शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

कसा फुलणार शिक्षक दाम्पत्यांचा संसार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 16:07 IST

आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाते. परंतु, खालच्या कर्मचाऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नागपूर जिल्ह्यातील पती-पत्नी एकत्रीकरणासाठी किमान ७० शिक्षक दाम्पत्य बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देशिक्षक दाम्पत्य आंतर जिल्हा बदलीसाठी दहा दहा वर्षांपासून प्रतीक्षेत

नागपूर : पती नागपूरला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर पत्नी यवतमाळ जिल्हा परिषदेत शिक्षिका आहे. हे दोघेही १३ वर्षांपासून एकमेकांपासून दूर आहे. पत्नीला नागपूर जिल्हा परिषदेला आंतरजिल्हा बदली करून आणण्यासाठी पतीचे गेल्या १० वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. परंतु, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही प्रयत्न अपयशी ठरत आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा अशा बदल्या होतात. जिल्ह्यांतर्गत बदल्या सहज होऊन जातात; परंतु आंतरजिल्हा बदल्यांसाठी बऱ्याच अडचणी असल्याने दहा-दहा वर्षांपासून शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या नाही. बदल्यांमध्ये अपंग, विधवा, परितक्त्या, दुर्धर आजार व पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाते; परंतु २०१७ च्या बदल्यासंदर्भातील शासन निर्णयात आंतरजिल्हा बदलीसाठी सिंगल एनओसीची अट घातल्याने पती-पत्नी एकत्रीकरण या श्रेणीतील बदल्या पुन्हा प्रलंबित राहिल्या आहेत. आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाते; परंतु खालच्या कर्मचाऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नागपूर जिल्ह्यातील पती-पत्नी एकत्रीकरणासाठी किमान ७० शिक्षक दाम्पत्य बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात ७० दाम्पत्य बदल्यांच्या प्रतीक्षेत

नागपूर जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीचा लाभ मिळविण्यासाठी ७० शिक्षक दाम्पत्य प्रयत्नशील आहे; पण शिक्षण विभागाचे आठमुठे धोरण, शासन निर्णयातील अडचणीच्या तरतुदीमुळे या दाम्पत्यांना १० ते १५ वर्षांपासून बदल्यांचा लाभ मिळालेला नाही.

काय आहे अडचण?

शिक्षकांच्या बदल्याच्या संदर्भातील २०११ चा शासन निर्णय होता. त्यात पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य देण्यात आले होते; परंतु बदल्याच्या संदर्भात २०१७ मध्ये निघालेल्या नवीन शासन निर्णयात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या एनओसीच्या सेवाज्येष्ठतेप्रमाणे प्राधान्य देण्यात येत असल्याने आंतरजिल्हा बदलीचे अनेक प्रकरण प्रलंबित राहत आहे. शिवाय शिक्षण विभागाने २०१० पासून रोस्टर नियमित केले नाही. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जागा रिक्त असतानाही ऑनलाइन पोर्टलवर टाकण्यात येत नाही. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या प्रलंबित आहे.

कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ

शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या आंतरजिल्हा बदलीमुळे कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. भांडणे वाढली आहेत. घटस्फोटापर्यंत प्रकरणे पोहोचली आहेत. कुटुंबाचे सान्निध्य नसल्यामुळे गैरसमज वाढले आहेत. मुलांची हेळसांड होत आहे. भावंडाची ताटातूट एक आईकडे, तर दुसरा वडिलांकडे राहत आहेत. पती-पत्नी दूर असल्याने घर असूनही नसल्यासारखे आहे.

-प्रवीण राऊत, शिक्षक

टॅग्स :TransferबदलीGovernmentसरकारzpजिल्हा परिषदTeacherशिक्षकSocialसामाजिक