शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

‘दोस्ती’ची ‘दुनियादारी’ विद्यार्थ्याला पडली भारी; ना भांडण, ना वाद, तरीही गेला हकनाक बळी

By योगेश पांडे | Updated: September 19, 2022 15:21 IST

मित्राच्या बोलवण्यावरून राडा करण्यासाठी जाणे पडले महागात

नागपूर : शिकून सवरून स्वत:चे भविष्य घडविणाऱ्या वयात क्षुल्लक कारणावरून चांगल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच हर्ष डांगे या विद्यार्थ्याची हत्या केल्यामुळे शैक्षणिक वर्तुळातही खळबळ उडाली आहे. मुळात हर्षचे आरोपींसोबत कुठलाही वाद झाला नव्हता. मित्राच्या मित्राचा वाद झाल्याने तेथे समोरच्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी जाण्यासाठी काही विद्यार्थ्यांना एकत्रित करण्यात आले. जखमी विद्यार्थ्याच्या एका फोनवर त्याला मदत करण्यासाठी हर्ष गेला व काहीही चूक नसताना त्याचाच बळी गेला.

शुक्रवारी सेमिनरी हिल्स परिसरात विद्यार्थ्यांच्या हल्ल्यात हर्ष डांगेचा मृत्यू झाला होता अंकित कसर हा गंभीर जखमी झाला होता. हा वाद नेमका कशावरून सुरू झाला व नेमके इतके विद्यार्थी सेमिनरी हिल्स परिसरात कसे काय पोहोचले होते, याची पोलिसांनी चौकशी सुरू केली. अनिकेत कसरच्या बयाणानंतर या प्रकरणातील आणखी एक सत्य समोर आले आहे. हर्षचा आरोपींसोबत कुठलाही वाद झाला नव्हता. दीपांशू पंडित आणि इतर आरोपींसोबत अनिकेत कसर व त्याच्या मित्रांचा वाद झाला होता. हा वाद होऊन काही मिनिटे झाले असताना, अनिकेतला त्याच्या एका मित्राचा फोन आला. संबंधित मित्राचाही एसएफएस महाविद्यालयाजवळ एका मुलाशी वाद झाला होता. आपल्याला ५ ते ६ मुले घेऊन एसएफएसजवळ पोहोचायचे आहे, असे मित्राने अनिकेतला सांगितले.

अनिकेतनेही लगेच सहा जणांना फोन करून बोलविले. त्यात हर्षही होता. मित्राने बोलविल्यामुळे हर्ष जाण्यास तयार झाला. एकूण आठ जण एसएफएस महाविद्यालयाजवळ पोहोचले व तेथे १५ मिनिटे थांबल्यावरही कुणीच आले नाही. त्यामुळे सगळे जण बालोद्यानजवळील पानटपरीवर गेले. तेथेच दीपांशूने त्यांना गाठले. त्यांनी अनिकेतवर चाकूने हल्ला केला, ते पाहून इतर मित्र पळून गेले. मात्र, मित्राला वाचविण्यासाठी एकटा हर्ष धावून आला. संतप्त आरोपींनी हर्षवरच वार करत त्याचा बळी घेतला.

गैरसमजातूनच झाला होता वाद

अनिकेत कसर व आरोपी दीपांशू पंडित यांच्यात झालेल्या वादाचे कारणही गैरसमज हेच होते. शुक्रवारी अनिकेतचा अंतिम वर्षाचा एफटीआयचा पेपर होता. तो पेपर सोडवून तो महाविद्यालयाच्या बाहेरील पानठेल्यावर दोन मित्रांसह उभा होता. तिघेही जण थट्टामस्करी करत होते. त्याच वेळी त्यांचा ज्युनिअर दीपांशूही तेथे सहा मित्रांसह उभा होता. ते आपलीच खिल्ली उडवत आहे, असा त्याचा गैरसमज झाला व त्यातून वाद सुरू झाला. दीपांशूचा एक मित्र व अनिकेतमध्ये नंतर तेथेच हाणामारी झाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर