शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

नागपुरात जुन्या वादातून तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:18 IST

अजनीतील अट्टल गुंडांनी शुक्रवारी दिवसाढवळ्या जुन्या वादातून एका तरुणाची हत्या केली. अजनीतील सम्राट अशोक गार्डनमध्ये ही थरारक घटना घडली. आरोपींनी मृताच्या दोन मित्रांनाही मारहाण केली. त्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती.

ठळक मुद्देअट्टल गुंडांनी केला गेम : अजनीत दिवसाढवळ्या थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनीतील अट्टल गुंडांनी शुक्रवारी दिवसाढवळ्या जुन्या वादातून एका तरुणाची हत्या केली. अजनीतील सम्राट अशोक गार्डनमध्ये ही थरारक घटना घडली. आरोपींनी मृताच्या दोन मित्रांनाही मारहाण केली. त्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती.पवन ऊर्फ आलू भोसले (वय २४, रा. वसंतनगर), स्रेहांशू बोरकर (वय २२, रा. भगवाननगर) आणि निहाल शंभरकर (वय २३, रा. कुकडे लेआऊट) अशी आरोपींची नावे आहेत. प्रतीक संजय ढेंगरे (वय १९, रा. चंद्रमणीनगर) असे मृताचे नाव आहे.मार्च महिन्यात प्रतीकचा मित्र सूरज बिहारी याच्या वाढदिवशी आरोपी आलूसोबत वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यात नेहमीच कुरबुरी होऊ लागल्या. आलू हा कुख्यात गुंड असून, त्याची अजनीत मोठी दहशत आहे. प्रतीक त्याला घाबरत नव्हता. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी कुख्यात आलू प्रयत्न करीत होता. तीन दिवसांपूर्वी प्रतीक आणि आलूचे भांडण झाले. यावेळी आलूने प्रतीकला तेरा गेम करूंगा अशी धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास प्रतीक, त्याचा मित्र रुत्विक नत्थू बोरकर (वय २१) आणि अन्य एक असे तिघे गार्डनमध्ये गप्पा करीत होते. आलूला त्याची कुणकुण लागताच तो, शंभरकर आणि बोरकर असे तिघे तेथे आले. आलूने प्रतीकला थापड मारली. प्रतीकने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याच्या छातीवर चाकूचे घाव घातले. तो पळून जाऊ नये म्हणून आरोपींनी त्याच्या पायावर लाकडी फटके मारले. हृदयाजवळ घाव बसल्याने प्रतीक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ते पाहून मदतीसाठी धावलेल्या रुत्विक आणि अन्य एकावरही आरोपींनी लाकडी फळीचे फटके मारून त्यांना पळवून लावले. हे थरारक हत्याकांड घडले तेव्हा घटनास्थळी मोठी गर्दी होती. मात्र, कुणीही मदतीला धावले नाही.मृतदेह उचलून नेलाप्रतीक रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला. तो कोणतीही हालचाल करीत नव्हता. आरोपींनी त्याला आपल्या दुचाकीवर मध्ये बसवले आणि मेडिकलच्या परिसरात नेऊन फेकल्यानंतर ते पळून गेले. दरम्यान, दिवसाढवळ्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. मोठ्या संख्येत नागरिकांनी गार्डनमध्ये धाव घेतली.त्यानंतर जमाव मेडिकलकडे पोहचला. दरम्यान, माहिती कळताच अजनीचे ठाणेदार शैलेश संख्ये आपल्या ताफ्यासह पोहचले. पाठोपाठ पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनीही धाव घेतली. उपायुक्त भरणे यांनी आरोपींच्या शोधासाठी लगेच विविध भागात पोलीस पथके रवाना केली. रात्रीपर्यंत आरोपींची शोधाशोध सुरू होती. दरम्यान, तरुण मुलाच्या हत्येमुळे प्रतीकच्या कुटुंबीयांवर जबर मानसिक आघात झाला आहे. चंद्रमणीनगरातही यामुळे तणाव तसेच शोककळा पसरली आहे.दहशत पसरविण्यासाठी गुन्हाकुख्यात आलू २०१२ पासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, लुटमार, खंडणी वसुली, शस्त्र प्रतिबंधक कायद्यासह एकूण नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. शंभरकरविरुद्ध चार तर बोरकरविरुद्ध दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंदे करणारे आणि त्यांच्या आश्रयाने सक्रिय असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईची मोहीम उघडकी. त्यामुळे या भागातील अनेक कुख्यात गुन्हेगार पळून गेले. काही कारागृहात आहेत. परिणामी या भागात आपली दहशत निर्माण करण्यासाठी आणि त्यातून खंडणी वसुली करता यावी यासाठी कुख्यात आलू आणि त्याच्या साथीदारांनी प्रतीकचा गेम केल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून