शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

जागतिक चिमणी दिवस; माेबाईल टाॅवर रेडिएशनमुळे चिऊताई संकटात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 10:15 IST

Nagpur News मनुष्यासाठी सर्वात लाडकी असलेली चिऊताईसुद्धा माेबाईल टाॅवरच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीची बळी ठरत आहे. जगातील विविध देशांत झालेल्या अभ्यासानुसार २००० ते २०२० पर्यंत २० वर्षांत चिमणीच्या संख्येत ३० ते ५० टक्के घट झाली आहे

ठळक मुद्देजगभरात २० वर्षांत ३० ते ५० टक्के घटनागपुरातील प्राध्यापकांचा कळमेश्वर परिसरात अभ्यास

निशांत वानखेडे

नागपूर : माेबाईल टाॅवरमधून निघणारे इलेक्ट्राेमॅग्नेटिक तरंग (वेव्हज) हे मानवी आराेग्यासह प्राणी व पक्ष्यांच्याही आराेग्यास हानिकारक आहेत, हे आता प्रयाेगानिशी सिद्ध झाले आहे. मनुष्यासाठी सर्वात लाडकी असलेली चिऊताईसुद्धा माेबाईल टाॅवरच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीची बळी ठरत आहे. जगातील विविध देशांत झालेल्या अभ्यासानुसार २००० ते २०२० पर्यंत २० वर्षांत चिमणीच्या संख्येत ३० ते ५० टक्के घट झाली आहे व यासाठी रेडिएशन हेही एक माेठे कारण आहे. उल्लेखनीय म्हणजे नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर परिसरात दहा वर्षांपूर्वी झालेल्या अभ्यासात ही गाेष्ट स्पष्टपणे जाणवली हाेती.

सध्या अमरावती विद्यापीठात प्राणिशास्त्र विभागाचे प्राध्यापक डाॅ. के. जी. पाटील आणि इन्स्टिट्यूट ऑफ फाॅरेन्सिक सायन्स, नागपूरचे प्राध्यापक डाॅ. वीरेंद्र शेंडे यांनी जुलै २०११ ते जून २०१२ या वर्षभराच्या काळात कळमेश्वर परिसरात काही गावात हा अभ्यास केला आहे. त्या काळात कळमेश्वरमध्ये ६ टाॅवर तर सावंगी, सेलू, उबली येथे दाेन आणि इतर गावात एक-एक टाॅवर हाेते. डाॅ. पाटील व डाॅ. शेंडे यांच्या टीमने प्रत्येक टाॅवरपासून ३०० मीटरच्या अंतरावरून चिमण्या तसेच इतर पक्ष्यांचे सर्वेक्षण केले. महिन्यातून शनिवार व रविवार दाेनदा वर्दळ कमी असताना पहाटे ५.१५ ते ११.१५ व दुपारी ३.१५ ते सायंकाळी ७.१५ या काळात टाॅवरजवळील रस्ते, पांदण, शेत, पाणवठे, चाैक, पार्क, झाडे आदी ठिकाणी लाईन ट्रान्झिट पद्धतीने हे सर्वेक्षण झाले. त्यांच्या अभ्यासातील महत्त्वाच्या बाबी डाॅ. शेंडे यांनी लाेकमतशी बाेलताना स्पष्ट केल्या.

अभ्यासातील महत्त्वाचे बिंदू

- सर्वाधिक टाॅवर असलेल्या कळमेश्वर शहराजवळ चिमण्यांच्या संख्येत सातत्याने घट झाली.

- एक टाॅवर असलेल्या दहेगाव, डाेर्ली, परसाेडी, ब्राह्मणी, वडाेदा, उबली आदी गावांमध्ये चिमण्यांची संख्या वाढली.

- दाेन टाॅवर असलेल्या सावंगी, सेलू भागात चिमण्यांमध्ये घट. जवळ एमआयडीसी असल्याने घट झाल्याचे कारण.

- जुलै ते फेब्रुवारी दरम्यान वाढ. जानेवारी व फेब्रुवारीमध्ये प्रजननाचा काळ असल्याने वाढ असल्याचे दिसते.

- मात्र मार्चनंतर रेडिएशनमुळे नवजातांचा मृत्यू अधिक असल्याने घटली संख्या.

रेडिएशनचे परिणाम

- टाॅवरच्या १ मीटरवर ७९,६००,००० मेगाहर्टझ फ्रिक्वेन्सी. १०० मीटरवर ७९६० तर ५०० मीटरवर ३१८ मे.ह.

- १ ते १० मीटरवर चिमण्यांचे प्रमाण केवळ १ टक्के. ११ ते १०० मीटरवर २० टक्के, १०१ ते २०० मीटरवर ३५ टक्के आणि २०१ ते ३०० मीटरवर ४४ टक्के संख्या दिसून आले.

- रेडिएशनमुळे चिमण्यांच्या घरटे बनविणे, प्रजनन आणि अंडी उबविण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसून आले.

जगभरातील अभ्यासाचे सत्य

- नेदरलॅंडमध्ये २५ वर्षात ५० टक्के हाऊस स्पॅराे घटल्या. त्यामुळे रेड लिस्टमध्ये टाकले.

- यूकेच्या लंडनमध्ये ७१ टक्के घट. ग्लासगाे, हंबर्ग, एडिनबर्ग आदी शहरातही धाेकादायक स्थिती.

- बर्लिन, ब्रुसेल्स, डबलिन, स्पेन, डच अर्बन तसेच पश्चिम युराेपमध्ये चिमण्यांच्या संख्येत झपाट्याने घट.

दहा वर्षापूर्वी केलेला हा अभ्यास बँकाॅकमधील परिषदेत सादर केला हाेता. त्यावेळी टाॅवरची संख्या अतिशय कमी हाेती. आज ती कितीतरी पटींनी वाढली आहे. त्यामुळे शहरी भागातून चिमण्या जवळजवळ दिसेनाशा झाल्या आहेत. संख्या कमी हाेण्यासाठी मानवनिर्मित इतरही कारणे आहेत पण रेडिएशन हे न समजणारे सर्वात माेठे कारण आहे आणि भविष्यात त्याचे भीषण परिणाम दिसतील.

- डाॅ. वीरेंद्र शेंडे, इन्स्टिट्यूट ऑफ फाॅरेन्सिक सायन्स.

टॅग्स :wildlifeवन्यजीव