शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये २५ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:39 IST

उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्नदेखील उद्भवत आहेत़ जिल्ह्यात जवळपास दहा टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जिल्ह्यातील १०६ प्रकल्पांमध्ये आजघडीला केवळ २५़८४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़ विष्णुपुरीत केवळ ८़८३ दलघमी पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळे ग्रामीण भागासह नांदेड शहरालादेखील यंदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे़

ठळक मुद्देविष्णूपुरीत केवळ ८.८ दलघमी पाणी: १०६ पैकी ४२ प्रकल्पांनी गाठला तळ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्नदेखील उद्भवत आहेत़ जिल्ह्यात जवळपास दहा टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जिल्ह्यातील १०६ प्रकल्पांमध्ये आजघडीला केवळ २५़८४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़ विष्णुपुरीत केवळ ८़८३ दलघमी पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळे ग्रामीण भागासह नांदेड शहरालादेखील यंदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे़जिल्ह्यात असलेल्या मानार आणि विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ११़१३ टक्के जलसाठा शिल्लक आहे़ तर ९ मध्यम प्रकल्पाची स्थितीही पन्नास टक्क्याहून खालीच आहे़ जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात ४८ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे़ यामध्ये मुखेड तालुक्यातील कुंदराळा प्रकल्पात ३़६९ टक्के, देगलूर-करडखेड प्रकल्पात ६४़१८ टक्के, उमरी-कुदळा-४३़२८ टक्के, कंधार तालुक्यातील महालिंगी प्रकल्प कोरडाठाक पडला असून पेठवडज प्रकल्पात केवळ १२़१६ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़ तर लोह्यातील उर्ध्व मानारमध्ये ३८़३६ टक्के पाणीसाठा आहे़ किनवट तालुक्यातील नागझरी मध्यम प्रकल्पात ४३़०३ टक्के, लोणी-१३़३१ तर डोंगरगाव प्रकल्पात ५६़५५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़ परंतु, दिवसेंदिव वाढणाºया तीव्रतेमुळे बाष्पीभवन होवून पाणीसाठ्यात घट होत आहे़जिल्ह्यातील लघु प्रकल्पांनीही तळ गाठला असून १६़८९ टक्के पाणी उपलब्ध आहे़ एकूण ८८ लघुप्रकल्पापैकी केवळ ५ प्रकल्पामध्ये ५० टक्क्याहून अधिक पाणी उपलब्ध आहे़ यात देगलूर तालुक्यातील येडूर, बिलोली तालुक्यातील दर्यापूर, तळणी, किनवटमधील थोरा आणि सदिगी प्रकल्पाचा समावेश आहे़ इतर प्रकल्पाच्या तुलनेत उच्च पातळी बंधारे आणि कोल्हापूरी बंधाºयामध्ये उपयुक्त जलसाठा अधिक आहे़जिल्ह्यातील प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा पाहता यंदा ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा अधिक प्रमाणात बसणार असल्याचे दिसते़ मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात १० टँकर सुरू करावे लागले आहे़ जिल्हा प्रशासनाकडून टंचाई निवारणासाठी नियोजन करण्यात आले असून नजीकच्या जिल्ह्यातील प्रकल्पात पाणीसाठा आरक्षित केला आहे़उर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्षेत्रात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने इसापूर यंदा भरले नाही़ प्रकल्प उभारल्यापासूनची ही अशी पहिलीच वेळ आहे़ केवळ १६ टक्के भरलेल्या इसापूरमध्ये आज केवळ साडेतीन टक्के पाणीसाठा आहे़ त्यातून सिंचनासाठी यापुर्वी १ रोटेशन देण्यात आले आहे़ हा प्रकल्प उमरखेड नगरपालिका आणि अर्धापूर, मुदखेड तालुक्यातील जनतेची तहान भागविण्याचे काम करते़ या प्रकल्पात उपलब्ध असलेल्या जलसाठ्यापैकी ४७ टक्के पाणी नांदेड जिल्ह्यासाठी आरक्षित केले आहे़ तर हिंगोलीसाठी ५ टक्के आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ३२ टक्के पाणीसाठा आरक्षीत केला आहे़इसापूर धरणील जलसाठ्याअभावी नांदेड शहरासाठीची आसना नदीवरील पर्यायी पाणीपुरवठा योजनाही यावर्षी बंदच राहणार आहे़ मागील दोन वर्षात निर्माण झालेल्या पाणीटंचाई काळात इसापूर प्रकल्पातील पाण्यामुळे नांदेडकरांची तहान भागली होती़दिग्रस, जायकवाडीतून पाणी सोडण्याची गरजनांदेड जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, कालवा समिती आणि जलसंपदा मंत्र्याच्या उपस्थित झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार नांदेडसाठी पूर्णा, डिग्रस आणि जायकवाडी प्रकल्पात पाणीसाठा आरक्षित केला आहे़ गरजेनुसार या प्रकल्पातून नांदेडसाठी पाणी उपलब्ध होऊ शकते़ विष्णूपुरी प्रकल्पातील आजघडीला केवळ दहा टक्के पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळे पुढील काही दिवसातच विष्णूपुरीमध्ये डिग्रस प्रकल्पातून पाणी सोडावे लागणार आहे़ गावपातळीवरील अनेक योजना बंद ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाºया अनेक नळयोजना थकीत वीजबिलापोटी बंद आहेत़ यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने राबविलेल्या योजना अधिक आहेत़ काही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करूनदेखील बंद असल्याने लाखो रूपयांच्या योजना शोभेच्या वास्तू बनल्या आहेत़ दरम्यान, नांदेड पाटबंधारे विभागाचे महापालिका आणि जिल्हा परिषदेकडे कोट्यवधी रूपये थकले आहेत़ त्यामुळे येणाºया काळात थकीत बिलावरून जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नांदेड पाटबंधारे विभाग आमने सामने येऊ शकतो़ पाण्याच्या दराचा विषयावरून मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकीत आहे़ दराचा प्रश्न मार्गी लागल्यास हा विषय मार्गी लागू शकतो़