शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. निवडणुकीचे काम उधारीवर : प्रशासनाला हवे ६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 23:50 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाला ६ कोटींच्या निधीची गरज आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत एक रुपयाही पाठविण्यात आला नसल्याने उधारीवर काम करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देआयोगाकडून एक रुपयाही निधी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाला ६ कोटींच्या निधीची गरज आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत एक रुपयाही पाठविण्यात आला नसल्याने उधारीवर काम करण्याची वेळ आली आहे. एका मतदारामागे ४० रुपये प्रमाणे ६ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. निधी प्राप्त झालेला नसला तरीसुद्धा जिल्हा प्रशासन आपल्या स्तरावर सगळी तयारी करीत आहे. जिल्ह्यात एकूण १८२८ केंद्रांवर मतदान होणार आहे. १३ तालुक्यांसाठी तहसीलदार संवर्गातील १३ अधिकारी साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. ५८ सर्कलसाठी एकूण २२५ झोन तयार करण्यात आले आहेत. मतदानासाठी २०१२ कंट्रोल तर ४०२४ बॅलेट युनिट उपलब्ध आहेत. मशीन बंद पडल्यास दहा टक्के मशीनसाठा अतिरिक्त देण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या ५८ व पंचायत समितीच्या ११६ जागेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ४२ अर्ज अवैध ठरले आहे. यात जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या २६ अर्जाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी ४२५ उमेदवार तर पंचायत समितीसाठी ६७० उमेदवार वैध आहे. ३० डिसेंबर रोजी ११ ते ३ या दरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे.अपील करण्याची आज शेवटची तारीखजिल्हा परिषदच्या ५८ जागांसाठी ४४१ अर्ज प्राप्त झाले असून यातील ७२ अर्ज अवैध ठरविण्यात आली आहेत. काही अर्ज तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते. अर्ज अवैध ठरवल्यास जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करण्याची तरतूद असून शुक्रवार अपील करण्याची शेवटची मुदत आहे.

 

 

 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूकfundsनिधी