शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

युग चांडकच्या मारेकऱ्यांना आजन्म कारावास : फाशीची शिक्षा रद्द 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:26 IST

सर्वोच्च न्यायालयाने आठ वर्षीय निरागस बालक युग चांडक याच्या खून प्रकरणातील नराधम आरोपी राजेश धन्नालाल दवारे (२७) व अरविंद अभिलाष सिंग (२८) यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना आजन्म कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाने आठ वर्षीय निरागस बालक युग चांडक याच्या खून प्रकरणातील नराधम आरोपी राजेश धन्नालाल दवारे (२७) व अरविंद अभिलाष सिंग (२८) यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना आजन्म कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली. तसेच, आरोपींना मरेपर्यंत कारागृहात ठेवण्यात यावे आणि त्यांना २५ वर्षे कारावास भोगल्याशिवाय शिक्षामाफी देण्यात येऊ नये असे निर्णयात स्पष्ट करून शिक्षेची कठोरता वाढवली.न्या. उदय ललित, न्या. इंदू मल्होत्रा व न्या. हेमंत गुप्ता यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ४ फेब्रुवारी २०१६ रोजी सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३६४-अ (खंडणीसाठी अपहरण) अंतर्गत मरेपर्यंत फाशी, कलम ३०२ (खून) अंतर्गत मरेपर्यंत फाशी आणि कलम २०१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत ७ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. ५ मे २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निर्णय जसाच्या तसा कायम ठेवला होता. त्यामुळे आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची फाशी रद्द केली असली तरी, त्यांना या सर्व गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारतर्फे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी, फिर्यादी डॉ. मुकेश चांडकतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा व अ‍ॅड. राहील मिर्झा तर, आरोपींतर्फे अ‍ॅड. युग चौधरी व अ‍ॅड. अजितसिंग पुंदीर यांनी कामकाज पाहिले.सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम निरीक्षणकोणतेही परिश्रम न घेता झटपट श्रीमंत होण्याच्या उद्देशाने आरोपींनी युगचे अपहरण केले व खंडणी मागितली. तसेच, प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यानंतर युगचा निर्घृण खून केला. परंतु, कायद्यानुसार आरोपींना दूर्मिळातल्या दूर्मिळ घटनेतच फाशीची शिक्षा सुनावता येते आणि ही घटना या निकषात बसण्यामध्ये थोडक्यात कमी पडते असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने हा सुधारित निर्णय देताना नोंदवले.असे आहे प्रकरणआरोपी राजेश कळमन्यातील वांजरी ले-आऊट तर, अरविंद जरीपटक्यातील प्रीती ले-आऊट येथील रहिवासी आहे. राजेश हा युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात कर्मचारी होता. तो रुग्णालयात हेराफेरी करीत होता. रुग्णांना अतिरिक्त पैसे मागत होता. त्याच्या तक्रारी डॉ. चांडक यांना मिळाल्या होत्या. युग नेहमीच रुग्णालयात जात होता. त्यालाही राजेशची हेराफेरी दिसून आली होती. त्यावरून एक दिवस राजेशने युगला थापड मारली होती. डॉ. चांडक यांनी राजेशचे हे कारनामे पाहून त्याला फटकारले होते आणि कामावरून काढून टाकले होते. त्याचा राग राजेशच्या मनात होता. त्यातून त्याने आरोपी अरविंदसोबत मिळून खंडणीसाठी युगचे अपहरण करण्याचा कट रचला. १ सप्टेंबर २०१४ रोजी आरोपींनी युगचे अपहरण करून त्याला दुचाकीने कोराडी रोडवरील निर्जण ठिकाणी नेले. त्यानंतर डॉ. चांडक यांना मोहसीन खान नावाने दोनदा फोन करून पहिल्यांदा १० कोटी व दुसऱ्यांदा ५ कोटी रुपये खंडणी मागितली. तेव्हापर्यंत डॉ. चांडक यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात युग हरविल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी चक्रे फिरवली होती. दरम्यान, आरोपींनी घाबरून युगचा निर्घृण खून केला.

निर्णयावर समाधानी नाहीसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर समाधानी नाही. आरोपींना फाशीची शिक्षा होण्याची अपेक्षा होती. यासाठी पुढे काय करायचे यावर वकिलांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे.- डॉ. मुकेश चांडक, युगचे वडील. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMurderखूनCapital Punishmentमृत्यूदंडLife Imprisonmentजन्मठेप