शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कंधार तालुक्यातील ५४ शाळा क्रीडांगणाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:40 IST

नादुरुस्त व धोकादायक वर्गखोल्याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत असताना अध्ययनाने आलेला बौद्धिक, मानसिक थकवा दूर करणारा खेळ खेळण्यासाठी ५४ शाळांतील विद्यार्थ्यांना क्रीडांगण नाही.

ठळक मुद्देक्रीडाक्षेत्रात मरगळ जिल्हा परिषदेचा कानाडोळा

कंधार : तालुक्यात जि.प.शाळांची संख्या १८८ आहे. नादुरुस्त व धोकादायक वर्गखोल्याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत असताना अध्ययनाने आलेला बौद्धिक, मानसिक थकवा दूर करणारा खेळ खेळण्यासाठी ५४ शाळांतील विद्यार्थ्यांना क्रीडांगण नाही. त्यामुळे खेळाचा आनंद लुटता येत नाही.तालुक्यातील जि.प.शाळा ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबांना मोठा आधारवड देणारे, संस्कारमय, नीतिमूल्ये संवर्धन केंद्र मानले जाते. परंतु, या शाळा नानाविध भौतिक सुविधेअभावी चर्चेत येत असल्याचे चित्र आहे. ८५९ वर्गखोल्या असलेल्या या शाळा मोठ्या प्रमाणात नादुरुस्त, धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. पालकांना शेती, मजुरीपेक्षा सारे लक्ष शाळेतील मुलांकडे देण्याची वेळ आली आहे. त्यातच अध्ययनाने आलेला बौद्धिक, मानसिक थकवा दूर करण्यासाठी मैदानाचा अभाव असल्याने नवीन भर पडली आहे.तालुक्यातील ५४ शाळेला क्रीडांगण नाही. खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मोठा वाव असतो. सुप्तगुणांचा विकास, नेतृत्व, सांघिक भावना, खिलाडूवृत्ती, रोग प्रतिकार शक्ती वाढते, राष्ट्रीय एकात्मता, भावनिक विकास, शारीरिक क्षमतेचा विकास, निर्णय क्षमतेचा विकास आदी गुणांचा विकास होतो. शालेयस्तरावर मूलभूत कौशल्य शिकून खेळातील नवीन तंत्रे अवगत करत देशाचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय पातळीवर करता येते. आपल्या आवडीनुसार खेळ निवडून प्रावीन्य संपादित करता येते.खेळ कौशल्याचा पाया शालेयस्तरावर घातला जातो. परंतु मैदान नसल्याने खेळात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. अशीच स्थिती या शाळेतील विद्यार्थ्यांची झाली आहे. आॅलिम्पिक सारख्या जागतिक क्रीडा महोत्सवात भारताची स्थिती समाधानकारक नाही.मैदान असले तर क्रीडा साहित्य नाही. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ओढाताण होते. क्रीडा मार्गदर्शक योग्य मिळण्याची सोय नाही. मग क्रीडांगण नसेल तर सराव कसा करायचा? हा खरा प्रश्न आहे.शाळांच्या समस्या संपेनात !एकीकडे मैदान नसताना जि.प.च्या ९९ शाळांना सरंक्षक भिंत नाही. रात्री मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनण्याचा धोका वाढला आहे. वृक्ष लागवड केली ; पण त्याचे संवर्धन करणे कठीण होत असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांना जशा समस्या भेडसावत आहेत. तसेच ९० पेक्षा अधिक जि.प. शाळेत कार्यालय, भांडार व मुख्याध्यापक खोली नसल्याने अडचणीचा ससमिरा सहन करावा लागत आहे. खाजगी अनुदानित व विना अनुदानित शाळा पायाभूत भौतिक सुविधेत जरा बºया आहेत. परंतु खाजगी अनुदानित ८४ शाळेपैकी काही शाळेला संरक्षक भिंत नाही. तसेच मोजक्या शाळेला क्रीडांगण नाही.

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणSchoolशाळा