शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

२० हजार हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:12 IST

बारूळ कृषी मंडळांतर्गत ३२ गावांतील १९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी सज्ज असून या ३२ गावांच्या शेतातील कृषी विभागाकडून माती तपासणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमशागतीची कामे अंतिम टप्प्यात कापूस, सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता, ३२ गावांची माती तपासणी

बारूळ : बारूळ कृषी मंडळांतर्गत ३२ गावांतील १९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी सज्ज असून या ३२ गावांच्या शेतातील कृषी विभागाकडून माती तपासणी करण्यात आली आहे. यंदा कापूस व सोयाबीन क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले़बारूळ कृषी मंडळांतर्गत बारूळ, कौठा, काटकळंबा, मंगलसांगवी, वरवंट, चिंचोली, चिखली, औराळ, उस्माननगर, लाठी, दहीकळंबासह दिंडा, बिंडा, गुंडा, वाडी-तांड्यासह ३० गावांतील शेतकऱ्यांनी शेतातील १० हजार ५०० नमुने माती तपासणी केली़ शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी आपली शेती १० हजार ९०० हेक्टर क्षेत्र नांगरूण, वखरून सज्ज ठेवली असून बळीराजा आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे़मागील तीन वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, गारपिटीचा सामना करणाºया या मंडळातील शेतकºयांना सातत्याने अवर्षणस्थितीचा फटका सहन करावा लागत आहे़ या संकटातूनही शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला आहे़ अशा परिस्थितीत आगामी खरीप हंगामात नव्या जोमाने कामाला लागून पेरणी केली जाणार आहे़ दरवर्षी निसर्गासोबत शेतकºयांचा हा खेळ सुरू असून शेतकरीही दुबार, तिबार पेरणी करत निसर्गासोबत सामना करीत आहेत. कृषी विभागाने या पार्श्वभूमीचा आढावा घेवून शेतक-यांसोबत पेरणीसंबंधी, लागवडीसंबंधी, बी-बियाणेसंबंधी प्रत्येक गावात थेट चर्चा करून शेतक-यांना मार्गदर्शन केले़ कृषी विभागाच्या मते, यंदा कापूस, सोयाबीन, ज्वारी क्षेत्रात वाढ होईल, अशी माहिती दिली़बारूळ मंडळातील २८ कृषी दुकाने आहेत़ शेतक-यांना बी-बियाणे, खते, औषधी योग्य दरात व पाहिजे तो माल मिळेल, यासाठीही कृषी दुकानातून पिळवणूक होऊ नये, अशी मागणी बळीराजाकडून होत आहे़बारूळ मंडळात मागील वर्षी ढगफुटीबारूळ मंडळात मागील वर्षी जूनमध्ये ढगफुटी झाली़ त्यात शेतकरी, नागरिकांचे मोठे नुकसान झाले़ पण तब्बल एक वर्ष उलटूनही शेतक-यांना मदतीसाठी ना शासन, ना पुढारी समोर येत आहे़ त्यामुळे निसर्गहानी झाल्यावरही प्रशासन नुकसान निरंक ठेवतो, त्यामुळे नुकसान भरपाई मिळेल की नाही, या चिंतेत बळीराजा आहे़

बारूळ कृषी मंडळअंतर्गत ३० गावांतील १९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र खरीप पिकासाठी शेतक-याने सज्ज ठेवले असून यंदा कापूस, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे-आऱ एम़ भुरे, कृषी पर्यवेक्षक़

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसFarmerशेतकरी