शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

जागतिक पर्यावरण दिन विशेष : उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात ऊन, निसर्गाचे हे बदल समजेल काेण?

By निशांत वानखेडे | Updated: June 5, 2023 11:01 IST

हवामान बिघडले की आपण बिघडविले? : उन्हाळ्याच्या ९० पैकी ६० दिवस पाऊस

निशांत वानखेडे

नागपूर : गेल्या काही वर्षांत विदर्भच नाही तर महाराष्ट्र आणि देशवासीयांनीही अनुभवलेले हवामानाचे बदल विचार करायला लावणारे आहेत. गेल्या वर्षी पावसाळ्याचा अतितीव्रपणा लाेकांनी पाहिला आहे. मात्र पावसाचा धुमाकूळ आताही सुरूच आहे. अर्धा अधिक उन्हाळा पावसातच गेला. हिवाळ्यातही हीच स्थिती हाेती. निसर्गाच्या लहरीपणाची लाेकांना कल्पना आहे पण हा बदल जरा वेगळा आहे आणि हेच चिंतेचे कारण आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात मार्च ते मे हा तीन महिन्याचा काळ पाहिला तर ९० दिवसात कमीतकमी ६० दिवस एकतर ढगाळ वातावरण किंवा पावसाने हजेरी लावली आहे. ही स्थिती उन्हापासून दिलासा देणारी आहे पण भविष्यात कदाचित विपरीत परिस्थिती असू शकते, कारण गेल्या वर्षीचा उन्हाळा अत्याधिक तापदायक ठरला हाेता. चार ते पाच वेळा उष्ण लाटांनी हाेरपळले आणि विदर्भाची ५ शहरे अनेक दिवस तापमानाच्या जागतिक यादीत चढले हाेती. त्यानंतरचा पावसाळाही प्रचंड त्रासदायक ठरला. अनेक शहरे पुराने वेढली हाेती. विदर्भातच अनेक दिवस पावसाने कहर केला हाेता. हवामान शास्त्रज्ञांच्या मते भविष्यात असे प्रकार आणखी वाढणार आहेत. ‘आयपीसीसी’ने तर हवामान बदलामुळे भारतावरच अधिक संकटाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आताच सतर्क हाेण्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

बदल दर्शविणाऱ्या काही घटना

- यंदा मे महिन्यात अमरावती जिल्ह्यात वरुड नदी आणि भंडारा जिल्ह्यात बावनथडी नदीला आलेला पूर.

- गेल्या वर्षी जागतिक क्रमवारीत गेलेले विदर्भातील शहरांचे तापमान यंदा काही माेजके दिवस ४४ अंशावर गेले.

- मे महिन्यात नागपूरसह इतर काही शहरांचे कमाल तापमान २५ अंशापर्यंत खाली आले हाेते.

- गेल्यावर्षी पावसाळ्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, काेकणमध्ये पुराने थैमान घातले हाेते.

- यंदा मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक या भागात उन्हाची तीव्रता अधिक जाणवली हाेती.

ऋतूंचा तीव्रपणा वाढला का?

तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, गेल्या काही वर्षात बंगालच्या खाडीत वादळांचे प्रमाण वाढले आहे. या बदलामुळे हिमालयाचे क्षेत्र, उत्तराखंड, लडाख, केदारनाथ, बद्रीनाथ या भागात ढगफुटीचे प्रमाणही वाढले आहे. दक्षिण भारतात तर पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. आता तर हवामानाचा अंदाजही बांधणे कठीण झाले आहे. कुठेही कमी दाबाचा पट्टा तयार हाेताे आणि पाऊस पडतो, तर कधी उष्ण लाटा झाेंबतात. तज्ज्ञांच्या मते, विदर्भात ‘हीट आयलँड इफेक्ट’मुळे तीव्र ऊन किंवा तीव्र पाऊस हा ऋतूंचा तीव्रपणा वाढला आहे.

तरी काेळशावरील वीज प्रकल्पांना प्राेत्साहन

जागतिक तापमानवाढ राेखण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. प्रदूषणाचे स्राेत हळूहळू बंद करण्याचे लक्ष्य ठरले असून भारताचाही या करारात सहभाग आहे. आहे. मात्र असे हाेताना दिसत नाही. वाहनांचे प्रदूषण कायम आहे. काेळसा आधारित वीज प्रकल्पावरची निर्भरता कमी करून हळूहळू बंद करणे निर्धारित आहे पण आपल्या देशात ते बंद करण्याऐवजी त्यांना प्राेत्साहन दिले जात आहे. काेराडी वीज प्रकल्पाला विस्तारित करून १३२० मेगावॅटची वीज निर्मिती याचेच उदाहरण आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणWorld Environment DayWorld Environment DayRainपाऊसpollutionप्रदूषण