शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

विश्वाने स्वीकारली बाबासाहेबांची विद्वत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:14 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी म्हणूनच जगले. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या बाबासाहेबांनी ज्ञानाची भूक भागविण्यासाठी प्रसंगी मिळेल ते कष्ट उपसले. विविध विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन करणाºया या महामानवाने त्या ज्ञानाचा उपयोग अस्पृश्यता निवारणासह देशाच्या विकासासाठी केला. विश्वानेही त्यांची विद्वत्ता स्वीकारली. म्हणूनच हा ज्ञानाचा महासागर विद्यार्थी व तरुणांसाठी कायम प्रेरणादायी राहील, अशी भावना तरुण अभ्यासकांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देतरुण अभ्यासकांनी मांडल्या भावना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी म्हणूनच जगले. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या बाबासाहेबांनी ज्ञानाची भूक भागविण्यासाठी प्रसंगी मिळेल ते कष्ट उपसले. विविध विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन करणाऱ्या या महामानवाने त्या ज्ञानाचा उपयोग अस्पृश्यता निवारणासह देशाच्या विकासासाठी केला. विश्वानेही त्यांची विद्वत्ता स्वीकारली. म्हणूनच हा ज्ञानाचा महासागर विद्यार्थी व तरुणांसाठी कायम प्रेरणादायी राहील, अशी भावना तरुण अभ्यासकांनी व्यक्त केली.विद्यार्थ्यांसाठी कायम प्रेरणादायीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाप्रतिचे प्रेम आणि सतत काहीतरी शिकण्याचा स्वभाव यामुळे ते कायम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी राहतील. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रमुख साधन होय, असे ते मानायचे. तुम्ही उच्च शिक्षित झाले तर प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख निर्माण होईल, मात्र शिक्षणासोबतच त्यांनी शील या गुणास महत्त्व दिले होते. अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था सुरू केल्या, अनेक मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठविले. त्यांच्या अनेक कार्यांपैकी शिक्षणासाठी केलेले त्यांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहिल.अम्रपाली हाडके, अभियांत्रिकी विद्यार्थीतेव्हाच होईल सर्वसमावेशक विकासबाबासाहेबांनी दिलेले संविधान आणि अनेक विषयावर केलेले लेखन हे त्यांच्या सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे. संविधानाच्या मूलतत्त्वाकडे सरकारांनी दुर्लक्ष केल्यास ही लोकशाही खोटी ठरेल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांनी तरुण, ज्येष्ठ नागरिक, कामगारांसह सामाजिक, आर्थिक आणि कृषिविषयक धोरण अमलात आणले तर भारत एक विकसित  राष्ट्र म्हणून उदयास येऊ शकतो. बौद्ध धम्माचा स्वीकार केल्याने वंचित घटकांचा विकास होत असून यामुळे देशाच्याही विकासात भरच पडली आहे.डॉ. सिद्धांत भरणे, वैद्यकीय पदवीधरआम्ही घडलो, पुढच्या पिढ्या घडतीलबाबासाहेब आणि त्यांच्या धम्मक्रांतीमुळे हजारो वर्ष गुलामीत राहिलेल्या समाजाचा विकास झपाट्याने होत आहे. देशातील सर्वच घटकांसाठी आणि भारतीय महिलांच्या प्रगतीमध्ये त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. बाबासाहेब म्हणायचे, इतिहास माझ्या कार्याची निश्चितच दखल घेईल. त्यामुळे भविष्यात त्यांच्या कार्याची दखल घ्यावीच लागेल. अनेक धर्म, भाषेचे लोक असलेल्या देशाची लोकशाही मजबूत ठेवण्यात आणि त्यातून प्रगती साधण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे मान्य करावेच लागेल. त्यांच्यामुळेच आमची पिढी घडली आणि भविष्यातही अनेक पिढ्या घडत राहतील.विश्वास रंगारी, खासगी नोकरी.

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीStudentविद्यार्थी