शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मंदिराच्या ओट्यावर बसल्याच्या कारणावरून खून करणाऱ्या बारा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 22:22 IST

याप्रकरणी बिलोलीच्या न्यायालयाने यातील बाराही आरोपींना सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

शेख शब्बीर- देगलूर:  मंदिराच्या ओट्यावर का बसलास असे म्हणत गावातील बारा आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करीत डोक्यात दगड घालून खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील मौजे कोकलगाव येथे 2015 मध्ये घडली होती. याप्रकरणी बिलोलीच्या न्यायालयाने यातील बाराही आरोपींना सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

19 नोव्हेंबर 2015 रोजी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान यातील फिर्यादी तथा मयताचा भाऊ चंद्रकांत तुकाराम सूर्यवंशी वय 45 वर्ष जात मांग राहणार कोकलगाव तालुका देगलूर हा गावातील वीरभद्र मंदिराच्या ओट्यावर बसला होता.यावेळी गावातीलच आरोपी 1) निळकंठ जगन्नाथ पाटील वय 44 2) सोमनाथ होणयप्पा स्वामी वय 53 3) हनमंत हावगी स्वामी वय 30 4) शंकर संगप्पा स्वामी वय 38  5) अमृत आनेप्पा बिरादार वय 53  6) शिवाजी रामचंद्र मदने वय 447) गणेश नागनाथ हत्ते वय 32  8) शंकर सिद्राम हत्ते वय 47 9) सुरेश माधवराव कवटगे वय 48 10) जगन्नाथ हनमंतराव पाटील वय 6811) सुभाष संगप्पा हत्ते वय 57 12) सुनील मलिकार्जुन पाटील वय 32  हे तेथे येऊन तू हलक्या जातीचा आहेस त्यामुळे तू मंदिराच्या ओट्यावर का बसलास असे म्हणत त्यास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.

आपल्या भावाला मारहाण होत असल्याचे पाहून मयत मारोती तुकाराम सूर्यवंशी व विठ्ठल महादेव मदने हे भांडण सोडविण्यासाठी आला असता वरील सर्व आरोपींनी मयत मारोती तुकाराम सूर्यवंशी यास दगडाने डोक्यात जबर मारहाण करून त्याचा खून केला असल्याची फिर्याद मयताचा भाऊ चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मरखेल पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून सर्व 12 आरोपी विरुद्ध कलम  302,143,147,148,149,324 भा द वि आणि सहकलम 3(1) (10) 3 (2) (5) ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन दोषारोप पत्र अति. सत्र न्यायालय बिलोली येथे दाखल करण्यात आल्याने सरकारतर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात येऊन न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करून यातील बारा आरोपींना कलम 302 भादवी अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व दंड प्रत्येकी 5000 रुपये तसेच कलम 148 भादवि अंतर्गत 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दंड प्रत्येकी 5000 रुपये तसेच कलम 3(1) (10) अंतर्गत एक वर्ष सश्रम करावासाची शिक्षा ठोठावली आहे.तसेच दंडाच्या रकमेतून मयतांच्या वारसांना दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश बिलोली येथील जिल्हा न्यायाधीश -1 तथा अति.सत्र न्यायाधीश दिनेश ए. कोठलीकर यांनी दिला आहे.सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता संदीप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली तर पैरवी अधिकारी म्हणून साईनाथ एमेकर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड