शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये २५ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:39 IST

उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्नदेखील उद्भवत आहेत़ जिल्ह्यात जवळपास दहा टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जिल्ह्यातील १०६ प्रकल्पांमध्ये आजघडीला केवळ २५़८४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़ विष्णुपुरीत केवळ ८़८३ दलघमी पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळे ग्रामीण भागासह नांदेड शहरालादेखील यंदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे़

ठळक मुद्देविष्णूपुरीत केवळ ८.८ दलघमी पाणी: १०६ पैकी ४२ प्रकल्पांनी गाठला तळ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्नदेखील उद्भवत आहेत़ जिल्ह्यात जवळपास दहा टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जिल्ह्यातील १०६ प्रकल्पांमध्ये आजघडीला केवळ २५़८४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़ विष्णुपुरीत केवळ ८़८३ दलघमी पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळे ग्रामीण भागासह नांदेड शहरालादेखील यंदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे़जिल्ह्यात असलेल्या मानार आणि विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ११़१३ टक्के जलसाठा शिल्लक आहे़ तर ९ मध्यम प्रकल्पाची स्थितीही पन्नास टक्क्याहून खालीच आहे़ जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात ४८ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे़ यामध्ये मुखेड तालुक्यातील कुंदराळा प्रकल्पात ३़६९ टक्के, देगलूर-करडखेड प्रकल्पात ६४़१८ टक्के, उमरी-कुदळा-४३़२८ टक्के, कंधार तालुक्यातील महालिंगी प्रकल्प कोरडाठाक पडला असून पेठवडज प्रकल्पात केवळ १२़१६ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़ तर लोह्यातील उर्ध्व मानारमध्ये ३८़३६ टक्के पाणीसाठा आहे़ किनवट तालुक्यातील नागझरी मध्यम प्रकल्पात ४३़०३ टक्के, लोणी-१३़३१ तर डोंगरगाव प्रकल्पात ५६़५५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़ परंतु, दिवसेंदिव वाढणाºया तीव्रतेमुळे बाष्पीभवन होवून पाणीसाठ्यात घट होत आहे़जिल्ह्यातील लघु प्रकल्पांनीही तळ गाठला असून १६़८९ टक्के पाणी उपलब्ध आहे़ एकूण ८८ लघुप्रकल्पापैकी केवळ ५ प्रकल्पामध्ये ५० टक्क्याहून अधिक पाणी उपलब्ध आहे़ यात देगलूर तालुक्यातील येडूर, बिलोली तालुक्यातील दर्यापूर, तळणी, किनवटमधील थोरा आणि सदिगी प्रकल्पाचा समावेश आहे़ इतर प्रकल्पाच्या तुलनेत उच्च पातळी बंधारे आणि कोल्हापूरी बंधाºयामध्ये उपयुक्त जलसाठा अधिक आहे़जिल्ह्यातील प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा पाहता यंदा ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा अधिक प्रमाणात बसणार असल्याचे दिसते़ मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात १० टँकर सुरू करावे लागले आहे़ जिल्हा प्रशासनाकडून टंचाई निवारणासाठी नियोजन करण्यात आले असून नजीकच्या जिल्ह्यातील प्रकल्पात पाणीसाठा आरक्षित केला आहे़उर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्षेत्रात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने इसापूर यंदा भरले नाही़ प्रकल्प उभारल्यापासूनची ही अशी पहिलीच वेळ आहे़ केवळ १६ टक्के भरलेल्या इसापूरमध्ये आज केवळ साडेतीन टक्के पाणीसाठा आहे़ त्यातून सिंचनासाठी यापुर्वी १ रोटेशन देण्यात आले आहे़ हा प्रकल्प उमरखेड नगरपालिका आणि अर्धापूर, मुदखेड तालुक्यातील जनतेची तहान भागविण्याचे काम करते़ या प्रकल्पात उपलब्ध असलेल्या जलसाठ्यापैकी ४७ टक्के पाणी नांदेड जिल्ह्यासाठी आरक्षित केले आहे़ तर हिंगोलीसाठी ५ टक्के आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ३२ टक्के पाणीसाठा आरक्षीत केला आहे़इसापूर धरणील जलसाठ्याअभावी नांदेड शहरासाठीची आसना नदीवरील पर्यायी पाणीपुरवठा योजनाही यावर्षी बंदच राहणार आहे़ मागील दोन वर्षात निर्माण झालेल्या पाणीटंचाई काळात इसापूर प्रकल्पातील पाण्यामुळे नांदेडकरांची तहान भागली होती़दिग्रस, जायकवाडीतून पाणी सोडण्याची गरजनांदेड जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, कालवा समिती आणि जलसंपदा मंत्र्याच्या उपस्थित झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार नांदेडसाठी पूर्णा, डिग्रस आणि जायकवाडी प्रकल्पात पाणीसाठा आरक्षित केला आहे़ गरजेनुसार या प्रकल्पातून नांदेडसाठी पाणी उपलब्ध होऊ शकते़ विष्णूपुरी प्रकल्पातील आजघडीला केवळ दहा टक्के पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळे पुढील काही दिवसातच विष्णूपुरीमध्ये डिग्रस प्रकल्पातून पाणी सोडावे लागणार आहे़ गावपातळीवरील अनेक योजना बंद ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाºया अनेक नळयोजना थकीत वीजबिलापोटी बंद आहेत़ यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने राबविलेल्या योजना अधिक आहेत़ काही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करूनदेखील बंद असल्याने लाखो रूपयांच्या योजना शोभेच्या वास्तू बनल्या आहेत़ दरम्यान, नांदेड पाटबंधारे विभागाचे महापालिका आणि जिल्हा परिषदेकडे कोट्यवधी रूपये थकले आहेत़ त्यामुळे येणाºया काळात थकीत बिलावरून जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नांदेड पाटबंधारे विभाग आमने सामने येऊ शकतो़ पाण्याच्या दराचा विषयावरून मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकीत आहे़ दराचा प्रश्न मार्गी लागल्यास हा विषय मार्गी लागू शकतो़