शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कसा फुलणार शिक्षक दाम्पत्यांचा संसार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 16:07 IST

आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाते. परंतु, खालच्या कर्मचाऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नागपूर जिल्ह्यातील पती-पत्नी एकत्रीकरणासाठी किमान ७० शिक्षक दाम्पत्य बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देशिक्षक दाम्पत्य आंतर जिल्हा बदलीसाठी दहा दहा वर्षांपासून प्रतीक्षेत

नागपूर : पती नागपूरला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर पत्नी यवतमाळ जिल्हा परिषदेत शिक्षिका आहे. हे दोघेही १३ वर्षांपासून एकमेकांपासून दूर आहे. पत्नीला नागपूर जिल्हा परिषदेला आंतरजिल्हा बदली करून आणण्यासाठी पतीचे गेल्या १० वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. परंतु, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही प्रयत्न अपयशी ठरत आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा अशा बदल्या होतात. जिल्ह्यांतर्गत बदल्या सहज होऊन जातात; परंतु आंतरजिल्हा बदल्यांसाठी बऱ्याच अडचणी असल्याने दहा-दहा वर्षांपासून शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या नाही. बदल्यांमध्ये अपंग, विधवा, परितक्त्या, दुर्धर आजार व पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाते; परंतु २०१७ च्या बदल्यासंदर्भातील शासन निर्णयात आंतरजिल्हा बदलीसाठी सिंगल एनओसीची अट घातल्याने पती-पत्नी एकत्रीकरण या श्रेणीतील बदल्या पुन्हा प्रलंबित राहिल्या आहेत. आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाते; परंतु खालच्या कर्मचाऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नागपूर जिल्ह्यातील पती-पत्नी एकत्रीकरणासाठी किमान ७० शिक्षक दाम्पत्य बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात ७० दाम्पत्य बदल्यांच्या प्रतीक्षेत

नागपूर जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीचा लाभ मिळविण्यासाठी ७० शिक्षक दाम्पत्य प्रयत्नशील आहे; पण शिक्षण विभागाचे आठमुठे धोरण, शासन निर्णयातील अडचणीच्या तरतुदीमुळे या दाम्पत्यांना १० ते १५ वर्षांपासून बदल्यांचा लाभ मिळालेला नाही.

काय आहे अडचण?

शिक्षकांच्या बदल्याच्या संदर्भातील २०११ चा शासन निर्णय होता. त्यात पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य देण्यात आले होते; परंतु बदल्याच्या संदर्भात २०१७ मध्ये निघालेल्या नवीन शासन निर्णयात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या एनओसीच्या सेवाज्येष्ठतेप्रमाणे प्राधान्य देण्यात येत असल्याने आंतरजिल्हा बदलीचे अनेक प्रकरण प्रलंबित राहत आहे. शिवाय शिक्षण विभागाने २०१० पासून रोस्टर नियमित केले नाही. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जागा रिक्त असतानाही ऑनलाइन पोर्टलवर टाकण्यात येत नाही. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या प्रलंबित आहे.

कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ

शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या आंतरजिल्हा बदलीमुळे कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. भांडणे वाढली आहेत. घटस्फोटापर्यंत प्रकरणे पोहोचली आहेत. कुटुंबाचे सान्निध्य नसल्यामुळे गैरसमज वाढले आहेत. मुलांची हेळसांड होत आहे. भावंडाची ताटातूट एक आईकडे, तर दुसरा वडिलांकडे राहत आहेत. पती-पत्नी दूर असल्याने घर असूनही नसल्यासारखे आहे.

-प्रवीण राऊत, शिक्षक

टॅग्स :TransferबदलीGovernmentसरकारzpजिल्हा परिषदTeacherशिक्षकSocialसामाजिक