शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

जागतिक रेबीज दिन :दर २५ मिनिटाला रेबीजमुळे एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 22:05 IST

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून देशात दर २५ मिनिटाला रेबीजमुळे एकाचा मृत्यू होतो. यात १५ वर्षाखालील मुलांची संख्या सर्वात जास्त आहे.

ठळक मुद्देभारतात दरवर्षी ३० हजार लोक मृत्यूच्या दारात : जीवघेण्या आजारावर जनजागृती आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्वानदंशामुळे ‘रेबीज’च्या ज्या केसेस भारतात आढळतात, त्यातील ९७ टक्के पिसाळलेल्या कुत्र्यापासून उद्भवलेल्या असतात. जगात दरवर्षी रेबीजमुळे ६० हजार लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी जवळपास ३० हजार लोक एकट्या भारतात मृत्यू पावतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून देशात दर २५ मिनिटाला रेबीजमुळे एकाचा मृत्यू होतो. यात १५ वर्षाखालील मुलांची संख्या सर्वात जास्त आहे.रेबीज हा प्राण्यांना व मानवाला होणारा जीवघेणा आजार आहे. हा आजार कुत्र्यांपासून, जंगली कोल्ह्यांपासून, वटवाघुळापासून चावा घेतल्याने होतो. ‘रेबीज’चे दुसरे नाव मृत्यू आहे. आजारापूर्वी श्वानदंशानंतर संपूर्ण प्रतिबंधक लसीकरण व जखमेवर उपाययोजना हाच जीवनाचा आधार आहे. कुत्रा चावल्यानंतर शासकीय रु ग्णालयात नि:शुल्क लस उपलब्ध आहे, मात्र कुठल्याही पशु चिकित्सालयात ही सोय उपलब्ध नाही. हा रोग होऊ नये म्हणून श्वानाकरिता नि:शुल्क नियमित लसीकरण अपेक्षित आहे. परंतु ही सोय उपलब्ध नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. शहरातील, गावातील सर्वच मोकाट कुत्र्यांना लस टोचणे हे प्रशासनाला शक्य होत नाही हे वास्तव असले तरी या दिशेने संशोधन व जनजागृती करून या समस्येवर मात केली जाऊ शकते, असे तज्ज्ञाचे मत आहे.नि:शुल्क लसीकरणासाठी संस्थांचा पुढाकारपशुधन विकास अधिकारी डॉ. अजय पोहरकर यांनी सांगितले, पशु सर्वचिकित्सालय नागपूर व नावार संस्था आणि ‘इंडियन इम्युनोलॉजिकल्स लि.’ या संस्थांच्या सहभागाने पाळीव प्राण्याकरिता ‘अ‍ॅण्टी रेबीज’ लसीकरणाची नि:शुल्क सोय उपलब्ध केली आहे. तसेच सरकारने नागपुरात ‘वन हेल्थ इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या समस्येच्या निराकरणासाठी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.लक्षणे केव्हा दिसतील याचा नेम नाहीश्वानदंश झाल्यानंतर त्याची लक्षणे केव्हा दिसून येतील याचा नेम राहत नाही. पहिल्या काही दिवसात किंवा एक वर्षांनंतरही ही लक्षणे दिसून येऊ शकतात. दंश झालेल्या जागेवर पुरळ येणे, खाज सुटणे, झिणझिण्या येणे, ताप येऊन डोके दुखणे, स्रायू दुखणे, यात रोग्याला प्रकाशाची व पाण्याची भीती वाटणे ही काही प्राथमिक लक्षणे आहेत.दंश होताच डॉक्टरांशी संपर्क साधा 

दंश होताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. यावर विशिष्ट असे उपचार नाहीत, पण वेळीच लस (इन्जेक्शन) घेतल्यास त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविता येते.जागतिक रॅबीज दिनानिमित्त २८सप्टेंबर २०१९ ला पशु सर्वाचिकित्सालय, महाराज बाग रोड, सीताबर्डी नागपूर येथे सकाळी ८ ते १२ या वेळेत पाळीव तसेच मोकाट कुत्रे व मांजरींना नि:शुल्क अँटी रॅबीज लस टोचण्यात येणार आहे. पशुप्रेमी व पशुकल्याणार्थ कार्य करणाऱ्यांनी व नागपूर महानगर पालिकेने सहभाग नोंदवून रॅबीज मुक्त देश ही संकल्पना साध्य करण्याकरिता जास्तीत जास्त कुत्रे व मांजरी यांचे नि:शुल्क लसीकरण करून घ्यावे.डॉ. अजय पोहरकरपशुधन विकास अधिकारीअध्यक्ष म.रा. पशुवैद्यक परिषदएकदा रॅबीज झाल्यास १०० टक्के मृत्यू 
रॅबीज हा ‘रेबडो व्हायरस’ नावाचा विषाणू रोगट प्राण्यांच्या लाळेतून संपर्क स्थापित झाल्यावर होतो. हा रोग कुत्रा चावल्यामुळे जास्त प्रमाणात होतो. दंशमार्गाने रॅबीजचे विषाणू मानवाच्या शरीरात प्रवेश करतात व ते मज्जातंतूपर्यंत पोहचतात. यामुळे मेंदूला सूज येते. मेंदूमधून हे रॅबीजचे विषाणू लाळोत्पादक ग्रंथीत शिरतात व त्यानंतर लाळेत या विषाणूचा प्रादुर्भाव जाणवायला लागतो. एकदा रॅबीज झाल्यास १०० टक्के मृत्यूचा धोका असतो. यामुळे श्वानदंश होताच डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेणे आवश्यक असते.डॉ. चंद्रशेखर मेश्राममेंदू रोग तज्ज्ञ

टॅग्स :dogकुत्राDeathमृत्यू