शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जागतिक बौद्धिक संपदा दिन; स्वत:च्या बौद्धिक संपदेचे करा पेटंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:03 AM

आपल्या बौद्धिक संपदेला सुरक्षित करणे ही काळाची गरज झाली आहे. तसे केले नाही तर भारतीयांचे ज्ञान चोरून जग पुढे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देभारतीय संशोधनात पुढे पण पेटंट करण्यात मागे पेपर प्रसिद्ध करून नुकसान करू नका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय विद्यार्थी, संशोधक हे संशोधनात पुढे आहेत. त्यांचे संशोधन जगाच्या संशोधनापेक्षा वेगळे व बहुउपयोगी आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत ते आपल्या संशोधनाचे पेटेंट मिळवित नाही. गेल्यावेळी चीनसारख्या देशाने त्यांच्या संशोधनांचे पेटेंट घेण्यासाठी तब्बल ११ लाख फाईलिंग केले. तर भारतातून येणाऱ्या अर्जांची संख्या फक्त ४७ हजार होती. विशेष म्हणजे या ४७ हजारांमध्येही विदेशातील अर्ज करणाऱ्यांची संख्या ७० टक्क्यांवर होती.आपल्या बौद्धिक संपदेला सुरक्षित करणे ही काळाची गरज झाली आहे. तसे केले नाही तर भारतीयांचे ज्ञान चोरून जग पुढे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.राजीव गांधी इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स (आरजीआयजीआर) ही केंद्र सरकारची संस्था बौद्धिक संपदेचे पेटेंट करण्यासाठी जगजागृतीचे काम करीत आहे. भारतात अनेक लोक संशोधन करतात. संशोधन झाले की एखाद्या राष्ट्रीय परिषदेत त्याचा पेपर प्रसिद्ध करून मोकळे होतात. असे केल्याने त्यांनी केलेल्या संशोधनावर त्यांचा कुठलाही हक्क शिल्लक राहत नाही. ती माहिती जगासाठी मोकळी झालेली असते. एकदा माहिती प्रसिद्ध झाली की नंतर तिचे पेटेंट मिळविता येत नाही. त्यामुळे संशोधकांनी आपल्या संशोधनाचे आधी पेटेंट मिळवून आपली बौद्धिक संपदा कशी सुरक्षित करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.१९८० मध्ये नागपुरात फक्त पेटेंट इन्फरमेशन सेंटर होते. मात्र, आता या केंद्रातर्फे प्रशिक्षण कार्यक्रमही राबविले जात आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने, संशोधकाने एखादे संशोधन केले तर त्या संशोधनाचे पेटेंट त्याने कसे मिळवावे, याची माहिती देण्यासाठी संस्थोतर्फे शिबिर आयोजित केले जातात. प्रशिक्षण घेतले जाते.गेल्या वर्षभरात संस्थेने अशा ९४ कार्यशाळा घेतल्या आहेत असून चार हजारावर लोकांना प्रशिक्षणही दिले आहे. यातून जागृती निर्माण होऊन आता पेटेंटसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या वाढली आहे. देशात आजवर दोन लाखावर लोकांनी पेटेंट घेतले आहे. येत्या काळात या संख्येत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

असे मिळवा पेटंटआपण एखादे संशोधन केले की त्याची नोंदणी ipindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन करता येते. वेबसाईटवर फॉर्म नंबर १,२ व ३ मध्ये आपल्या संशोधनाची संपूर्ण माहिती भरावी लागते. त्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळतो. त्यानंतर तुम्ही सादर केलेल्या माहितीचे परीक्षण करण्याची प्रकिया सुरू होते. संस्थेचे परीक्षक त्याचे आॅनलाईन परीक्षण करतात. त्यात काही त्रुटी असतील, अडचणी असतील तर आपल्याला आॅनलाईन कळविले जाते. त्रुटी पूर्ण करण्याची संधी दिली जाते. ही सर्व प्रक्रिया तीन ते चार वर्षे चालते. यासाठी फक्त ५,६०० रुपये शुल्क आकारले जाते. एखाद्याला ही प्रकिया कमी वेळात करायची असेल तर त्यासाठी मात्र विशेष शुल्क भरावे लागते.

विदर्भाने घ्यावा पुढाकारराजीव गांधी इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स या संस्थेद्वारे इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सबाबत विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. देशभरातील अनेक तरुण येथे येऊन प्रशिक्षण घेऊन जातात. परंतु, संस्थेकडे विदर्भ व नागपुरातून येणारा तरुण वर्ग तुलनेने फारच कमी आहे. विदभार्तून दरवर्षी पेटंट नोंदणीसाठी फक्त एक हजार अर्ज प्राप्त होतात. ही संख्या वाढण्याची गरज आहे. 

टॅग्स :cultureसांस्कृतिक