शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

किनवट तालुक्यातील १९ प्रकल्पांमध्ये ७.२३ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:25 IST

जून महिन्याची २५ तारीख उजाडली तरी किनवट तालुक्यातील १९ प्रकल्पांत सरासरी ७.२३ टक्के इतकाच जलसाठा आहे. दहा प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे.

किनवट : जून महिन्याची २५ तारीख उजाडली तरी किनवट तालुक्यातील १९ प्रकल्पांत सरासरी ७.२३ टक्के इतकाच जलसाठा आहे. दहा प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. एक मध्यम प्रकल्पही जोत्याखाली येण्याच्या स्थितीत असल्याने मोठा पाऊस वेळीच झाला नाही तर भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.कधी नव्हे ते यावर्षी प्रकल्पातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. २०१८ च्या पावसाळ्यात झालेला कमी पाऊस हे त्याला कारणीभूत आहे. तर बहुतांश प्रकल्पांत पाणी कमी, गाळाचे प्रमाण अधिक असल्याने प्रकल्प कोरड्या स्थितीत दिसून येत आहेत.तालुक्यातील कुपटी, मुळझरा, थोरा, जलधारा, नांदगाव, अंबाडी, वरसांगवी, सावरगाव, शिरपूर, मांडवी या दहा प्रकल्पांनी तळ गाठला आहे. जोत्याखाली पाणी आले आहे तर डोंगरगाव या मध्यम प्रकल्पातही केवळ १.२३ टक्के इतकाच जलसाठा आहे. त्यामुळे वेळीच मोठा पाऊस पडला नाही तर हा प्रकल्पही जोत्याखाली येण्यास वेळ लागणार नाही.सद्य:स्थितीत असलेला प्रकल्पनिहाय जलसाठा याप्रमाणे-नागझरी (१६.००), लोणी (१९.१३), निचपूर (१६.६६), सिंदगी (१६.९४), हुडी (१०.३८), पिंपळगाव (की) (१०.६६), निराळा (३६.७०), पिंपळगाव (भि) (९.६८).१८ प्रकल्पांत सद्य:स्थितीत केवळ ७ टक्के इतकाच जलसाठा आहे, हे विशेष! रोहिणी, मृग हे नक्षत्र कोरडे गेले आहे. आता २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्र सुरु झाले आहे. किनवट तालुक्यातील शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.किनवट तालुक्यात १९१ गावे, १०५ वाडीतांडे असून वार्षिक पर्जन्यमान सरासरी १ हजार २४० मिलीमीटर इतके आहे. ८२ हजार ३६० हेक्टर इतके खरीप हंगामासाठी सर्वसाधारण क्षेत्र असून जूनअखेरपर्यंत १७७ मिमी इतका पाऊस पडावयास हवा आहे़ पण, आजही पावसाची प्रतिक्षा आहे़

टॅग्स :Nandedनांदेडwater shortageपाणीटंचाईDamधरण