शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

लेंडी प्रकल्पासाठी ७० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:32 AM

राज्य सरकारने ९ मार्च रोजी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला़ त्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील बहुचर्चित लेंडी प्रकल्पातील बाधित १ हजार ३१० कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी ७० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आ़ डॉ. तुषार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली़ दरम्यान, मुक्रमाबाद येथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

ठळक मुद्देमुखेड तालुका : १३१० बाधित कुटुंबांची ९३ कोटींची मागणी, मुक्रमाबादेत फटाके फोडून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कमुखेड : राज्य सरकारने ९ मार्च रोजी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला़ त्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील बहुचर्चित लेंडी प्रकल्पातील बाधित १ हजार ३१० कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी ७० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आ़ डॉ. तुषार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली़ दरम्यान, मुक्रमाबाद येथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.तालुक्यातील गोणेगाव येथील लेंडी नदीवर होऊ घातलेले लेंडी धरण विविध कारणांनी चर्चेत आहे़ मागील ३२ वर्षांपासून धरणाचे काम रखडल्याने १२ गावच्या बाधित कुटुंबांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. गत ३० वर्षांपासून या भागाचा विकास खुंटला आहे. मुक्रमाबाद येथील १ हजार ३१० बाधित कुटुंबांनी ्रपुनर्वसन करण्यात यावे, यासाठी १२ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको केला होता. मावेजा मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला; पण आ़ डॉ. तुषार राठोड यांनी त्या ठिकाणी जाऊन मध्यस्ती करुन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व येणाºया ९० दिवसांत मावेजा मिळवून देणार अन्यथा स्वत: आमरण उपोषण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते़ त्याच मुद्यावर आ़ डॉ. राठोड यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व जलसपंदामंत्री गिरीष महाजन यांच्याकडे २०० कोटी रुपयांची मागणी केली होती़ या मागणीस मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.मागील अर्थसंकल्पात ५० कोटी रुपये मंजूर झाले होते. मागील रक्कमेपैकी २० कोटी खर्च झालेले असून उर्वरित ३० कोटी अखर्चिक आहेत. तसेच या अर्थसंकल्पातील ७० कोटी व मागील ३० कोटी असे मिळून १०० कोटी रुपये लाभार्थ्यांच्या मावेजासाठी देणार असल्याचे सांगितले़ लाभार्थ्यांची मागणी ही ९३़४ कोटी रुपयांची आहे. त्यामुळे सर्वांना मावेजा मिळेलच व उर्वरित रकमेत बुडीत क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन करुन नागरी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. येत्या २ वर्षांत या लेंडी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी, महसूल विभाग प्रयत्न करणार आहे.आजपर्यंतच्या इतिहासात ७० कोटी रुपयांची सर्वात मोठी तरतूद शासनाकडून करण्यात आली असून मागील काळातील २०१५ च्या अर्थसंकल्पात ३० कोटी, २०१६ च्या अर्थसंकल्पात २६ कोटी, २०१७ च्या अर्थसंकल्पात ५० कोटी तर २०१८ च्या अर्थसंकल्पात ७० कोटी रुपये असे एकूण १७६ कोटी रुपये आणल्याचे आ़ डॉ. तुषार राठोड यांनी सांगितले. मागील ३२ वर्षांच्या कालखंडात तत्कालीन लोकप्रतिनिधींनी केवळ ३५० कोटी रुपये या प्रकल्पासाठी आणले होते. या धरणाचा एकूण खर्च १३९९़८ कोटी रुपये आहे़ तर राज्य सरकारचा या धरणाचा खर्च ६२ टक्के तर उर्वरित ३८ टक्के खर्च हा तेलंगणा राज्याने करावयाचा आहे.दरम्यान, मुक्रमाबाद येथे शासनाकडून लेंडी प्रकल्पास मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार असल्याने आनंद साजरा करण्यात आला़ अनेकांनी फटाके फोडून जल्लोष केला़ मागील ३० वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता पूर्णत्वास जाणार असल्याने या भागातील विकासाचा मार्र्ग मोकळा झाला आहे़