शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराच्या ओट्यावर बसल्याच्या कारणावरून खून करणाऱ्या बारा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 22:22 IST

याप्रकरणी बिलोलीच्या न्यायालयाने यातील बाराही आरोपींना सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

शेख शब्बीर- देगलूर:  मंदिराच्या ओट्यावर का बसलास असे म्हणत गावातील बारा आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करीत डोक्यात दगड घालून खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील मौजे कोकलगाव येथे 2015 मध्ये घडली होती. याप्रकरणी बिलोलीच्या न्यायालयाने यातील बाराही आरोपींना सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

19 नोव्हेंबर 2015 रोजी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान यातील फिर्यादी तथा मयताचा भाऊ चंद्रकांत तुकाराम सूर्यवंशी वय 45 वर्ष जात मांग राहणार कोकलगाव तालुका देगलूर हा गावातील वीरभद्र मंदिराच्या ओट्यावर बसला होता.यावेळी गावातीलच आरोपी 1) निळकंठ जगन्नाथ पाटील वय 44 2) सोमनाथ होणयप्पा स्वामी वय 53 3) हनमंत हावगी स्वामी वय 30 4) शंकर संगप्पा स्वामी वय 38  5) अमृत आनेप्पा बिरादार वय 53  6) शिवाजी रामचंद्र मदने वय 447) गणेश नागनाथ हत्ते वय 32  8) शंकर सिद्राम हत्ते वय 47 9) सुरेश माधवराव कवटगे वय 48 10) जगन्नाथ हनमंतराव पाटील वय 6811) सुभाष संगप्पा हत्ते वय 57 12) सुनील मलिकार्जुन पाटील वय 32  हे तेथे येऊन तू हलक्या जातीचा आहेस त्यामुळे तू मंदिराच्या ओट्यावर का बसलास असे म्हणत त्यास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.

आपल्या भावाला मारहाण होत असल्याचे पाहून मयत मारोती तुकाराम सूर्यवंशी व विठ्ठल महादेव मदने हे भांडण सोडविण्यासाठी आला असता वरील सर्व आरोपींनी मयत मारोती तुकाराम सूर्यवंशी यास दगडाने डोक्यात जबर मारहाण करून त्याचा खून केला असल्याची फिर्याद मयताचा भाऊ चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मरखेल पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून सर्व 12 आरोपी विरुद्ध कलम  302,143,147,148,149,324 भा द वि आणि सहकलम 3(1) (10) 3 (2) (5) ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन दोषारोप पत्र अति. सत्र न्यायालय बिलोली येथे दाखल करण्यात आल्याने सरकारतर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात येऊन न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करून यातील बारा आरोपींना कलम 302 भादवी अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व दंड प्रत्येकी 5000 रुपये तसेच कलम 148 भादवि अंतर्गत 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दंड प्रत्येकी 5000 रुपये तसेच कलम 3(1) (10) अंतर्गत एक वर्ष सश्रम करावासाची शिक्षा ठोठावली आहे.तसेच दंडाच्या रकमेतून मयतांच्या वारसांना दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश बिलोली येथील जिल्हा न्यायाधीश -1 तथा अति.सत्र न्यायाधीश दिनेश ए. कोठलीकर यांनी दिला आहे.सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता संदीप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली तर पैरवी अधिकारी म्हणून साईनाथ एमेकर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड