शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

विश्वाने स्वीकारली बाबासाहेबांची विद्वत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:14 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी म्हणूनच जगले. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या बाबासाहेबांनी ज्ञानाची भूक भागविण्यासाठी प्रसंगी मिळेल ते कष्ट उपसले. विविध विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन करणाºया या महामानवाने त्या ज्ञानाचा उपयोग अस्पृश्यता निवारणासह देशाच्या विकासासाठी केला. विश्वानेही त्यांची विद्वत्ता स्वीकारली. म्हणूनच हा ज्ञानाचा महासागर विद्यार्थी व तरुणांसाठी कायम प्रेरणादायी राहील, अशी भावना तरुण अभ्यासकांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देतरुण अभ्यासकांनी मांडल्या भावना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी म्हणूनच जगले. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या बाबासाहेबांनी ज्ञानाची भूक भागविण्यासाठी प्रसंगी मिळेल ते कष्ट उपसले. विविध विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन करणाऱ्या या महामानवाने त्या ज्ञानाचा उपयोग अस्पृश्यता निवारणासह देशाच्या विकासासाठी केला. विश्वानेही त्यांची विद्वत्ता स्वीकारली. म्हणूनच हा ज्ञानाचा महासागर विद्यार्थी व तरुणांसाठी कायम प्रेरणादायी राहील, अशी भावना तरुण अभ्यासकांनी व्यक्त केली.विद्यार्थ्यांसाठी कायम प्रेरणादायीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाप्रतिचे प्रेम आणि सतत काहीतरी शिकण्याचा स्वभाव यामुळे ते कायम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी राहतील. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रमुख साधन होय, असे ते मानायचे. तुम्ही उच्च शिक्षित झाले तर प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख निर्माण होईल, मात्र शिक्षणासोबतच त्यांनी शील या गुणास महत्त्व दिले होते. अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था सुरू केल्या, अनेक मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठविले. त्यांच्या अनेक कार्यांपैकी शिक्षणासाठी केलेले त्यांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहिल.अम्रपाली हाडके, अभियांत्रिकी विद्यार्थीतेव्हाच होईल सर्वसमावेशक विकासबाबासाहेबांनी दिलेले संविधान आणि अनेक विषयावर केलेले लेखन हे त्यांच्या सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे. संविधानाच्या मूलतत्त्वाकडे सरकारांनी दुर्लक्ष केल्यास ही लोकशाही खोटी ठरेल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांनी तरुण, ज्येष्ठ नागरिक, कामगारांसह सामाजिक, आर्थिक आणि कृषिविषयक धोरण अमलात आणले तर भारत एक विकसित  राष्ट्र म्हणून उदयास येऊ शकतो. बौद्ध धम्माचा स्वीकार केल्याने वंचित घटकांचा विकास होत असून यामुळे देशाच्याही विकासात भरच पडली आहे.डॉ. सिद्धांत भरणे, वैद्यकीय पदवीधरआम्ही घडलो, पुढच्या पिढ्या घडतीलबाबासाहेब आणि त्यांच्या धम्मक्रांतीमुळे हजारो वर्ष गुलामीत राहिलेल्या समाजाचा विकास झपाट्याने होत आहे. देशातील सर्वच घटकांसाठी आणि भारतीय महिलांच्या प्रगतीमध्ये त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. बाबासाहेब म्हणायचे, इतिहास माझ्या कार्याची निश्चितच दखल घेईल. त्यामुळे भविष्यात त्यांच्या कार्याची दखल घ्यावीच लागेल. अनेक धर्म, भाषेचे लोक असलेल्या देशाची लोकशाही मजबूत ठेवण्यात आणि त्यातून प्रगती साधण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे मान्य करावेच लागेल. त्यांच्यामुळेच आमची पिढी घडली आणि भविष्यातही अनेक पिढ्या घडत राहतील.विश्वास रंगारी, खासगी नोकरी.

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीStudentविद्यार्थी