शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:12 IST

बारूळ कृषी मंडळांतर्गत ३२ गावांतील १९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी सज्ज असून या ३२ गावांच्या शेतातील कृषी विभागाकडून माती तपासणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमशागतीची कामे अंतिम टप्प्यात कापूस, सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता, ३२ गावांची माती तपासणी

बारूळ : बारूळ कृषी मंडळांतर्गत ३२ गावांतील १९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी सज्ज असून या ३२ गावांच्या शेतातील कृषी विभागाकडून माती तपासणी करण्यात आली आहे. यंदा कापूस व सोयाबीन क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले़बारूळ कृषी मंडळांतर्गत बारूळ, कौठा, काटकळंबा, मंगलसांगवी, वरवंट, चिंचोली, चिखली, औराळ, उस्माननगर, लाठी, दहीकळंबासह दिंडा, बिंडा, गुंडा, वाडी-तांड्यासह ३० गावांतील शेतकऱ्यांनी शेतातील १० हजार ५०० नमुने माती तपासणी केली़ शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी आपली शेती १० हजार ९०० हेक्टर क्षेत्र नांगरूण, वखरून सज्ज ठेवली असून बळीराजा आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे़मागील तीन वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, गारपिटीचा सामना करणाºया या मंडळातील शेतकºयांना सातत्याने अवर्षणस्थितीचा फटका सहन करावा लागत आहे़ या संकटातूनही शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला आहे़ अशा परिस्थितीत आगामी खरीप हंगामात नव्या जोमाने कामाला लागून पेरणी केली जाणार आहे़ दरवर्षी निसर्गासोबत शेतकºयांचा हा खेळ सुरू असून शेतकरीही दुबार, तिबार पेरणी करत निसर्गासोबत सामना करीत आहेत. कृषी विभागाने या पार्श्वभूमीचा आढावा घेवून शेतक-यांसोबत पेरणीसंबंधी, लागवडीसंबंधी, बी-बियाणेसंबंधी प्रत्येक गावात थेट चर्चा करून शेतक-यांना मार्गदर्शन केले़ कृषी विभागाच्या मते, यंदा कापूस, सोयाबीन, ज्वारी क्षेत्रात वाढ होईल, अशी माहिती दिली़बारूळ मंडळातील २८ कृषी दुकाने आहेत़ शेतक-यांना बी-बियाणे, खते, औषधी योग्य दरात व पाहिजे तो माल मिळेल, यासाठीही कृषी दुकानातून पिळवणूक होऊ नये, अशी मागणी बळीराजाकडून होत आहे़बारूळ मंडळात मागील वर्षी ढगफुटीबारूळ मंडळात मागील वर्षी जूनमध्ये ढगफुटी झाली़ त्यात शेतकरी, नागरिकांचे मोठे नुकसान झाले़ पण तब्बल एक वर्ष उलटूनही शेतक-यांना मदतीसाठी ना शासन, ना पुढारी समोर येत आहे़ त्यामुळे निसर्गहानी झाल्यावरही प्रशासन नुकसान निरंक ठेवतो, त्यामुळे नुकसान भरपाई मिळेल की नाही, या चिंतेत बळीराजा आहे़

बारूळ कृषी मंडळअंतर्गत ३० गावांतील १९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र खरीप पिकासाठी शेतक-याने सज्ज ठेवले असून यंदा कापूस, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे-आऱ एम़ भुरे, कृषी पर्यवेक्षक़

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसFarmerशेतकरी