शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

‘सौभाग्य’ योजनेद्वारे नांदेड जिल्ह्यातील साडेपाच हजार कुटुंबांना मिळणार वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 6:19 PM

‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात अद्यापपर्यंत वीज न पोहोचलेल्या ५ हजार ५२५ कुटुंबाना वीजजोडणी देवून त्यांचे जीवनमान प्रकाशमान करण्याचे काम महावितरणच्या माध्यमातून केले जाणार आहे.

नांदेड : ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात अद्यापपर्यंत वीज न पोहोचलेल्या ५ हजार ५२५ कुटुंबाना वीजजोडणी देवून त्यांचे जीवनमान प्रकाशमान करण्याचे काम महावितरणच्या माध्यमातून केले जाणार आहे.

नागरिकांना २४ तास वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने ‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थात 'सौभाग्य' योजना सुरू केली. योजनेंतर्गत डिसेंबर-२०१८ पर्यंत सर्व गावांमध्ये वीज पोहोचविण्याचे अभियान सुरू करण्यात आले असून त्या अनुषंगाने महावितरणने कामे करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात वीज जोडणीपासून अद्यापपर्यंत वंचीत असलेल्या ५ हजार ५२५ कुटुंबियांना वीजजोडणी देण्यासाठी ५१ कोटी १३ लाख रूपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये भोकर विभागातील २ हजार १२४ कुटुंबाचा तर नांदेड शहर विभागातील ३२३ आणि नांदेड ग्रामीण विभागातील ३ हजार ७८ कुटुंबांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व कुटुंबांना वीजपुरवठा देण्यासाठी २१४ किलोमिटरची उच्चदाब वाहिनी तसेच ५४८ कि.मी.ची लघूदाब वाहिनींचा समावेश असून तब्बल १ हजार २५५ रोहित्रांची उभारणी योजनेंतर्गत केली जाणार आहे. 

सदर योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना (दारिद्र्य रेषेखालील) कुटुंबांना मोफत वीज जोडणीसोबतच ९ वॅटचा एक एलईडी बल्ब आणि एक पिनपॉईंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे. तर वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना ५०० रुपयांमध्ये वीजपुरवठा दिला जाणार असून हे शुल्कही नियमित वीजबिलांसोबत १० सामान हप्त्यांत भरावयाचे आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणNandedनांदेड