तीन दिवसांपासून मृत्यूला हुलकावणी देत होता योगेश()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST2021-06-24T04:07:45+5:302021-06-24T04:07:45+5:30
नागपूर : गुन्हेगार गोलु धोटे त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या योगेश डोंगरेला तीन दिवसांपासून शोधत होता. स्वत:ला वाचविण्यासाठी योगेश ...

तीन दिवसांपासून मृत्यूला हुलकावणी देत होता योगेश()
नागपूर : गुन्हेगार गोलु धोटे त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या योगेश डोंगरेला तीन दिवसांपासून शोधत होता. स्वत:ला वाचविण्यासाठी योगेश वस्तीतून पळून गेला होता. परंतु पोलिसांकडे न जाता घरी परतल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान कोतवाली पोलिसांनी गोलु धोटे आणि त्याचा साथीदार हर्ष उमाडेची दोन दिवस पोलीस कोठडी मिळविली आहे. मंगळवारी झालेल्या या घटनेची लाईव्ह क्लिप व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
गोलुच्या पत्नीचे योगेशशी अनैतिक संबंध होते. १९ जूनला गोलुच्या आईने सुनेला योगेशसोबत बघितले होते. ही बाब माहीत झाल्यानंतर गोलु, हर्ष आणि ऋषिकेश ऊर्फ कांचा धुर्वे योगेशचा शोध घेत होते. त्याबाबत माहिती होताच गोलु वस्तीतून फरार झाला होता. गोलुचा गुन्हेगारी जगताशी संबंध असून तो आपला खून करू शकतो हे योगेशला माहीत होते. परंतु तरीसुद्धा योगेशने पोलिसात तक्रार केली नाही. तो प्रकरण शांत झाल्याचे समजून घरी परत आला. त्याची माहिती मिळताच गोलु संधी शोधत होता. गोलु आणि त्याच्या साथीदारांनी सोमवारी रात्री योगेशचा शोध घेतला. मंगळवारी सकाळी ते योगेश बाहेर पडण्याची वाट पाहत होते. तो घराबाहेर पडत नसल्याचे पाहून ते शस्त्र घेऊन योगेशच्या घरी पोहोचले. योगेश जीव वाचविण्यासाठी घराच्या मागील दारातून नागनदीच्या दिशेने पळाला. गोलु आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केला. जखमी झाल्यामुळे त्याने नागनदीत उडी मारली. तो नागनदी पार करून पळून जाणार होता. परंतु जखमी झाल्यामुळे यशस्वी झाला नाही. गोलुने पाठलाग करून मध्येच त्याला पकडले आणि चाकूने वार केले.
..........
पोलिसांना माहीत न होणे गंभीर
गोलु आणि योगेशमध्ये भांडण सुरू असल्याची बाब पोलिसांना माहीत नव्हती. परंतु शिवाजीनगर झोपडपट्टी संवेदनशील असल्यामुळे आणि गोलुची गुन्हेगारी प्रवृत्ती असल्यामुळे पोलिसांना माहीत होणे आवश्यक होते. पोलिसांचे नेटवर्क चांगले असते तर परिसरातील नागरिकांनी बीटमध्ये तैनात अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्क केले असते. कोतवाली पोलिसांच्या याच चुकीमुळे १४ मे रोजी कुख्यात घाटे बंधूंनी दिवसाढवळ्या तडीपार गुंडाचा खून केला होता. त्यानंतर येथील ठाणेदाराची बदली करण्यात आली होती.
...............