शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

जागतिक रेबीज दिन; नागपूर विभागात तब्बल १५२३ जणांना रेबीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 07:00 IST

Nagpur News नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मागील पाच वर्षांत तब्बल १५२३ रेबीजची प्रकरणे समोर आली आहेत. या सर्वांचा मृत्यू झाला असला तरी शासनदरबारी केवळ दोन मृत्यूची नोंद आहे.

ठळक मुद्देशासनदरबारी केवळ दोन मृत्यूची नोंद

सुमेध वाघमारे

नागपूर : श्वान, मांजरीने चावा घेतल्याने होणाऱ्या ‘रेबीज’चे दुसरे नाव मृत्यू आहे. जगात दरवर्षी सुमारे ६० हजार लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी जवळपास ३० हजार लोकांचे मृत्यू एकट्या भारतात होतात. असे असताना, रेबीज या भयंकर रोगाबाबत आजमितीला जनतेत फारशी जागरूकता नाही. धक्कादायक म्हणजे, नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मागील पाच वर्षांत तब्बल १५२३ रेबीजची प्रकरणे समोर आली आहेत. या सर्वांचा मृत्यू झाला असला तरी शासनदरबारी केवळ दोन मृत्यूची नोंद आहे. (World Rabies Day)

रेबीज हा प्राण्यांना व मानवाला होणारा जीवघेणा आजार आहे. हा आजार कुत्रे, मांजर, जंगली कोल्ह्यांपासून ते वटवाघुळाने चावा घेतल्याने होतो. श्वानदंशानंतर संपूर्ण प्रतिबंधक लसीकरण व जखमेवर उपाययोजना हाच जीवनाचा आधार आहे. कुत्रा चावल्यानंतर शासकीय रुग्णालयात नि:शुल्क लस उपलब्ध आहे. मात्र, कुठल्याही पशुचिकित्सालयात ही सोय उपलब्ध नाही. हा रोग होऊ नये म्हणून श्वानाकरिता नि:शुल्क नियमित लसीकरण अपेक्षित आहे. परंतु, ही सोय उपलब्ध नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. शहरांतील, गावांतील सर्वच मोकाट कुत्र्यांना लस टोचणे हे प्रशासनाला शक्य होत नाही हे वास्तव असले, तरी या दिशेने संशोधन व जनजागृती करून अज्ञान दूर करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

-नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १०५२ रेबीजचे प्रकरण

आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१७ ते ऑगस्ट २०२१ या दरम्यान सर्वाधिक रेबीजचे प्रकरण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहे. पाच वर्षांत १०५२ रुग्णांना रेबीज झाला आहे. या शिवाय, भंडारा जिल्ह्यात ३२, चंद्रपूर जिल्ह्यात ९८, गडचिरोली जिल्ह्यात १८७, गोंदिया जिल्ह्यात ५०, तर वर्धा जिल्ह्यात १०४ असे एकूण नागपूर विभागात १५२३ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, रेबीजवर उपचार नसल्याने असे रुग्ण रुग्णालयात आले तरी त्यांना परत पाठविले जाते. यामुळे रेबीज रुग्णांचा मृत्यू घरी झाला असला तरी शासकीय नोंदीत केवळ २ मृत्यू आहे.

-गैरसमजापोटी वाढत आहे रेबीज

‘रेबीज’मुळे मृत्यू अटळ आहे हे माहीत असतानाही अँटिरेबीजची लस गैरसमजापोटी घेतली जात नसल्याचेही समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते, लस दिलेल्या कुत्र्याच्या दंशानंतर रेबीज होत नाही हा गैरसमज आहे. पाळीव कुत्रे असले तरी लस घ्यायलाच हवी. तीन महिन्यांपर्यंतच्या वयाचा कुत्रा चावल्यानंतर अँटिरेबीजची लस घेण्याकडे दुर्लक्ष केले जाते; पण कुत्रा लहान असला तरी रेबीज होणार नाही हा गैरसमज आहे.

- एकदा रेबीज झाल्यास १०० टक्के मृत्यू

रेबीज हा ‘रेबडो व्हायरस’ नावाचा विषाणू रोगट प्राण्यांच्या लाळेतून पसरतो. हा रोग कुत्रा चावल्यामुळे जास्त प्रमाणात होतो. रेबीजचे विषाणू शरीराच्या मज्जातंतूपर्यंत पोहोचतात. यामुळे मेंदूला सूज येते. एकदा रेबीज झाल्यास १०० टक्के मृत्यूचा धोका असतो. यामुळे श्वानदंश होताच डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेणे महत्त्वाचे असते. भारतात रेबीजचे रुग्ण अद्यापही कमी झालेले नाहीत. रेबीज हा सर्वाधिक मोकाट कुत्र्यांमुळे होत असल्याने कुत्र्यांना लस देणे गरजेचे आहे.

-डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मेंदू रोग तज्ज्ञ

टॅग्स :dogकुत्रा