शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
2
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
4
ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
5
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
6
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
8
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
9
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."
10
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
11
प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
12
'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
13
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
14
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
15
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
16
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
17
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
18
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
19
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
20
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती

२० हजार हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:12 IST

बारूळ कृषी मंडळांतर्गत ३२ गावांतील १९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी सज्ज असून या ३२ गावांच्या शेतातील कृषी विभागाकडून माती तपासणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमशागतीची कामे अंतिम टप्प्यात कापूस, सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता, ३२ गावांची माती तपासणी

बारूळ : बारूळ कृषी मंडळांतर्गत ३२ गावांतील १९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी सज्ज असून या ३२ गावांच्या शेतातील कृषी विभागाकडून माती तपासणी करण्यात आली आहे. यंदा कापूस व सोयाबीन क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले़बारूळ कृषी मंडळांतर्गत बारूळ, कौठा, काटकळंबा, मंगलसांगवी, वरवंट, चिंचोली, चिखली, औराळ, उस्माननगर, लाठी, दहीकळंबासह दिंडा, बिंडा, गुंडा, वाडी-तांड्यासह ३० गावांतील शेतकऱ्यांनी शेतातील १० हजार ५०० नमुने माती तपासणी केली़ शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी आपली शेती १० हजार ९०० हेक्टर क्षेत्र नांगरूण, वखरून सज्ज ठेवली असून बळीराजा आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे़मागील तीन वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, गारपिटीचा सामना करणाºया या मंडळातील शेतकºयांना सातत्याने अवर्षणस्थितीचा फटका सहन करावा लागत आहे़ या संकटातूनही शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला आहे़ अशा परिस्थितीत आगामी खरीप हंगामात नव्या जोमाने कामाला लागून पेरणी केली जाणार आहे़ दरवर्षी निसर्गासोबत शेतकºयांचा हा खेळ सुरू असून शेतकरीही दुबार, तिबार पेरणी करत निसर्गासोबत सामना करीत आहेत. कृषी विभागाने या पार्श्वभूमीचा आढावा घेवून शेतक-यांसोबत पेरणीसंबंधी, लागवडीसंबंधी, बी-बियाणेसंबंधी प्रत्येक गावात थेट चर्चा करून शेतक-यांना मार्गदर्शन केले़ कृषी विभागाच्या मते, यंदा कापूस, सोयाबीन, ज्वारी क्षेत्रात वाढ होईल, अशी माहिती दिली़बारूळ मंडळातील २८ कृषी दुकाने आहेत़ शेतक-यांना बी-बियाणे, खते, औषधी योग्य दरात व पाहिजे तो माल मिळेल, यासाठीही कृषी दुकानातून पिळवणूक होऊ नये, अशी मागणी बळीराजाकडून होत आहे़बारूळ मंडळात मागील वर्षी ढगफुटीबारूळ मंडळात मागील वर्षी जूनमध्ये ढगफुटी झाली़ त्यात शेतकरी, नागरिकांचे मोठे नुकसान झाले़ पण तब्बल एक वर्ष उलटूनही शेतक-यांना मदतीसाठी ना शासन, ना पुढारी समोर येत आहे़ त्यामुळे निसर्गहानी झाल्यावरही प्रशासन नुकसान निरंक ठेवतो, त्यामुळे नुकसान भरपाई मिळेल की नाही, या चिंतेत बळीराजा आहे़

बारूळ कृषी मंडळअंतर्गत ३० गावांतील १९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र खरीप पिकासाठी शेतक-याने सज्ज ठेवले असून यंदा कापूस, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे-आऱ एम़ भुरे, कृषी पर्यवेक्षक़

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसFarmerशेतकरी