शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यासाठी ११७ दलघमी पाणी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:41 IST

जिल्ह्यात झालेले अल्प पर्जन्यमान लक्षात घेता जिल्ह्यात पाणीसाठा कमी असून धरणातील पाण्याचे २०१८-१९ साठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या पाणी आरक्षण बैठकीत संपूर्ण जिल्ह्यासाठी ११७ दलघमी जलसाठा आरक्षित करण्यात आला आहे. यामध्ये नागरी भागासाठी ४७.२० तर ग्रामीण भागासाठी ४६.४० दलघमी जलसाठ्याचा समावेश आहे.

ठळक मुद्देपाणी आरक्षण बैठक : पूर्वतयारीच्या सर्वच विभागांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात झालेले अल्प पर्जन्यमान लक्षात घेता जिल्ह्यात पाणीसाठा कमी असून धरणातील पाण्याचे २०१८-१९ साठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या पाणी आरक्षण बैठकीत संपूर्ण जिल्ह्यासाठी ११७ दलघमी जलसाठा आरक्षित करण्यात आला आहे. यामध्ये नागरी भागासाठी ४७.२० तर ग्रामीण भागासाठी ४६.४० दलघमी जलसाठ्याचा समावेश आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणी आरक्षण बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता स.पो. सब्बीनवार, नांदेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मु. मो. कहाळेकर, उर्ध्व पैनगंगा विभागाचे कार्यकारी अभियंता वि.कि. कुरुंदकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एम. गायकवाड, महापालिकेचे कार्यकारी अभियंता एस.एन. अंधारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.जिल्ह्यात यंदा ८१ टक्के पर्जन्यमाने झाले असले तरी काही तालुके मात्र पर्जन्यमानापासूृन वंचितच आहेत. विशेषत: देगलूर, मुखेड या तालुक्यांचा समावेश आहे. उपलब्ध जलसाठ्यानुसार आरक्षण करण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील मोठे प्रकल्प असलेल्या निम्न मानार बारुळ आणि विष्णूपुरी प्रकल्पातून नागरी व ग्रामीण भागासाठी पाणी आरक्षित करण्यात आले. त्यामध्ये विष्णूपुरी प्रकल्पातून नांदेड महापालिकेने शहरासाठी २७ दलघमी पाणी आरक्षित केले तर जिल्हा परिषदेने २ दलघमी पाणी आरक्षित केले आहे. निम्न मानार प्रकल्पातून कंधार न.प.ने १.५० आणि जि.प.ने २ दलघमी पाणी आरक्षित केले आहे.उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून नांदेड महापालिकेसाठी १५, हदगाव न.प.साठी २, अर्धापूर न.प.साठी १ दलघमी आणि मुदखेड न.प.साठी ०.७० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे.त्याचवेळी जिल्हा परिषदेने ग्रामीण भागासाठी ३५ दलघमी जलसाठा राखीव केला आहे. पूर्णा प्रकल्पातून २.४० आणि देवापूर बंधाऱ्यातून ५ दलघमी पाणी जिल्हा परिषदेने आरक्षित केले आहे.जिल्ह्यात असलेल्या मध्यम प्रकल्पातील पाणी आरक्षणही मंगळवारच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. त्यामध्ये मानार प्रकल्पातून नायगाव न.प.साठी २, कुंद्राळा प्रकल्पातून मुखेड न.प.साठी १, करडखेड प्रकल्पातून देगलूर न.प.साठी ३.०५, नागझरी प्रकल्पातून किनवट न.प.साठी १.१०, कुदळा प्रकल्पातून उमरी न.प.साठी ०.६०, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून माहूर न.प.साठी ०.५० आणि बाभळी बंधाºयातून धर्माबाद न.प.साठी ०.६० आणि कुंडलवाडी न.प.साठी ०.५० दलघमी जलसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. लोहा न.प.ने सुनेगाव लघु प्रकल्पातून ०.५० आणि उर्ध्व मानार लिंबोटी प्रकल्पातून ०.५० दलघमी आणि भोकर न.प.ने रेनापूर सुधा लघु प्रकल्पातून १.८० दलघमी जलसाठा राखीव ठेवण्यात आला आहे.या सर्व पाणी आरक्षणास जिल्हास्तरीय समितीच्या पूर्वआढावा बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यावेळी लोहा न.प.चे मुख्य अधिकारी ए.एम. मोकळे, किनवटचे अविनाश गांगोडे, बिलोलीचे ओमप्रकाल गोंड, धर्माबादचे मंगेश देवरे, उमरीचे के.एस. डोईफोडे, कुंडलवाडीचे जी.एच. पेंटे, देगलूरचे निलेश सुंकेवार, मुखेडचे त्र्यंबक कांबळे, माहूरच्या विद्या कदम, भोकरचे हरि कल्याण यलगट्टे, अर्धापूरचे गिरीष दापकेकर आणि मुदखेडचे मुख्य अधिकारी शहराजे कापरे आदींची उपस्थिती होती.जिल्हा परिषदेकडे पाणीकराचे ६४ कोटी थकलेजिल्हा परिषदेकडे ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या पाणी करापोटी तब्बल ६४ कोटी रुपये थकले आहेत. चालू वर्षी पाणीकर भरणे आवश्यक असल्याची ताकीद जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. जिल्हा परिषदेने गतवर्षी पाणी करापोटी १५ लाख रुपये जमा केले आहेत. थकीत रकमेपैकी २५ टक्के पाणीकराची रकमही १४ व्या वित्त आयोगातून करणे आवश्यक होते, असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले. जि़प़ने पाणीकर भरण्याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना केली़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीvishnupuri damविष्णुपुरी धरणwater scarcityपाणी टंचाई