शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

कसा फुलणार शिक्षक दाम्पत्यांचा संसार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 16:07 IST

आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाते. परंतु, खालच्या कर्मचाऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नागपूर जिल्ह्यातील पती-पत्नी एकत्रीकरणासाठी किमान ७० शिक्षक दाम्पत्य बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देशिक्षक दाम्पत्य आंतर जिल्हा बदलीसाठी दहा दहा वर्षांपासून प्रतीक्षेत

नागपूर : पती नागपूरला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर पत्नी यवतमाळ जिल्हा परिषदेत शिक्षिका आहे. हे दोघेही १३ वर्षांपासून एकमेकांपासून दूर आहे. पत्नीला नागपूर जिल्हा परिषदेला आंतरजिल्हा बदली करून आणण्यासाठी पतीचे गेल्या १० वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. परंतु, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही प्रयत्न अपयशी ठरत आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा अशा बदल्या होतात. जिल्ह्यांतर्गत बदल्या सहज होऊन जातात; परंतु आंतरजिल्हा बदल्यांसाठी बऱ्याच अडचणी असल्याने दहा-दहा वर्षांपासून शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या नाही. बदल्यांमध्ये अपंग, विधवा, परितक्त्या, दुर्धर आजार व पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाते; परंतु २०१७ च्या बदल्यासंदर्भातील शासन निर्णयात आंतरजिल्हा बदलीसाठी सिंगल एनओसीची अट घातल्याने पती-पत्नी एकत्रीकरण या श्रेणीतील बदल्या पुन्हा प्रलंबित राहिल्या आहेत. आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाते; परंतु खालच्या कर्मचाऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नागपूर जिल्ह्यातील पती-पत्नी एकत्रीकरणासाठी किमान ७० शिक्षक दाम्पत्य बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात ७० दाम्पत्य बदल्यांच्या प्रतीक्षेत

नागपूर जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीचा लाभ मिळविण्यासाठी ७० शिक्षक दाम्पत्य प्रयत्नशील आहे; पण शिक्षण विभागाचे आठमुठे धोरण, शासन निर्णयातील अडचणीच्या तरतुदीमुळे या दाम्पत्यांना १० ते १५ वर्षांपासून बदल्यांचा लाभ मिळालेला नाही.

काय आहे अडचण?

शिक्षकांच्या बदल्याच्या संदर्भातील २०११ चा शासन निर्णय होता. त्यात पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य देण्यात आले होते; परंतु बदल्याच्या संदर्भात २०१७ मध्ये निघालेल्या नवीन शासन निर्णयात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या एनओसीच्या सेवाज्येष्ठतेप्रमाणे प्राधान्य देण्यात येत असल्याने आंतरजिल्हा बदलीचे अनेक प्रकरण प्रलंबित राहत आहे. शिवाय शिक्षण विभागाने २०१० पासून रोस्टर नियमित केले नाही. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जागा रिक्त असतानाही ऑनलाइन पोर्टलवर टाकण्यात येत नाही. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या प्रलंबित आहे.

कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ

शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या आंतरजिल्हा बदलीमुळे कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. भांडणे वाढली आहेत. घटस्फोटापर्यंत प्रकरणे पोहोचली आहेत. कुटुंबाचे सान्निध्य नसल्यामुळे गैरसमज वाढले आहेत. मुलांची हेळसांड होत आहे. भावंडाची ताटातूट एक आईकडे, तर दुसरा वडिलांकडे राहत आहेत. पती-पत्नी दूर असल्याने घर असूनही नसल्यासारखे आहे.

-प्रवीण राऊत, शिक्षक

टॅग्स :TransferबदलीGovernmentसरकारzpजिल्हा परिषदTeacherशिक्षकSocialसामाजिक