शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

दुसऱ्याची काठी तोडून आपली काठी मोठी होऊ शकत नाही; प्रल्हाद वामनराव पै

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 22:19 IST

Nagpur News दुसऱ्याची काठी तोडून आपली काठी मोठी करण्याचा ज्याचा कुणाचा मानस आहेत, तो अशक्य आहे, असे मत जीवनविद्या मिशन, मुंबईचे प्रल्हाद वामनराव पै यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे जागतिक सौहार्दाचे चिंतन आंतरधर्मीय परिषदेतून व्हावे

नागपूर : अफगाणिस्तानमध्ये घडलेले धार्मिक कट्टरतावादी परिवर्तन असो वा अमेरिकेतील आर्थिक दडपण, त्या सगळ्याचा प्रभाव जगावर पडतो आहे. त्यामुळे दुसऱ्याची काठी तोडून आपली काठी मोठी करण्याचा ज्याचा कुणाचा मानस आहेत, तो अशक्य आहे, असे मत जीवनविद्या मिशन, मुंबईचे प्रल्हाद वामनराव पै यांनी व्यक्त केले. लोकमत राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत सहभागी होण्यासाठी ते आले असता शनिवारी 'लोकमत'शी बोलत होते.

सद्गुरू वामनराव पै यांनी निसर्ग नियमाला धरून जीवनविद्या तत्त्वज्ञान सांगितले. निसर्ग तत्त्वज्ञान सगळ्यांसाठी सारखेच आहे. आपल्या ऋषी, मुनींनी याच तत्त्वज्ञानाचा अंगीकार करण्याचे आवाहन केले आहे. एकवेळ सर्व धर्म सगळ्यांसाठी असण्यावर दुमत असू शकेल; मात्र निसर्ग तत्त्वज्ञान सगळ्यांसाठी नाही असे कुणीच म्हणू शकत नाही. ''मैं नहीं हम, हम नहीं सब'' हा विचार जीवनविद्या मिशन शिकवतो. मानवी देह परावलंबी आहे आणि इतरांच्या सुख-दुःखात आपले वैयक्तिक सुख-दुःख समाविष्ट असते, याचे भान जागृत होणे गरजेचे आहे. या आंतरधर्मीय परिषदेतून जागतिक सौहार्दाचे चिंतन बाहेर पडावे, अशी भावना प्रल्हाद वामनराव पै यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदWamanrao Paiवामनराव पै