शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक लोकसंख्या दिन; या कारणांमुळे वाढते आहे उपराजधानीतील लोकसंख्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 10:16 IST

२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ३६.७३ टक्के नागरिक बाहेरील (स्थलांतरित) आढळून आले आहेत. २०२० पर्यंत यात अंदाजे ५ टक्केपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे.

ठळक मुद्देलोकसंख्येत ३६ टक्के वाटा स्थलांतरितांचा

आनंद डेकाटेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर हे राज्यातील एक मोठे शहर असून, या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून स्थलांतरितांची संख्या वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून ही वाढ अधिक गतीने होत असून बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे उपराजधानी फुगू लागली आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ३६.७३ टक्के नागरिक बाहेरील (स्थलांतरित) आढळून आले आहेत. २०२० पर्यंत यात अंदाजे ५ टक्केपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे. स्थलांतरित नागरिकांत परप्रांतीय किती याबाबत ठोस आकडेवारी नसली तरी नागपूर जिल्ह्यात स्थलांतरणाचे प्रमाण अधिक वाढल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियोजन निश्चितच गडबडले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ४६ लाख ५३ हजार ५७० इतक्या लोकसंख्येची नोंद करण्यात आली होती. यात २३ लाख ८४ हजार ९७५ पुरुष आणि २२ लाख ६८ हजार ५९५ महिलांचा समावेश होता. मात्र जनगणना करीत असताना नागपूर जिल्ह्यात १४ लाख ९३ हजार ९१४ नागरिक बाहेरील (इतर जिल्ह्यातील वा इतर राज्यातील) आढळून आले आहेत.

जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येत हे प्रमाण ३६.७३ टक्के इतके आहे. स्थलांतराची आकडेवारी लक्षात घेता स्थानिक नागपूरकरांना याचा फटका निश्चितच बसणार आहे. तो बसतोही आहे. नागपूर जिल्ह्यात कमी पल्ल्याचे अंतर गाठून स्थलांतरण करणाऱ्यांचे प्रमाण ४ लाख ५० हजार ७६६ इतके आहे. स्थलांतरित लोकसंख्येत झालेल्या नागरिकांत ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. शहरीकरणाची आस आणि पोटाची भूक ही दोन प्रमुख कारणे वाढत्या स्थलांतरणात दडली आहेत.शहराची क्रेझ, गावे ओस२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्यातील लोकसंख्या ४६ लाख ५३ हजार ५७० इतकी आहे. यातील ३१ लाख ७८ हजार ७५९ नागरिक शहरात तर १४ लाख ७४ हजार ८११ नागरिक ग्रामीण भागात राहतात. शहरी नागरीकरणाची २००१ ते २०११ या वर्षातील ही वाढ २१.६२ टक्के इतके आहे. १९९१-२००१ च्या लोकसंख्येच्या तुलनेत शहरीकरणाचे प्रमाण २८.७० इतके आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढीचा विचार करता हे प्रमाण केवळ १.४५ टक्के आहे. त्यामुळे शहराकडे नागरिकांचा जास्त ओढा असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.लॉकडाऊनचाही परिणाम नाहीलॉकडाऊनदरम्यान राज्यातील लाखो स्थलांतरित मजूर आपापल्या राज्यात परत गेले. त्यामुळे स्थानिकांना आता नोकरीची संधी उपलब्ध असल्याने मानले जात आहे. काही प्रमाणात ही संधी असली तरी नागपूरचा विचार केला तर लॉकडाऊनचा कुठलाही परिणाम स्थलांतरितांचे ओझे कमी होण्यास झाल्याचे दिसून येत नाही. कारण नागपूरच्या एकूण लोकसंख्येत तब्बल १४ लाखावर लोक बाहेरून आलेले आहेत. लॉकडाऊनदरम्यान केवळ ५३,४३० स्थलांतरित मजूर आपापल्या राज्यात परत गेले. अनलॉक लागू झाल्यानंतर यापैकी अनेकजण परत येत आहेत. 

 

 

टॅग्स :Socialसामाजिक