शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक रेबीज दिन; नागपूर विभागात तब्बल १५२३ जणांना रेबीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 07:00 IST

Nagpur News नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मागील पाच वर्षांत तब्बल १५२३ रेबीजची प्रकरणे समोर आली आहेत. या सर्वांचा मृत्यू झाला असला तरी शासनदरबारी केवळ दोन मृत्यूची नोंद आहे.

ठळक मुद्देशासनदरबारी केवळ दोन मृत्यूची नोंद

सुमेध वाघमारे

नागपूर : श्वान, मांजरीने चावा घेतल्याने होणाऱ्या ‘रेबीज’चे दुसरे नाव मृत्यू आहे. जगात दरवर्षी सुमारे ६० हजार लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी जवळपास ३० हजार लोकांचे मृत्यू एकट्या भारतात होतात. असे असताना, रेबीज या भयंकर रोगाबाबत आजमितीला जनतेत फारशी जागरूकता नाही. धक्कादायक म्हणजे, नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मागील पाच वर्षांत तब्बल १५२३ रेबीजची प्रकरणे समोर आली आहेत. या सर्वांचा मृत्यू झाला असला तरी शासनदरबारी केवळ दोन मृत्यूची नोंद आहे. (World Rabies Day)

रेबीज हा प्राण्यांना व मानवाला होणारा जीवघेणा आजार आहे. हा आजार कुत्रे, मांजर, जंगली कोल्ह्यांपासून ते वटवाघुळाने चावा घेतल्याने होतो. श्वानदंशानंतर संपूर्ण प्रतिबंधक लसीकरण व जखमेवर उपाययोजना हाच जीवनाचा आधार आहे. कुत्रा चावल्यानंतर शासकीय रुग्णालयात नि:शुल्क लस उपलब्ध आहे. मात्र, कुठल्याही पशुचिकित्सालयात ही सोय उपलब्ध नाही. हा रोग होऊ नये म्हणून श्वानाकरिता नि:शुल्क नियमित लसीकरण अपेक्षित आहे. परंतु, ही सोय उपलब्ध नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. शहरांतील, गावांतील सर्वच मोकाट कुत्र्यांना लस टोचणे हे प्रशासनाला शक्य होत नाही हे वास्तव असले, तरी या दिशेने संशोधन व जनजागृती करून अज्ञान दूर करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

-नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १०५२ रेबीजचे प्रकरण

आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१७ ते ऑगस्ट २०२१ या दरम्यान सर्वाधिक रेबीजचे प्रकरण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहे. पाच वर्षांत १०५२ रुग्णांना रेबीज झाला आहे. या शिवाय, भंडारा जिल्ह्यात ३२, चंद्रपूर जिल्ह्यात ९८, गडचिरोली जिल्ह्यात १८७, गोंदिया जिल्ह्यात ५०, तर वर्धा जिल्ह्यात १०४ असे एकूण नागपूर विभागात १५२३ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, रेबीजवर उपचार नसल्याने असे रुग्ण रुग्णालयात आले तरी त्यांना परत पाठविले जाते. यामुळे रेबीज रुग्णांचा मृत्यू घरी झाला असला तरी शासकीय नोंदीत केवळ २ मृत्यू आहे.

-गैरसमजापोटी वाढत आहे रेबीज

‘रेबीज’मुळे मृत्यू अटळ आहे हे माहीत असतानाही अँटिरेबीजची लस गैरसमजापोटी घेतली जात नसल्याचेही समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते, लस दिलेल्या कुत्र्याच्या दंशानंतर रेबीज होत नाही हा गैरसमज आहे. पाळीव कुत्रे असले तरी लस घ्यायलाच हवी. तीन महिन्यांपर्यंतच्या वयाचा कुत्रा चावल्यानंतर अँटिरेबीजची लस घेण्याकडे दुर्लक्ष केले जाते; पण कुत्रा लहान असला तरी रेबीज होणार नाही हा गैरसमज आहे.

- एकदा रेबीज झाल्यास १०० टक्के मृत्यू

रेबीज हा ‘रेबडो व्हायरस’ नावाचा विषाणू रोगट प्राण्यांच्या लाळेतून पसरतो. हा रोग कुत्रा चावल्यामुळे जास्त प्रमाणात होतो. रेबीजचे विषाणू शरीराच्या मज्जातंतूपर्यंत पोहोचतात. यामुळे मेंदूला सूज येते. एकदा रेबीज झाल्यास १०० टक्के मृत्यूचा धोका असतो. यामुळे श्वानदंश होताच डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेणे महत्त्वाचे असते. भारतात रेबीजचे रुग्ण अद्यापही कमी झालेले नाहीत. रेबीज हा सर्वाधिक मोकाट कुत्र्यांमुळे होत असल्याने कुत्र्यांना लस देणे गरजेचे आहे.

-डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मेंदू रोग तज्ज्ञ

टॅग्स :dogकुत्रा