शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

नांदेड जिल्ह्यातील ४५२ गावांना गारपिटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:26 IST

जिल्ह्यातील ४५२ गावांना ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तब्बल २९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्रांतील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. चार ते पाच दिवसांत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी प्राप्त होणार आहे.

ठळक मुद्दे२९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्र बाधित : नुकसानीच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील ४५२ गावांना ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तब्बल २९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्रांतील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. चार ते पाच दिवसांत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी प्राप्त होणार आहे.जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान १० तालुक्यांत गारपीट झाली. वादळीवा-यासह अवकाळी पाऊसही झाला. या पावसाने एक जण जखमी झाला आहे. गारपिटीचा सर्वाधिक फटका हदगाव तालुक्याला बसला असून तालुक्यात ७ हजार ७४३ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली. यामध्ये जिरायत क्षेत्र ७ हजार ४६९ हेक्टर, बागायत २५० आणि २४ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल किनवट तालुक्यात २ हजार ९४५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. नांदेड तालुक्यात २ हजार ७३९ क्षेत्रातील जिरायत, बागायत व फळपिके बाधित झाली आहेत.धर्माबाद तालुक्यात २ हजार ४०५ हेक्टर क्षेत्रातील पिके गारपिटीने बाधित झाली. बिलोली तालुक्यात २ हजार १९६, नायगाव तालुक्यात १ हजार ८९९, लोहा तालुक्यात १ हजार ६९२, माहूर तालुक्यात २ हजार २२३ हेक्टर, हिमायतनगर तालुक्यात १ हजार १३१ हेक्टर आणि कंधार तालुक्यात १६५ हेक्टर क्षेत्रात शेतीचे नुकसान झाले आहे.नांदेड तालुक्यात १८, धर्माबाद तालुक्यात ५६, नायगाव तालुक्यातील २३, बिलोली तालुक्यातील १२, कंधार तालुक्यातील ३४, हदगाव तालुक्यातील ४४, हिमायतनगर तालुक्यातील ४, किनवट तालुक्यातील ९५ आणि माहूर तालुक्यातील १६६ गावांना गारपिटीचा फटका बसला आहे.जिल्ह्यात गारपीट आणि विजा पडून १३ मोठी जनावरे आणि ९ लहान जनावरे दगावली आहेत. जिल्ह्यात २४ हजार ९३५ हेक्टर क्षेत्रातील जिरायत पिकांना गारपिटीचा फटका बसला आहे. तर ४ हजार १७७ बागायती क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. तर ५२३ हेक्टर क्षेत्रातील फळपिके जमीनदोस्त झाले आहेत.जिल्ह्यात गत तीन दिवसांत १८ मि़मी़पावसाची नोंद करण्यात आली आहे़ त्यात नांदेड- ५.७५ मिमी., अर्धापूर- १३.६७, मुदखेड- ७.३४, भोकर- ११.७५ मिमी., उमरी-८.००, धर्माबाद- २३.३३, नायगाव- २०.६, बिलोली- १०.८, लोहा- १५.५, कंधार- ६.८३, मुखेड- २१.२८ मिमी., देगलूर- ९.८३, हदगाव १०.०१ मिमी., हिमायतनगर- २.००, किनवट- १८.७१ तर माहूर तालुक्यात १८.०० मिमी. पावसाची नोंद झाली आहे़आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील -जिल्हाधिकारीगारपिटीमुळे अर्धापूर, मुदखेड, भोकर, उमरी, मुखेड आणि देगलूर तालुक्यांत कोणतेही नुकसान झाले नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून केले जात आहेत. हे पंचनामे आठवडाभरात पूर्ण होतील. त्यानंतरच नुकसानीचा अंतिम आकडा हाती येईल, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.४जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत मंगळवारी केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास २३ हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता़ मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे नुकसानीचा आकडा आणखी वाढला आहे़