शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
2
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
3
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
4
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
5
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
6
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
7
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
8
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
9
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
10
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
11
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
12
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
13
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
14
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
15
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
16
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
17
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
18
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
19
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
20
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
Daily Top 2Weekly Top 5

 जागतिक महासागर दिन; काय सांगता, समुद्राच्या पाण्याखाली हाेता विदर्भ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 08:00 IST

Nagpur News पृथ्वीवर असलेले पहिले जीवाष्म आणि अतिप्राचीन खडकांच्या चंद्रपूर, यवतमाळ भागात आढळणाऱ्या पुराव्यातून काही काेटी वर्षापूर्वी विदर्भ समुद्राच्या पाण्याखाली हाेता, हे सिद्ध हाेते.

ठळक मुद्दे२०० ते ६ काेटी वर्षापूर्वी अस्तित्वपहिले जीवाष्म, प्राचीन खडक व काेळसा हे पुरावे

निशांत वानखेडे

नागपूर : आपल्या विदर्भात कधीकाळी समुद्र हाेता, असे आज जर कुणी सांगितले तर मस्करी केल्यासारखे वाटेल, पण ती मस्करी नाही, सत्य आहे. या परिसरात मुबलक प्रमाणात असलेला काेळसा समुद्राचे अस्तित्व दर्शविताेच. मात्र पृथ्वीवर असलेले पहिले जीवाष्म आणि अतिप्राचीन खडकांच्या चंद्रपूर, यवतमाळ भागात आढळणाऱ्या पुराव्यातून काही काेटी वर्षापूर्वी विदर्भ समुद्राच्या पाण्याखाली हाेता, हे सिद्ध हाेते.

आपली पृथ्वी, पर्यावरण आणि अंतराळ असंख्य आश्चर्यांनी भरले आहे आणि विदर्भातील समुद्र हे त्यातीलच आश्चर्य हाेय. हवामान, पर्यावरण व पुरातत्व अभ्यासक प्रा. सुरेश चाेपणे यांनी समुद्राच्या अस्तित्वाचा दावा केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात वणी व बाेर्डा या भागात अनेक वर्षापूर्वी झालेल्या भूकंपाचा अभ्यास करताना प्रा. चाेपणे यांना प्राचीन जीवाष्माचे अवशेष आढळून आले. त्यावर गेल्या अनेक वर्षापासून ते अभ्यास करीत आहेत.

२०० कोटी वर्षादरम्यान ‘निओप्रोटेरोझोईक’ काळात असलेल्या समुद्रात तयार झालेल्या चुनखडकात ‘स्ट्रोमॅटोलाईट’ सूक्ष्म जीवष्मे चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात सापडली. ही पृथ्वीवरील सर्वात पहिली जीवाष्मे मानली जातात व त्यापासून पुढे डायनाेसारसारखे विशालकाय व मानवासारखे बुद्धिमान सजीव तयार झाले. याशिवाय चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात आढळतात ते चुनखडक, शेल खडक आणि क्वार्टझाईट खडक ही समुद्रातच तयार हाेतात. याशिवाय या परिसरात काेळशाचा मुबलक साठा असणे हे समुद्राचे पुरावे आहेत. अनेक नद्या त्यांच्या प्रवाहात झाडे व इतर अवशेष वाहून आणतात व समुद्रात मिळतात. समुद्र नामशेष झाला पण त्या अवशेषातून तयार झालेला काेळसा मुबलक राहिला.

- प्रा. चाेपणे यांच्या मते ५४ ते २५ काेटी वर्षापूर्वी संपूर्ण पृथ्वीवर ‘पॅजिया’ हा एकच भूखंड हाेता व सभाेवताल समुद्र हाेता.

- साधारणत: ४०० ते २०० काेटी वर्षापासून हिमालयापासून विदर्भात व दक्षिणेकडेही समुद्राचे अस्तित्व हाेते. याला ‘टेथिस’ समुद्र असेही म्हटले जाते.

- पुढे भूगर्भीय हालचालींमुळे समुद्र तुटायला लागले व भूखंड वर येत गेला. ऑस्ट्रेलियाजवळ असलेला आपला भारत उत्तरेकडे सरकत आज आहे तेथे पाेहचला.

- या परिसरात डायनाेसारसारखे अस्तित्वही हाेते. त्याचेही अनेक पुरावे आपल्याकडे सापडतात.

- साधारणत: ६ काेटी वर्षापूर्वी ‘क्रीटाशिअस’ काळात माेठ्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीचा लाव्हा काही लाख वर्षे थांबून थांबून वाहत राहिला. यामध्ये डायनाेसारसह असंख्य जीव मृतप्राय झाले.

 त्यामुळे विदर्भाचा भूभाग वर आला व समुद्र दक्षिणेकडे सरकत गेला.

प्राचीन ग्रॅनाईट, क्वार्टझाईट खडक व शेल खडकांचे असंख्य पुरावे आपल्या विदर्भात सापडतात. क्रिटॅशियस काळात भूगर्भाच्या घडामाेडीमुळे समुद्र दूर गेला व चिखलाचे चुनखडकात रुपांतर झाले. काेट्यवधी वर्षापूर्वीच्या समुद्री जीवांचे जीवाष्म आजही सापडतात. विदर्भात समुद्र हाेता हे सांगण्यासाठी पुरेसे आहेत. यावर आणखी संशाेधन हाेणे गरजेचे आहे.

- प्रा. सुरेश चाेपणे, पुरातत्व अभ्यासक.

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्ग