शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

भारतीय संस्कृतीतून विश्वकल्याण, नागपूरच्या भूमीतून जगाला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 10:56 IST

‘सी-२० समिट’चा समारोप : मानवतेच्या मूल्यांतूनच शाश्वत बदलांचा मार्ग

नागपूर : ‘जी-२०’अंतर्गत आयोजित ‘सी-२० समिट’मध्ये देश-विदेशातील प्रतिनिधी व तज्ज्ञांचे विविध विषयांवर मंथन झाले. जगभरातील विविधतेचा आदर करत मानवतेला सर्वोच्च मानूनच सामान्य माणसाच्या आयुष्यात शाश्वत बदल होऊ शकतो. भारतीय संस्कृतीतील संस्कार, आचार, विचार यातूनच विश्वकल्याण होऊ शकते, असा नागपूरच्या भूमीतून जगाला संदेश देण्यात आला.

‘सी-२० समिट’चा मंगळवारी समारोप झाला. त्यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, सी-२० परिषदेच्या उद्घाटक माता अमृतानंदमयी देवी, जी-२० चे शेरपा तसेच भारताचे माजी राजदूत विजय नांबियार, जी-२० चे शेरपा तसेच विदेश मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अभय ठाकूर, सी-२० सचिवालयाचे संरक्षक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे, स्थानिक आयोजन समितीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

एक जग, एक कुटुंब, एक भविष्य या मान्यतेवर पुढील काळात वाटचाल करण्याचा संकल्प ‘सी-२०’मध्ये घेण्यात आला. हे धोरण ठरविताना जगाच्या विविधतेचा आदर करताना मानवतेला सर्वोच्च स्थान देण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत मानवतेला धोका निर्माण होणार नाही. प्रत्येकाच्या सांस्कृतिक वारशावर तेथील आर्थिक उन्नती अवलंबून असते. त्यामुळे मूळ गाभ्याला धोका पोहोचणार नाही, अशी वाटचाल करण्याची अपेक्षा मान्यवरांनी समारोपीय भाषणात व्यक्त केली.

नागपुरात झालेल्या ‘सी-२०’च्या विचारमंथनातून तयार झालेल्या प्रस्तावांची मांडणी पुढील बैठकीत करण्यात येणार आहे. जयपूर येथे ३१ जुलै २०२३ रोजी पार पडणाऱ्या सी-२० च्या शिखर परिषदेत नागपुरातील परिषदेतील मंथनातून आलेले विषय अंतर्भूत होतील.

गतिशील अर्थसत्ता ही भारताची ओळख : गडकरी

मूल्यांवर आधारित भारतीय कुटुंबरचना व त्यातून वसुधैव कुटुंबकम् भूमिका साकारताना समतोल विकासाचे आर्थिक आणि सामाजिक विकासाचे धोरण अवलंबावे लागेल. जगातील गतीने विकसित होणारी अर्थसत्ता म्हणून भारत पुढे येत आहे. मात्र, ही वाटचाल सुरू असताना आमची सामाजिक वाटचाल ही मूल्याधारित, आर्थिकदृष्टया सक्षम, पर्यावरणपूरक व निसर्गाशी एकरूप असणारी अशी असावी, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. शेतीला आता केवळ अन्नधान्य पुरवठा करणारे कोठार न समजता ऊर्जास्त्रोत तयार करण्याचा संकल्प देशाने केला असून, २०७० अगोदर भारताला कार्बनमुक्त देश करणार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

या विषयांवर परिसंवादांचे आयोजन

  • पर्यावरणासोबत विकासाचा समतोल राखणे
  • नागरी संस्था व्यवस्थापन आणि मानवी मूल्यांना प्रोत्साहन
  • मानव विकासामध्ये नागरी संस्थांची भूमिका, अभिनवता
  • तंत्रज्ञानाचे प्रवर्तक म्हणून नागरी संस्थांची भूमिका
टॅग्स :nagpurनागपूरSocialसामाजिकNitin Gadkariनितीन गडकरी