शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

विश्वाने स्वीकारली बाबासाहेबांची विद्वत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:14 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी म्हणूनच जगले. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या बाबासाहेबांनी ज्ञानाची भूक भागविण्यासाठी प्रसंगी मिळेल ते कष्ट उपसले. विविध विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन करणाºया या महामानवाने त्या ज्ञानाचा उपयोग अस्पृश्यता निवारणासह देशाच्या विकासासाठी केला. विश्वानेही त्यांची विद्वत्ता स्वीकारली. म्हणूनच हा ज्ञानाचा महासागर विद्यार्थी व तरुणांसाठी कायम प्रेरणादायी राहील, अशी भावना तरुण अभ्यासकांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देतरुण अभ्यासकांनी मांडल्या भावना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी म्हणूनच जगले. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या बाबासाहेबांनी ज्ञानाची भूक भागविण्यासाठी प्रसंगी मिळेल ते कष्ट उपसले. विविध विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन करणाऱ्या या महामानवाने त्या ज्ञानाचा उपयोग अस्पृश्यता निवारणासह देशाच्या विकासासाठी केला. विश्वानेही त्यांची विद्वत्ता स्वीकारली. म्हणूनच हा ज्ञानाचा महासागर विद्यार्थी व तरुणांसाठी कायम प्रेरणादायी राहील, अशी भावना तरुण अभ्यासकांनी व्यक्त केली.विद्यार्थ्यांसाठी कायम प्रेरणादायीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाप्रतिचे प्रेम आणि सतत काहीतरी शिकण्याचा स्वभाव यामुळे ते कायम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी राहतील. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रमुख साधन होय, असे ते मानायचे. तुम्ही उच्च शिक्षित झाले तर प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख निर्माण होईल, मात्र शिक्षणासोबतच त्यांनी शील या गुणास महत्त्व दिले होते. अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था सुरू केल्या, अनेक मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठविले. त्यांच्या अनेक कार्यांपैकी शिक्षणासाठी केलेले त्यांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहिल.अम्रपाली हाडके, अभियांत्रिकी विद्यार्थीतेव्हाच होईल सर्वसमावेशक विकासबाबासाहेबांनी दिलेले संविधान आणि अनेक विषयावर केलेले लेखन हे त्यांच्या सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे. संविधानाच्या मूलतत्त्वाकडे सरकारांनी दुर्लक्ष केल्यास ही लोकशाही खोटी ठरेल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांनी तरुण, ज्येष्ठ नागरिक, कामगारांसह सामाजिक, आर्थिक आणि कृषिविषयक धोरण अमलात आणले तर भारत एक विकसित  राष्ट्र म्हणून उदयास येऊ शकतो. बौद्ध धम्माचा स्वीकार केल्याने वंचित घटकांचा विकास होत असून यामुळे देशाच्याही विकासात भरच पडली आहे.डॉ. सिद्धांत भरणे, वैद्यकीय पदवीधरआम्ही घडलो, पुढच्या पिढ्या घडतीलबाबासाहेब आणि त्यांच्या धम्मक्रांतीमुळे हजारो वर्ष गुलामीत राहिलेल्या समाजाचा विकास झपाट्याने होत आहे. देशातील सर्वच घटकांसाठी आणि भारतीय महिलांच्या प्रगतीमध्ये त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. बाबासाहेब म्हणायचे, इतिहास माझ्या कार्याची निश्चितच दखल घेईल. त्यामुळे भविष्यात त्यांच्या कार्याची दखल घ्यावीच लागेल. अनेक धर्म, भाषेचे लोक असलेल्या देशाची लोकशाही मजबूत ठेवण्यात आणि त्यातून प्रगती साधण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे मान्य करावेच लागेल. त्यांच्यामुळेच आमची पिढी घडली आणि भविष्यातही अनेक पिढ्या घडत राहतील.विश्वास रंगारी, खासगी नोकरी.

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीStudentविद्यार्थी