शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

‘आपली बस’ : नागपूर मनपाच्या तिजोरीला १० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 15:01 IST

विकास कामात बाधा निर्माण होणार नाही, हाती घेतलेला उपक्रम तोट्यात जाणार नाही, यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी कन्सलटंट नियुक्त करण्याची प्रथा महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. ‘आपली बस’ सुरळीत चालावी, ती तोट्यात जाणार नाही. यासाठी कन्सलटंटची नियुक्ती करण्यात आली. परंतु कन्सलटंटच्या सल्ल्यानंतरही सेवा तोट्यात कशी, असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे.

ठळक मुद्देकन्सलटंटच्या सल्ल्यानंतरही बस तोट्यात कशीचुकीच्या सल्ल्याचा दुहेरी भार

गणेश हूडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकास कामात बाधा निर्माण होणार नाही, हाती घेतलेला उपक्रम तोट्यात जाणार नाही, यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी कन्सलटंट नियुक्त करण्याची प्रथा महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. ‘आपली बस’ सुरळीत चालावी, ती तोट्यात जाणार नाही. यासाठी कन्सलटंटची नियुक्ती करण्यात आली. परंतु कन्सलटंटच्या सल्ल्यानंतरही सेवा तोट्यात कशी, असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे.महापालिकेने आपली बस सेवा सुरू करण्यापूर्वी यासाठी दिनेश राठी यांची कन्सलटंट म्हणून नियुक्ती केली होती. मात्र त्यानतंरही आपली बसला १० कोटीचा तोटा आहे. कन्सलटंटने चुकीचा सल्ला देऊ न महापालिकेला आर्थिक संकटात टाकले आहे. वास्तविक राबविण्यात येणारा उपक्रम तोट्यात जाणार नाही, महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडणार नाही, यासाठी कन्सलटंटची नियुक्ती केली जाते. म्हणूनच यावर कोट्यवधींचा खर्च केला जातो. मात्र याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. गेल्या १० ते १२ वर्षांत कन्सलटंटच्या नियुक्तीवर महापालिकेच्या तिजोरीतून ५० कोटीहून अधिक खर्च करण्यात आला आहे.कन्सलटंटची नियुक्ती वेगवेगळ्या कारणासाठी करण्यात आली आहे. गतकाळात राबविण्यात आलेली केंद्र सरकारची जेनएनएनयूआरएम योजना असो वा आताचा स्मार्ट सिटी प्रकल्प यासाठी कन्सलटंट नियुक्त करण्यात आला आहे. अमृत योजनेंतर्गत अनधिकृत वस्त्यांत मूलभूत सुविधा उपलब्ध करणे, कचऱ्या पासून वीज निर्मिती, नागनदीचा विकास, कौशल्य विकास, २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, सिमेंट रोड, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अशा मोठ्या प्रकल्पासोबतच लहानसहान प्रकल्पासाठीही कन्सलटंट नियुक्त करण्यात आलेले आहेत. उद्यान विकास, पार्किंग धोरण, शहरात कचरा का होतो, प्रकल्प आराखडा, प्रकल्पांचे तांत्रिक व आर्थिक मूल्यांकन, मालमत्ता सर्वेक्षण, नागरी पुनर्वसन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, व्यवस्थापन, विविध प्रकल्पांचे अहवाल एवढेच नव्हे तर दहन घाटाचा विकास व नाल्यावर स्लॅब टाकण्यासाठीही कन्सलटंट नियुक्त करण्याचे अफलातून प्रकार घडलेले आहेत.हा जनतेच्या पैशाचा दुरुपयोगचविशेष म्हणजे काही प्रकल्पासाठी कन्सलटंटची नियुक्ती करण्यात आली पण प्रकल्प कार्यान्वित झालेले नाहीत. हा जनतेच्या पैशाचा दुरुपयोग असल्याचा विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा आरोप आहे. महापालिकेच्या अभियंत्यांना वा अधिकाºयांना विशिष्ट प्रकल्पाचे ज्ञान नसेल तर कन्सलटंटची नियुक्ती केली पाहिजे. करआकारणी व करवसुली विभागाने शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करणे अपेक्षित होते. परंतु सायबरटेक संस्थेला हे काम देण्यात आले. यावर १४ कोटी खर्च केले जात आहे. निर्धारित कालावधीत सर्वेक्षण व पुनर्मूल्यांकन न झाल्याने वेळोवेळी मुदत वाढ देण्यात आली. त्यानंतरही सर्वे चुकीचा करण्यात आला आहे.अधिकारी काय करतातवाहतूक विभागात तज्ज्ञ अधिकारी आहेत. कन्सलटंटने दिलेला सल्ला योग्य की अयोग्य याचे आकलन होणे अपेक्षित होते. परंतु अधिकाºयांनी यावर कोणताही आक्षेप नोंदविला नाही. नाल्यावर सिमेंट क्राँक्रिटचे स्लॅब टाकायचे आहे. दहन घाटावरील विकास कामे, पार्किंगची व्यवस्था, पुलांचे बांधकाम, कचरा संकलन अशा लहानसहान कामांसाठी कन्सलटंट नियुक्त करण्याचा प्रकार कुणालाही पटणारा नाही. महापालिकेतील अधिकाऱ्यांचा कामाचा अनुभव व शिक्षण विचारात घेता त्यांना ज्ञान आहे. लहानसहान प्रकल्पांचा आराखडा व त्यावरील अंदाजित खर्च याचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी संबधित अधिकाऱ्यांची तर मोठ्या प्रकल्पाचा अहवाल फायद्याचा की तोट्याचा याचा अंदाज येत नसेल तर मग अधिकारी करतात काय? असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.बस तोट्यात का, जाब विचारणारमहापालिकेने नियुक्त के लेल्या कन्सलटंटने चुकीचा अहवाल दिल्याने आपली बस तोट्यात चालवावी लागत आहे. आधीच आर्थिक स्थिती बिकट असताना चुकीच्या सल्ल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक भार वाढला आहे. यासंदर्भात २० जानेवारीला होणाऱ्या  सर्वसाधारण सभेत प्रशासनाला जाब विचारणार आहे.तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते महापालिका

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक