शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

भारतीय संस्कृतीतून विश्वकल्याण, नागपूरच्या भूमीतून जगाला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 10:56 IST

‘सी-२० समिट’चा समारोप : मानवतेच्या मूल्यांतूनच शाश्वत बदलांचा मार्ग

नागपूर : ‘जी-२०’अंतर्गत आयोजित ‘सी-२० समिट’मध्ये देश-विदेशातील प्रतिनिधी व तज्ज्ञांचे विविध विषयांवर मंथन झाले. जगभरातील विविधतेचा आदर करत मानवतेला सर्वोच्च मानूनच सामान्य माणसाच्या आयुष्यात शाश्वत बदल होऊ शकतो. भारतीय संस्कृतीतील संस्कार, आचार, विचार यातूनच विश्वकल्याण होऊ शकते, असा नागपूरच्या भूमीतून जगाला संदेश देण्यात आला.

‘सी-२० समिट’चा मंगळवारी समारोप झाला. त्यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, सी-२० परिषदेच्या उद्घाटक माता अमृतानंदमयी देवी, जी-२० चे शेरपा तसेच भारताचे माजी राजदूत विजय नांबियार, जी-२० चे शेरपा तसेच विदेश मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अभय ठाकूर, सी-२० सचिवालयाचे संरक्षक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे, स्थानिक आयोजन समितीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

एक जग, एक कुटुंब, एक भविष्य या मान्यतेवर पुढील काळात वाटचाल करण्याचा संकल्प ‘सी-२०’मध्ये घेण्यात आला. हे धोरण ठरविताना जगाच्या विविधतेचा आदर करताना मानवतेला सर्वोच्च स्थान देण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत मानवतेला धोका निर्माण होणार नाही. प्रत्येकाच्या सांस्कृतिक वारशावर तेथील आर्थिक उन्नती अवलंबून असते. त्यामुळे मूळ गाभ्याला धोका पोहोचणार नाही, अशी वाटचाल करण्याची अपेक्षा मान्यवरांनी समारोपीय भाषणात व्यक्त केली.

नागपुरात झालेल्या ‘सी-२०’च्या विचारमंथनातून तयार झालेल्या प्रस्तावांची मांडणी पुढील बैठकीत करण्यात येणार आहे. जयपूर येथे ३१ जुलै २०२३ रोजी पार पडणाऱ्या सी-२० च्या शिखर परिषदेत नागपुरातील परिषदेतील मंथनातून आलेले विषय अंतर्भूत होतील.

गतिशील अर्थसत्ता ही भारताची ओळख : गडकरी

मूल्यांवर आधारित भारतीय कुटुंबरचना व त्यातून वसुधैव कुटुंबकम् भूमिका साकारताना समतोल विकासाचे आर्थिक आणि सामाजिक विकासाचे धोरण अवलंबावे लागेल. जगातील गतीने विकसित होणारी अर्थसत्ता म्हणून भारत पुढे येत आहे. मात्र, ही वाटचाल सुरू असताना आमची सामाजिक वाटचाल ही मूल्याधारित, आर्थिकदृष्टया सक्षम, पर्यावरणपूरक व निसर्गाशी एकरूप असणारी अशी असावी, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. शेतीला आता केवळ अन्नधान्य पुरवठा करणारे कोठार न समजता ऊर्जास्त्रोत तयार करण्याचा संकल्प देशाने केला असून, २०७० अगोदर भारताला कार्बनमुक्त देश करणार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

या विषयांवर परिसंवादांचे आयोजन

  • पर्यावरणासोबत विकासाचा समतोल राखणे
  • नागरी संस्था व्यवस्थापन आणि मानवी मूल्यांना प्रोत्साहन
  • मानव विकासामध्ये नागरी संस्थांची भूमिका, अभिनवता
  • तंत्रज्ञानाचे प्रवर्तक म्हणून नागरी संस्थांची भूमिका
टॅग्स :nagpurनागपूरSocialसामाजिकNitin Gadkariनितीन गडकरी