शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

२०३० मध्ये जगभरात १६५ मिलियन टन घनकचरा

By admin | Updated: April 12, 2017 01:58 IST

जगभरात घनकचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर रूप घेत असून केवळ २८ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे.

अशोक पांडे : घनकचरा व्यवस्थापनावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला ‘नीरी’त प्रारंभनागपूर : जगभरात घनकचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर रूप घेत असून केवळ २८ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे. २०३० मध्ये हा जागतिक प्रश्न बनेल व १६५ मिलियन टन घनकचरा निर्माण होईल. याचा सामना करण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीदेखील आपली जबाबदारी ओळखायला हवी, असे मत मोहाली ‘सीआयएबी’चे (सेंटर आॅफ इनोव्हेटिव्ह अ‍ॅन्ड अप्लाईड बायोप्रोसेसिंग) ज्येष्ठ संशोधक डॉ.अशोक पांडे यांनी व्यक्त केले. ‘नीरी’, शासकीय विज्ञान संस्था, शासकीय न्यायसहायक संस्था,‘स्वच्छ नागपूर’ ही स्वयंसेवी संस्था व मोहता महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते.‘विकसनशील देशांत एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रणाली’ या विषयावरील या परिषदेचे मुख्य अतिथी म्हणून हाँगकाँग बाप्टिस्ट विद्यापीठाचे संचालक प्रा.जोनाथन वांग, ‘सीएसआयआर’च्या (कौन्सिल आॅफ सायन्टिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रीअल रिसर्च) भरती व मूल्यांकन मंडळाचे चेअरमन डॉ.सतीश वटे, ‘सीएसआयआर-सीमफर’चे (सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मायनिंग अ‍ॅन्ड फ्युअल रिसर्च) संचालक डॉ.प्रदीप सिंह, ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ.रामदार आत्राम, शासकीय न्यायवैद्यक संस्थेचे संचालक डॉ.जयराम खोब्रागडे व आयोजन सचिव डॉ.सुनील कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.जगातील तीन चतुर्थांश कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया करण्यात येत नाही. ‘ई-वेस्ट’चा प्रश्न तर आणखी गंभीर आहे. भारत तर ‘ई-वेस्ट’साठी ‘डम्पिंग यार्ड’च झाला आहे. त्यामुळेच सर्वसमावेशक धोरण निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अशा उपक्रमात ‘नीरी’ने नेतृत्व करावे, असे प्रतिपादन अशोक पांडे यांनी केले. प्रा.जोनाथन वांग यांनी जगभरातील घनकचरा व्यवस्थापन प्रणालींवर प्रकाश टाकला. घनकचरा व्यवस्थापनासाठी एकमेकांची नक्कल करण्यापेक्षा आवश्यकतेनुसार धोरणे ठरविली गेली पाहिजेत, असे ते म्हणाले. डॉ.सुनील कुमार यांनी प्रास्ताविक केले. पहिल्या दिवशी सहा तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. देश-विदेशातून १०० हून अधिक संशोधक यात सहभागी झाले आहेत.डॉ.सतीश वटे यांनी यावेळी घनकचरा व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचे किती महत्त्व आहे, यावर भाष्य केले. वैज्ञानिकांनी समाजाचे हित लक्षात घेऊन संशोधन केले पाहिजे. आता संशोधन प्रयोगशाळांमधून प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर नेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ.प्रदीप सिंह यांनी केले. या आंतरराष्ट्रीय संमेलनातून घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील अनेक सकारात्मक बाबी समोर येतील. यातून प्रशासनालादेखील दिशा मिळेल, असा विश्वास डॉ.राकेश कुमार यांनी व्यक्त केला. घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी जागृती आवश्यक असल्याचे मत डॉ. खोब्रागडे यांनी व्यक्त केले. डॉ.आत्राम यांनी या परिषदेचे महत्त्व विषद केले.(प्रतिनिधी)सहापट वाढणार घनकचरा : निकोलस थेमेलिसअमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाचे संचालक प्रा.निकोलस थेमेलिस यांनी ‘वेबकास्टिंग’च्या माध्यमातून ‘आशियातील शाश्वत घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर आपले मत व्यक्त केले. आताच्या स्थितीत १० टक्के घनकचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याला परत उपयोगात आणले जात आहे. मात्र ९० टक्के कचरा ‘डम्पिंग यार्ड’मध्ये पडून राहतो. कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने आशियामध्ये जमीन प्रदूषण वाढत आहे. चीनमध्ये कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती करणारे २०० हून अधिक प्रकल्प आहे. त्याच धर्तीवर भारतानेदेखील पुढाकार घ्यायला हवा. देशात चार ते पाच प्रकल्पच असून यांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. २०३० पर्यंत आशियातील घनकचरा सहा पटींनी वाढेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.कचरा विलग करण्यासाठी पदवी लागते का ?यावेळी प्रा.जोनाथन वांग यांनी प्रशासनाच्या धोरणांवरच बोट ठेवले. उगमाच्या ठिकाणीच कचरा विलग झाला तर घनकचरा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होऊ शकते. मात्र कचरा विलग होणे शक्य नाही, असा दावा प्रशासनांकडून करण्यात येतो. कचरा विलग करण्यासाठी कुठल्याही पदवीची आवश्यकता असते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.