदयात्रा, मंदिरे, शाळा, महाविद्यालय यासह गर्दी जमेल त्या ठिकाणी बेटी बचाव, बेटी पढाव, जलजागृती, वृक्षारोपन अशा विषयावर लोकांच्या मनाला भिडणाऱ्या शब्दात ८५ वर्षांचा हरा बुढ्ढा हा जनजागृती करतोय़ कोणत्याही स्वार्थाविना लोकांना जागे करण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत हे कार्य सुरुच ठेवण्याचा दृढ निश्चयही त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होता़

जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झालेले अनंत श्रीनिवासराव करजगीकर यांना समाजसेवेचा बाळकडू त्यांची आई मालतीबाई यांच्याकडून मिळाले़ कुष्ठरोग निर्मुलनासाठी मालतीबाई यांनी देगलूर तालुक्यात मोठे काम केले आहे़ त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून गेल्या ५० वर्षापासून अनंत करजगीकर हे राज्यात अनेक ठिकाणी एक रुपयाही मानधन न स्विकारता जनजागृती करतात़ ८५ व्या वर्षातील त्यांचा उत्साह पाहून त्यांना प्रत्येकजण हरा बुढ्ढा या नावानेच ओळखतो़ मालेगाव रस्त्यावरील श्री गजानन मंदिर संस्थानच्या दरवर्षी निघणाऱ्या शेगावच्या पदयात्रेत करजगीकर नित्यनेमाने सहभागी होतात़ हातात बेटी बचाव, बेटी पढाव, जल है तो कल है चे फलक घेऊन ते मार्गातील प्रत्येक ठिकाणी लोकांशी संवाद साधतात़ त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांमध्ये भेटी देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज करतात़ आजपर्यंत त्यांचे जवळपास ४०० लेखही प्रकाशित झाले आहेत़ 

प्रसाद घ्या अन् वृक्षसंवर्धन करामालेगाव रोडवरील श्री गजानन महाराज संस्थानात दर गुरुवारी प्रसाद वाटपाची जबाबदारी ही करजगीकर यांच्यावर असते़ आरतीनंतर बाहेर पडणाऱ्या भाविकांना प्रसाद वाटप करतानाही ते वृक्षसंवर्धन करा, बेटी बचाव, बेटी पढाव असा संदेश देतात़ मंदिरातही त्यांनी ठिकठिकाणी तसे फलक लावले आहेत़ त्याचबरोबर रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर असेल त्या ठिकाणी स्वताहून ते उपस्थित राहून लोकांना रक्तदानासाठी आवाहन करतात़ शहरात असलेल्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमातही त्यांचा जनजागृतीचा उपक्रम सुरुच असतो़ त्यामुळे परिसरात आता ते सर्वांना परिचयाचे झाले आहेत़ 

दिले तर खायचे़जनजागृतीसाठी फिरत असताना कुणालाही काही मागायचे नाही़ दिले तर खायचे पण तिथे सेवा द्यायची़ असा नियम करजगीकर यांनी स्वत:ला घालून घेतला आहे़ नांदेडात भावाच्या घरी ते राहतात़ जिल्ह्यात माजी खा़डॉ़व्यंकटेश काब्दे यांच्यासोबत काम करताना त्यांनी अनेक मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन केले होते़त्याचबरोबर कृष्ठरोग निर्मुलन यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत़ नदीजोड प्रकल्पासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे़ हा प्रकल्प शासनाने न राबविता तो लोकांकडून करुन घ्यावा असे करजगीकर यांचे मत आहे़ 

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवकNandedनांदेड