शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील ४५२ गावांना गारपिटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:26 IST

जिल्ह्यातील ४५२ गावांना ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तब्बल २९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्रांतील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. चार ते पाच दिवसांत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी प्राप्त होणार आहे.

ठळक मुद्दे२९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्र बाधित : नुकसानीच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील ४५२ गावांना ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तब्बल २९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्रांतील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. चार ते पाच दिवसांत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी प्राप्त होणार आहे.जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान १० तालुक्यांत गारपीट झाली. वादळीवा-यासह अवकाळी पाऊसही झाला. या पावसाने एक जण जखमी झाला आहे. गारपिटीचा सर्वाधिक फटका हदगाव तालुक्याला बसला असून तालुक्यात ७ हजार ७४३ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली. यामध्ये जिरायत क्षेत्र ७ हजार ४६९ हेक्टर, बागायत २५० आणि २४ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल किनवट तालुक्यात २ हजार ९४५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. नांदेड तालुक्यात २ हजार ७३९ क्षेत्रातील जिरायत, बागायत व फळपिके बाधित झाली आहेत.धर्माबाद तालुक्यात २ हजार ४०५ हेक्टर क्षेत्रातील पिके गारपिटीने बाधित झाली. बिलोली तालुक्यात २ हजार १९६, नायगाव तालुक्यात १ हजार ८९९, लोहा तालुक्यात १ हजार ६९२, माहूर तालुक्यात २ हजार २२३ हेक्टर, हिमायतनगर तालुक्यात १ हजार १३१ हेक्टर आणि कंधार तालुक्यात १६५ हेक्टर क्षेत्रात शेतीचे नुकसान झाले आहे.नांदेड तालुक्यात १८, धर्माबाद तालुक्यात ५६, नायगाव तालुक्यातील २३, बिलोली तालुक्यातील १२, कंधार तालुक्यातील ३४, हदगाव तालुक्यातील ४४, हिमायतनगर तालुक्यातील ४, किनवट तालुक्यातील ९५ आणि माहूर तालुक्यातील १६६ गावांना गारपिटीचा फटका बसला आहे.जिल्ह्यात गारपीट आणि विजा पडून १३ मोठी जनावरे आणि ९ लहान जनावरे दगावली आहेत. जिल्ह्यात २४ हजार ९३५ हेक्टर क्षेत्रातील जिरायत पिकांना गारपिटीचा फटका बसला आहे. तर ४ हजार १७७ बागायती क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. तर ५२३ हेक्टर क्षेत्रातील फळपिके जमीनदोस्त झाले आहेत.जिल्ह्यात गत तीन दिवसांत १८ मि़मी़पावसाची नोंद करण्यात आली आहे़ त्यात नांदेड- ५.७५ मिमी., अर्धापूर- १३.६७, मुदखेड- ७.३४, भोकर- ११.७५ मिमी., उमरी-८.००, धर्माबाद- २३.३३, नायगाव- २०.६, बिलोली- १०.८, लोहा- १५.५, कंधार- ६.८३, मुखेड- २१.२८ मिमी., देगलूर- ९.८३, हदगाव १०.०१ मिमी., हिमायतनगर- २.००, किनवट- १८.७१ तर माहूर तालुक्यात १८.०० मिमी. पावसाची नोंद झाली आहे़आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील -जिल्हाधिकारीगारपिटीमुळे अर्धापूर, मुदखेड, भोकर, उमरी, मुखेड आणि देगलूर तालुक्यांत कोणतेही नुकसान झाले नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून केले जात आहेत. हे पंचनामे आठवडाभरात पूर्ण होतील. त्यानंतरच नुकसानीचा अंतिम आकडा हाती येईल, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.४जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत मंगळवारी केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास २३ हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता़ मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे नुकसानीचा आकडा आणखी वाढला आहे़