शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जागतिक पक्षाघात दिन : दर मिनिटाला सहा लोकांना पक्षाघात : चंद्रशेखर मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 20:20 IST

भारतात दर मिनिटाला सहा लोकांना पक्षाघात होतो. म्हणजे दरवर्षी देशात साधारण २० लाख लोकांना पक्षाघात होतो. यातील सात लाख लोकांचा मृत्यू होतो. पक्षाघात हा कुठल्याही वयात होऊ शकतो. जगाच्या तुलनेत भारतात पक्षाघात होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. आपल्या देशात ज्यांना पक्षाघात होतो, त्यापैकी २० टक्के रुग्ण हे ४० पेक्षा कमी वयोगटातील असतात, अशी माहिती प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.

ठळक मुद्देदरवर्षी सात लाख लोकांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात दर मिनिटाला सहा लोकांना पक्षाघात होतो. म्हणजे दरवर्षी देशात साधारण २० लाख लोकांना पक्षाघात होतो. यातील सात लाख लोकांचा मृत्यू होतो. पक्षाघात हा कुठल्याही वयात होऊ शकतो. जगाच्या तुलनेत भारतात पक्षाघात होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. आपल्या देशात ज्यांना पक्षाघात होतो, त्यापैकी २० टक्के रुग्ण हे ४० पेक्षा कमी वयोगटातील असतात, अशी माहिती प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.जागतिक पक्षाघात दिनाच्यानिमित्ताने डॉ. मेश्राम यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, जागतिक पक्षाघात संघटनेचे अध्यक्ष डॉ. मायकल ब्रेनीन यांच्यानुसार जगात दरवर्षी आठ कोटी लोकांना पक्षाघात होतो. त्यापैकी पाच कोटी लोकांना कायम स्वरूपाचे अपंगत्व येते. यामुळे पक्षाघात झाल्यानंतर आयुष्य किती चांगले करता येईल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मृत्यू व अपंगत्व येण्यामध्ये पक्षाघात हे दुसरे कारण ठरले आहे. जगात दर दोन सेकंदाला एकाला पक्षाघात होतो. जगात दरवर्षी १ कोटी ७० लाख लोकांना पक्षाघात होतो. आणि त्यापैकी सात लाख लोक बळी पडतात. यातील ८० टक्के रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशातील असतात.

तरुणांत पक्षाघाताचे १५ टक्के प्रमाण‘सेरेब्रल विनस थॅम्ब्रोसीस’मुळे पक्षाघाताचे प्रमाण तरुणांमध्ये साधारण १५ टक्के आहे. पक्षाघात झालेले ३० टक्के लोक मृत्युमुखी पडतात, तर ३० टक्के लोकांमध्ये अपंगत्व येते. जंकफूड खाणे, मद्यपान करणे, व्यायाम न करणे, तणावात राहणे, यामुळे भारतात पक्षाघाताचे प्रमाण वाढत असल्याचे डॉ. मेश्राम म्हणाले.

उच्च रक्तदाबामुळे वाढते पक्षाघाताची शक्यता९० टक्के लोकांमध्ये पक्षाघात हा उच्च रक्तदाबामुळे होतो. धूम्रपान, मधुमेह, उच्चरक्तदाब, मद्यपान, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे, हृदयविकार, चुकीचा आहार, जीवनसत्व बी-१२ची कमी, आणि प्रदूषण पक्षाघाताला कारणीभूत ठरते. ज्यांना रक्तदाब जास्त आहे त्यांची चार ते सहा पटीने पक्षाघाताची शक्यता वाढते.

पक्षाघाताच्या ८० टक्के रुग्णांमध्ये रक्तवाहिनी बंद होतेडॉ. मेश्राम म्हणाले, पक्षाघातामध्ये साधारण ८० टक्के रुग्णांमध्ये मेंदूची रक्तवाहिनी बंद होते व मेंदूच्या काही भागात रक्तप्रवाह आणि आॅक्सिजन मिळत नाही. त्यामुळे मेंदूच्या पेशी निष्क्रिय होतात. तर २० टक्के रुग्णांमध्ये मेंदूची रक्तवाहिनी फाटते, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘ब्रेन हॅमरेज’ असे म्हणतात.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर