शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही तिकडेच थांबा! अरुण गवळीसह अनेक कैद्यांना कारागृह प्रशासनाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 09:26 IST

अभिवचन आणि संचित (पॅरोल आणि फर्लोे) रजेवर कारागृहातून बाहेर पडलेल्या कैद्यांना नमूद मुदतीनंतर तिकडेच थांबून त्यांच्या त्यांच्या शहरातील कारागृहातच जमा होण्याचे आदेश कारागृह प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभिवचन आणि संचित (पॅरोल आणि फर्लोे) रजेवर कारागृहातून बाहेर पडलेल्या कैद्यांना नमूद मुदतीनंतर तिकडेच थांबून त्यांच्या त्यांच्या शहरातील कारागृहातच जमा होण्याचे आदेश कारागृह प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. हे आदेश देण्यात आलेल्या कैद्यांमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याचाही समावेश आहे.न्यायालयाने गुन्ह्यात शिक्षा ठोठावल्यानंतर कारागृहात डांबलेल्या कैद्याला वर्षातून एकदा संचित रजेचा तर वर्षातून दोन वेळा अभिवचन रजेचा लाभ मिळतो. संचित रजेची मुदत २१ ते २८ दिवसांची असते. तर अभिवचन रजेची मुदत ४५ दिवसांपर्यंत मिळते. नमूद रजेत संबंधित कैदी आपल्या गावात, आपल्या कुटुंबात जाऊ शकतो. विशिष्ट मुदतीनंतर त्याला कारागृहात परत यावे लागते. अपवादात्मक कारण वगळता तो कैदी नमूद तारखेवर परतला नाही तर त्याला पोलीस अटक करून कारागृहात डांबतात. त्यानंतर त्याला संचित किंवा अभिवचन रजेचा लाभ मिळत नाही. प्रत्येक कारागृहात विविध कैद्यांच्या संबंधाने संचित आणि अभिवचन वचन रजेवर सोडण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असते. गेल्या महिनाभरात नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून १२ कैदी संचित आणि अभिवचन रजेवर त्यांच्या त्यांच्या गावी गेले आहेत. संचित रजेवर जाणाऱ्यांची संख्या दोन असून त्यातील एक मुंबईचा तर दुसरा नागपूरचा आहे. तर अभिवचन रजेवर गेलेल्या १० कैद्यांमध्ये कोथरूड पुणे येथील १, वर्धा येथील १, मुंबई येथील २, गडचिरोली येथील ३ आणि नागपूर येथील ३ कैद्यांचा समावेश आहे. हे कैदी रजेवर कारागृहातून बाहेर गेल्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले आणि त्यामुळे एका वेगळ्याच वातावरणाची निर्मिती झाली. बाहेरून येणाºया कैद्यांमुळे कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या. राज्य कारागृह प्रशासनाने अभिवचन आणि संचित रजेवर बाहेर गेलेल्या कैद्यांच्या संबंधानेही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार ज्या शहरातील कैदी कारागृहातून बाहेर गेले त्यांनी त्याच शहराच्या कारागृहात नमूद अवधीनंतर हजर (जमा) व्हायचे आहे. अर्थात, नागपूरचा कैदी मुंबईला गेला तर त्याने परत नमूद मुदतीनंतर नागपूरच्या कारागृहात नव्हे तर मुंबईच्याच कारागृहात जमा व्हावे, असा हा आदेश आहे.विशेष म्हणजे नागपूर कारागृहातून अभिवचन रजेवर बाहेर गेलेल्या कैद्यांमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याचाही समावेश आहे. तो १२ मार्चला अभिवचन रजेवर बाहेर गेला असून २७ एप्रिलला त्याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात परत यायचे होते. परंतु नव्या निर्णयानुसार त्याला स्थानिक कारागृह प्रशासनाने नागपूरला यायचे नाही, मुंबईच्याच कारागृहात २७ एप्रिलला जमा व्हावे, असे आदेश दिले असल्याची माहिती कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी ‘लोकमत’ला दिली. कारागृहातून रजेवर बाहेर गेलेल्या कैद्यांना त्या-त्या कारागृह प्रशासनाने असेच आदेश दिलेले आहेत.जेलयात्रा थांबलीलॉकडाऊनपूर्वी येथील मध्यवर्ती कारागृहातून रोज ४० ते ५० कैदी बाहेर जायचे. यातील काहींची तारीख असायची तर काहींच्या जामीन अर्जावर सुनावणी असल्यामुळे त्यांना न्यायालयात पाठविण्यात येत होते. त्यातील किमान पंचवीस ते तीस कैदी परत कारागृहात येत होते. वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक झालेल्या आणि न्यायालयाच्या आदेशानुसार कोठडी देण्यात आलेल्या दहा ते पंधरा कैद्यांचीही रोज कारागृहात एन्ट्री व्हायची. लॉकडाऊनमुळे ही प्रक्रियाच थंड पडली असून आता फार फार तर दोन किंवा तीन कैदी आतमध्ये येतात. त्यांची कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच तपासणी केली जाते. आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याशिवाय त्यांना आत घेतले जात नाही. थोडाही संशय आल्यास त्यांना कारागृहाच्या प्रवेशद्वारावरून थेट मेडिकलमध्ये पाठवण्यात येते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येते, असे अनुप कुमरे यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Arun Gawliअरुण गवळीjailतुरुंग