शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

अन् ‘ती’ कामगार महिला सुखरूप पोहचली बिलासपूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 8:25 PM

झाशी येथून नागपूरला आलेली एक कामगार महिला आपल्या तीन मुलांना घेऊन बिलासपूरला जाण्यासाठी धडपडत होती. प्रवासासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी कशी घ्यावी या विवंचनेत तीन दिवस तिने रेल्वेस्थानकावरच घालवले. रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींना ही बाब समजताच ते या महिलेच्या मदतीसाठी धावले. तिच्या भोजनाची, मुलांच्या खाऊची अन् तिकिटाची व्यवस्था रेल्वे चाईल्ड लाईनने केली अन् ही कामगार महिला सुखरूप आपल्या गावी पोहोचली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झाशी येथून नागपूरला आलेली एक कामगार महिला आपल्या तीन मुलांना घेऊन बिलासपूरला जाण्यासाठी धडपडत होती. प्रवासासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी कशी घ्यावी या विवंचनेत तीन दिवस तिने रेल्वेस्थानकावरच घालवले. रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींना ही बाब समजताच ते या महिलेच्या मदतीसाठी धावले. तिच्या भोजनाची, मुलांच्या खाऊची अन् तिकिटाची व्यवस्था रेल्वे चाईल्ड लाईनने केली अन् ही कामगार महिला सुखरूप आपल्या गावी पोहोचली.नागपुरात चार दिवसांपासून अडकलेली महिला, तिचा पती आणि तीन मुले दिल्ली येथे कामानिमित्त गेले होते. ते मूळचे बिलासपूरचे रहिवासी आहेत. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी या महिलेचा पती कामानिमित्त बिलासपूरला आला होता. लॉकडाऊन झाल्यामुळे तो गावाकडे अडकला. तिकडे दिल्लीत या महिलेने तीन मुलांना घेऊन काही दिवस काढले. परंतु कामच नसल्यामुळे तिने धावपळ करून श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीने कसेबसे नागपूर गाठले. शनिवारी ही महिला नागपूर रेल्वेस्थानकावर चिंतातुर चेहऱ्याने प्रवाशांना विचारणा करीत होती. तिने रेल्वेस्थानकावरील प्रवाशांना आपबीती सांगितली. बिलासपूरला जाण्यासाठी तिच्याकडे मोजकेच पैसे होते. तिकीट काढण्यासाठी आरक्षण कार्यालयात ही महिला गेली असता बुकिंग क्लर्कने तिला प्रवासासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आणण्याची सूचना केली. सोबत तीन मुले होती. याबाबत रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींना कळताच ते या महिलेच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी स्टेशन संचालक कार्यालयात या महिलेस पुढील प्रवास करण्यासाठी काही करता येईल काय, याबाबत विचारणा केली. स्टेशन संचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आरपीएफच्या मदतीने पुढील प्रवास करता येणार असल्याचे सांगितले. त्यावर आरपीएफचे अधिकारी, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सकाळी बिलासपूरला जाणाऱ्या गाडीत बसवून देण्याबाबत संमती दिली. त्यामुळे रात्री रेल्वेस्थानकावरच या महिलेने आपल्या मुलांसह मुक्काम केला. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सकाळी आरक्षणाचे तिकीट काढून रेल्वे चाईल्ड लाईनच्या चमूने या महिलेला जाण्याची व्यवस्था केली. महिला आणि तिच्या मुलांसाठी नाश्ता, भोजन मागविले. त्यानंतर रविवारी ०२८०९ हावडा मेलने या महिलेला बिलासपूरला जाण्यासाठी बसवून दिले. यावेळी रेल्वे चाईल्ड लाईनच्या समन्वयिका अंजली शेरेकर, दीपाली धमगाये, रणजित कुंभारे उपस्थित होते. कठीण प्रसंगात मिळालेली मदत पाहून निरोप घेताना या महिलेचे डोळे पाणावले होते.मुलांच्या खाऊची अन् मनोरंजनाची व्यवस्थादरम्यान, या महिला व तिच्या तीन मुलांना मास्क, चप्पल, कपडे, हायजिन किट आणि प्रवासादरम्यान भोजनाची व्यवस्था करण्यात आली. प्रवासात या कामगार महिलेच्या मुलांना कंटाळा येऊ नये यासाठी त्यांना चित्रकलेची वही, रंग, चॉकलेट, बिस्कीट देण्यात आले. चित्रकलेची वही, रंग आणि खाऊ मिळताच त्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर