शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२०३० मध्ये जगभरात १६५ मिलियन टन घनकचरा

By admin | Updated: April 12, 2017 01:58 IST

जगभरात घनकचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर रूप घेत असून केवळ २८ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे.

अशोक पांडे : घनकचरा व्यवस्थापनावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला ‘नीरी’त प्रारंभनागपूर : जगभरात घनकचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर रूप घेत असून केवळ २८ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे. २०३० मध्ये हा जागतिक प्रश्न बनेल व १६५ मिलियन टन घनकचरा निर्माण होईल. याचा सामना करण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीदेखील आपली जबाबदारी ओळखायला हवी, असे मत मोहाली ‘सीआयएबी’चे (सेंटर आॅफ इनोव्हेटिव्ह अ‍ॅन्ड अप्लाईड बायोप्रोसेसिंग) ज्येष्ठ संशोधक डॉ.अशोक पांडे यांनी व्यक्त केले. ‘नीरी’, शासकीय विज्ञान संस्था, शासकीय न्यायसहायक संस्था,‘स्वच्छ नागपूर’ ही स्वयंसेवी संस्था व मोहता महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते.‘विकसनशील देशांत एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रणाली’ या विषयावरील या परिषदेचे मुख्य अतिथी म्हणून हाँगकाँग बाप्टिस्ट विद्यापीठाचे संचालक प्रा.जोनाथन वांग, ‘सीएसआयआर’च्या (कौन्सिल आॅफ सायन्टिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रीअल रिसर्च) भरती व मूल्यांकन मंडळाचे चेअरमन डॉ.सतीश वटे, ‘सीएसआयआर-सीमफर’चे (सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मायनिंग अ‍ॅन्ड फ्युअल रिसर्च) संचालक डॉ.प्रदीप सिंह, ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ.रामदार आत्राम, शासकीय न्यायवैद्यक संस्थेचे संचालक डॉ.जयराम खोब्रागडे व आयोजन सचिव डॉ.सुनील कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.जगातील तीन चतुर्थांश कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया करण्यात येत नाही. ‘ई-वेस्ट’चा प्रश्न तर आणखी गंभीर आहे. भारत तर ‘ई-वेस्ट’साठी ‘डम्पिंग यार्ड’च झाला आहे. त्यामुळेच सर्वसमावेशक धोरण निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अशा उपक्रमात ‘नीरी’ने नेतृत्व करावे, असे प्रतिपादन अशोक पांडे यांनी केले. प्रा.जोनाथन वांग यांनी जगभरातील घनकचरा व्यवस्थापन प्रणालींवर प्रकाश टाकला. घनकचरा व्यवस्थापनासाठी एकमेकांची नक्कल करण्यापेक्षा आवश्यकतेनुसार धोरणे ठरविली गेली पाहिजेत, असे ते म्हणाले. डॉ.सुनील कुमार यांनी प्रास्ताविक केले. पहिल्या दिवशी सहा तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. देश-विदेशातून १०० हून अधिक संशोधक यात सहभागी झाले आहेत.डॉ.सतीश वटे यांनी यावेळी घनकचरा व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचे किती महत्त्व आहे, यावर भाष्य केले. वैज्ञानिकांनी समाजाचे हित लक्षात घेऊन संशोधन केले पाहिजे. आता संशोधन प्रयोगशाळांमधून प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर नेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ.प्रदीप सिंह यांनी केले. या आंतरराष्ट्रीय संमेलनातून घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील अनेक सकारात्मक बाबी समोर येतील. यातून प्रशासनालादेखील दिशा मिळेल, असा विश्वास डॉ.राकेश कुमार यांनी व्यक्त केला. घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी जागृती आवश्यक असल्याचे मत डॉ. खोब्रागडे यांनी व्यक्त केले. डॉ.आत्राम यांनी या परिषदेचे महत्त्व विषद केले.(प्रतिनिधी)सहापट वाढणार घनकचरा : निकोलस थेमेलिसअमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाचे संचालक प्रा.निकोलस थेमेलिस यांनी ‘वेबकास्टिंग’च्या माध्यमातून ‘आशियातील शाश्वत घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर आपले मत व्यक्त केले. आताच्या स्थितीत १० टक्के घनकचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याला परत उपयोगात आणले जात आहे. मात्र ९० टक्के कचरा ‘डम्पिंग यार्ड’मध्ये पडून राहतो. कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने आशियामध्ये जमीन प्रदूषण वाढत आहे. चीनमध्ये कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती करणारे २०० हून अधिक प्रकल्प आहे. त्याच धर्तीवर भारतानेदेखील पुढाकार घ्यायला हवा. देशात चार ते पाच प्रकल्पच असून यांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. २०३० पर्यंत आशियातील घनकचरा सहा पटींनी वाढेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.कचरा विलग करण्यासाठी पदवी लागते का ?यावेळी प्रा.जोनाथन वांग यांनी प्रशासनाच्या धोरणांवरच बोट ठेवले. उगमाच्या ठिकाणीच कचरा विलग झाला तर घनकचरा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होऊ शकते. मात्र कचरा विलग होणे शक्य नाही, असा दावा प्रशासनांकडून करण्यात येतो. कचरा विलग करण्यासाठी कुठल्याही पदवीची आवश्यकता असते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.