शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

नागपुरात जुन्या वादातून तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:18 IST

अजनीतील अट्टल गुंडांनी शुक्रवारी दिवसाढवळ्या जुन्या वादातून एका तरुणाची हत्या केली. अजनीतील सम्राट अशोक गार्डनमध्ये ही थरारक घटना घडली. आरोपींनी मृताच्या दोन मित्रांनाही मारहाण केली. त्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती.

ठळक मुद्देअट्टल गुंडांनी केला गेम : अजनीत दिवसाढवळ्या थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनीतील अट्टल गुंडांनी शुक्रवारी दिवसाढवळ्या जुन्या वादातून एका तरुणाची हत्या केली. अजनीतील सम्राट अशोक गार्डनमध्ये ही थरारक घटना घडली. आरोपींनी मृताच्या दोन मित्रांनाही मारहाण केली. त्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती.पवन ऊर्फ आलू भोसले (वय २४, रा. वसंतनगर), स्रेहांशू बोरकर (वय २२, रा. भगवाननगर) आणि निहाल शंभरकर (वय २३, रा. कुकडे लेआऊट) अशी आरोपींची नावे आहेत. प्रतीक संजय ढेंगरे (वय १९, रा. चंद्रमणीनगर) असे मृताचे नाव आहे.मार्च महिन्यात प्रतीकचा मित्र सूरज बिहारी याच्या वाढदिवशी आरोपी आलूसोबत वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यात नेहमीच कुरबुरी होऊ लागल्या. आलू हा कुख्यात गुंड असून, त्याची अजनीत मोठी दहशत आहे. प्रतीक त्याला घाबरत नव्हता. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी कुख्यात आलू प्रयत्न करीत होता. तीन दिवसांपूर्वी प्रतीक आणि आलूचे भांडण झाले. यावेळी आलूने प्रतीकला तेरा गेम करूंगा अशी धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास प्रतीक, त्याचा मित्र रुत्विक नत्थू बोरकर (वय २१) आणि अन्य एक असे तिघे गार्डनमध्ये गप्पा करीत होते. आलूला त्याची कुणकुण लागताच तो, शंभरकर आणि बोरकर असे तिघे तेथे आले. आलूने प्रतीकला थापड मारली. प्रतीकने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याच्या छातीवर चाकूचे घाव घातले. तो पळून जाऊ नये म्हणून आरोपींनी त्याच्या पायावर लाकडी फटके मारले. हृदयाजवळ घाव बसल्याने प्रतीक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ते पाहून मदतीसाठी धावलेल्या रुत्विक आणि अन्य एकावरही आरोपींनी लाकडी फळीचे फटके मारून त्यांना पळवून लावले. हे थरारक हत्याकांड घडले तेव्हा घटनास्थळी मोठी गर्दी होती. मात्र, कुणीही मदतीला धावले नाही.मृतदेह उचलून नेलाप्रतीक रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला. तो कोणतीही हालचाल करीत नव्हता. आरोपींनी त्याला आपल्या दुचाकीवर मध्ये बसवले आणि मेडिकलच्या परिसरात नेऊन फेकल्यानंतर ते पळून गेले. दरम्यान, दिवसाढवळ्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. मोठ्या संख्येत नागरिकांनी गार्डनमध्ये धाव घेतली.त्यानंतर जमाव मेडिकलकडे पोहचला. दरम्यान, माहिती कळताच अजनीचे ठाणेदार शैलेश संख्ये आपल्या ताफ्यासह पोहचले. पाठोपाठ पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनीही धाव घेतली. उपायुक्त भरणे यांनी आरोपींच्या शोधासाठी लगेच विविध भागात पोलीस पथके रवाना केली. रात्रीपर्यंत आरोपींची शोधाशोध सुरू होती. दरम्यान, तरुण मुलाच्या हत्येमुळे प्रतीकच्या कुटुंबीयांवर जबर मानसिक आघात झाला आहे. चंद्रमणीनगरातही यामुळे तणाव तसेच शोककळा पसरली आहे.दहशत पसरविण्यासाठी गुन्हाकुख्यात आलू २०१२ पासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, लुटमार, खंडणी वसुली, शस्त्र प्रतिबंधक कायद्यासह एकूण नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. शंभरकरविरुद्ध चार तर बोरकरविरुद्ध दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंदे करणारे आणि त्यांच्या आश्रयाने सक्रिय असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईची मोहीम उघडकी. त्यामुळे या भागातील अनेक कुख्यात गुन्हेगार पळून गेले. काही कारागृहात आहेत. परिणामी या भागात आपली दहशत निर्माण करण्यासाठी आणि त्यातून खंडणी वसुली करता यावी यासाठी कुख्यात आलू आणि त्याच्या साथीदारांनी प्रतीकचा गेम केल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून