शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक थॅलेसेमिया दिन : रक्त हवे, रक्तदाता आणा,थॅलेसेमियाचे रुग्ण अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 22:35 IST

रक्त हवे असल्यास रक्तदाता आणा, असा अजब निर्णय कॉही रक्तपेढ्यांनी घेतला आहे. यामुळे दर १५ दिवसानी लागणाऱ्या रक्तासाठी कुठून रक्तदाता आणावा, असा प्रश्न रुग्ण व त्यांच्य पालकांना पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊन, त्यात रक्तपेढ्यांच्या या अडवणुकीमुळे थॅलेसेमियाचे रुग्ण अडचणीत आले आहे.

ठळक मुद्देरक्तपेढ्यांची अडवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रक्त हवे असल्यास रक्तदाता आणा, असा अजब निर्णय कॉही रक्तपेढ्यांनी घेतला आहे. यामुळे दर १५ दिवसानी लागणाऱ्या रक्तासाठी कुठून रक्तदाता आणावा, असा प्रश्न रुग्ण व त्यांच्य पालकांना पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊन, त्यात रक्तपेढ्यांच्या या अडवणुकीमुळे थॅलेसेमियाचे रुग्ण अडचणीत आले आहे.थॅलेसेमियाच्या रुग्णांना आयुष्यभर रक्त घ्यावे लागते. साधारण १५ ते ३० दिवसाच्या अंतराने रक्त चढवावे लागते. सिकलसेल व थॅलेसेमिया सेंटरचे संचालक डॉ. विंकी रुघवानी यांनी सांगितले.‘लॉकडाऊन’ मुळे सध्या रक्तदान शिबिरे बंद आहेत. थॅलेसेमियापीडितांना ताजे रक्त मिळेनासे झाले आहे. जिथे रक्त उपलब्ध होत आहे तिथे सात दिवस आधीचे रक्त घेण्याची वेळ आली आहे. हे त्यांच्या शरीरासाठी हानिकारक आहे. सरकारी आदेशानुसार थॅलेसेमियाच्या रुग्णांना नि:शुल्क व रक्तदाता न देता रक्त देणे रक्तपेढींसाठी बंधनकारक आहे. परंतु आता रक्तपेढीच रुग्णांकडे रक्तदाता उपलब्ध करण्यास सांगत आहे. दर १५ दिवसात रक्तदाता मिळवणे रुग्ण व त्यांच्या पालकांसाठी कठिण होत आहे. विशेष म्हणजे, अनेक रुग्ण मेयो, मेडिकलमधून रक्त घेत असतात. परंतु येथे कोरोनाबाधित रुग्ण ठेवले जात असल्याने या रुग्णालयात जाण्यास अनेकांना भीती वाटत आहे. या शिवाय, गावखेड्यातून शहरात रक्तासाठी येणाºया रुग्णांना पोलिसांच्या अटकावालाही सामोरा जावे लागत आहे. वेळेवर रक्त मिळणे कठीण झाल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. या रुग्णांना नियमित रक्त मिळण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. देशातील जवळजवळ दीड लाख थॅलेसेमियापीडित या समस्येला तोंड देत असल्याचेही डॉ. रुघवानी म्हणाले. 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीnagpurनागपूर