शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

 जागतिक महासागर दिन; काय सांगता, समुद्राच्या पाण्याखाली हाेता विदर्भ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 08:00 IST

Nagpur News पृथ्वीवर असलेले पहिले जीवाष्म आणि अतिप्राचीन खडकांच्या चंद्रपूर, यवतमाळ भागात आढळणाऱ्या पुराव्यातून काही काेटी वर्षापूर्वी विदर्भ समुद्राच्या पाण्याखाली हाेता, हे सिद्ध हाेते.

ठळक मुद्दे२०० ते ६ काेटी वर्षापूर्वी अस्तित्वपहिले जीवाष्म, प्राचीन खडक व काेळसा हे पुरावे

निशांत वानखेडे

नागपूर : आपल्या विदर्भात कधीकाळी समुद्र हाेता, असे आज जर कुणी सांगितले तर मस्करी केल्यासारखे वाटेल, पण ती मस्करी नाही, सत्य आहे. या परिसरात मुबलक प्रमाणात असलेला काेळसा समुद्राचे अस्तित्व दर्शविताेच. मात्र पृथ्वीवर असलेले पहिले जीवाष्म आणि अतिप्राचीन खडकांच्या चंद्रपूर, यवतमाळ भागात आढळणाऱ्या पुराव्यातून काही काेटी वर्षापूर्वी विदर्भ समुद्राच्या पाण्याखाली हाेता, हे सिद्ध हाेते.

आपली पृथ्वी, पर्यावरण आणि अंतराळ असंख्य आश्चर्यांनी भरले आहे आणि विदर्भातील समुद्र हे त्यातीलच आश्चर्य हाेय. हवामान, पर्यावरण व पुरातत्व अभ्यासक प्रा. सुरेश चाेपणे यांनी समुद्राच्या अस्तित्वाचा दावा केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात वणी व बाेर्डा या भागात अनेक वर्षापूर्वी झालेल्या भूकंपाचा अभ्यास करताना प्रा. चाेपणे यांना प्राचीन जीवाष्माचे अवशेष आढळून आले. त्यावर गेल्या अनेक वर्षापासून ते अभ्यास करीत आहेत.

२०० कोटी वर्षादरम्यान ‘निओप्रोटेरोझोईक’ काळात असलेल्या समुद्रात तयार झालेल्या चुनखडकात ‘स्ट्रोमॅटोलाईट’ सूक्ष्म जीवष्मे चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात सापडली. ही पृथ्वीवरील सर्वात पहिली जीवाष्मे मानली जातात व त्यापासून पुढे डायनाेसारसारखे विशालकाय व मानवासारखे बुद्धिमान सजीव तयार झाले. याशिवाय चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात आढळतात ते चुनखडक, शेल खडक आणि क्वार्टझाईट खडक ही समुद्रातच तयार हाेतात. याशिवाय या परिसरात काेळशाचा मुबलक साठा असणे हे समुद्राचे पुरावे आहेत. अनेक नद्या त्यांच्या प्रवाहात झाडे व इतर अवशेष वाहून आणतात व समुद्रात मिळतात. समुद्र नामशेष झाला पण त्या अवशेषातून तयार झालेला काेळसा मुबलक राहिला.

- प्रा. चाेपणे यांच्या मते ५४ ते २५ काेटी वर्षापूर्वी संपूर्ण पृथ्वीवर ‘पॅजिया’ हा एकच भूखंड हाेता व सभाेवताल समुद्र हाेता.

- साधारणत: ४०० ते २०० काेटी वर्षापासून हिमालयापासून विदर्भात व दक्षिणेकडेही समुद्राचे अस्तित्व हाेते. याला ‘टेथिस’ समुद्र असेही म्हटले जाते.

- पुढे भूगर्भीय हालचालींमुळे समुद्र तुटायला लागले व भूखंड वर येत गेला. ऑस्ट्रेलियाजवळ असलेला आपला भारत उत्तरेकडे सरकत आज आहे तेथे पाेहचला.

- या परिसरात डायनाेसारसारखे अस्तित्वही हाेते. त्याचेही अनेक पुरावे आपल्याकडे सापडतात.

- साधारणत: ६ काेटी वर्षापूर्वी ‘क्रीटाशिअस’ काळात माेठ्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीचा लाव्हा काही लाख वर्षे थांबून थांबून वाहत राहिला. यामध्ये डायनाेसारसह असंख्य जीव मृतप्राय झाले.

 त्यामुळे विदर्भाचा भूभाग वर आला व समुद्र दक्षिणेकडे सरकत गेला.

प्राचीन ग्रॅनाईट, क्वार्टझाईट खडक व शेल खडकांचे असंख्य पुरावे आपल्या विदर्भात सापडतात. क्रिटॅशियस काळात भूगर्भाच्या घडामाेडीमुळे समुद्र दूर गेला व चिखलाचे चुनखडकात रुपांतर झाले. काेट्यवधी वर्षापूर्वीच्या समुद्री जीवांचे जीवाष्म आजही सापडतात. विदर्भात समुद्र हाेता हे सांगण्यासाठी पुरेसे आहेत. यावर आणखी संशाेधन हाेणे गरजेचे आहे.

- प्रा. सुरेश चाेपणे, पुरातत्व अभ्यासक.

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्ग