शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

बुद्ध धम्मामुळेच समाजामध्ये अद्भूत परिवर्तन : विमल थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:05 IST

बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला नसता तर आजही आपण ज्ञानाच्या प्रकाशाशी जुळलो नसतो व त्याच अंधकारात, कर्मकांडात खितपत राहिलो असतो. मात्र बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे दलित, पीडित व वंचित समाजाला नवे जीवन मिळाले आहे. माणसाला मानूस माणणारे बुद्धाचे विचार चेतना देणारे आहेत. बुद्धामुळेच प्रत्येकाच्या आयुष्यात, समाजात अद्भूत असे परिवर्तन आले आहे, असे मनोगत ईग्नूच्या प्रा. विमल थोरात यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपाच दिवसीय बुद्ध महोत्सवाचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला नसता तर आजही आपण ज्ञानाच्या प्रकाशाशी जुळलो नसतो व त्याच अंधकारात, कर्मकांडात खितपत राहिलो असतो. मात्र बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे दलित, पीडित व वंचित समाजाला नवे जीवन मिळाले आहे. माणसाला मानूस माणणारे बुद्धाचे विचार चेतना देणारे आहेत. बुद्धामुळेच प्रत्येकाच्या आयुष्यात, समाजात अद्भूत असे परिवर्तन आले आहे, असे मनोगत ईग्नूच्या प्रा. विमल थोरात यांनी व्यक्त केले.नागपूर बुद्धिस्ट सेंटरच्यावतीने तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने नववा बुद्ध महोत्सव बुधवारी सुरू झाला. दमक्षेसां केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर यांच्याहस्ते बुद्ध महोत्सवाचे व याअंतर्गत प्रा. विमल थोरात यांच्याहस्ते कलादालनाचे तसेच चित्रपट दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांच्याहस्ते बुद्ध फिल्म महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रा. थोरात बोलत होत्या. याप्रसंगी शहर पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, स्मारक समितीचे विलास गजघाटे व एन.आर. सुटे, आयोजन समितीचे समन्वयक डॉ. सुनील तलवारे, डॉ. त्रिलोक हजारे, अजय ढोक, एसबीआयच्या वीणा अर्जुने, दमक्षेसां केंद्राचे उपसंचालक पारखी, आभा बोरकर, भावना सोनवाने, अमनकुमार बागडे आदी उपस्थित होते.प्रा. थोरात पुढे म्हणाल्या, आजही समाजातील मोठा वर्ग प्रगतीपासून मागे राहिला आहे तो सरकारच्या धोरणामुळे. दलित समाज प्रगती करू नये, असाच प्रयत्न सरकारतर्फे केला जातो. देशात सध्या अस्वस्थ व हिंसात्मक परिस्थित निर्माण केली गेली आहे. हे वातावरण संपविण्यासाठी बुद्धाच्या विचारांशिवाय पर्याय नाही. जगातील अनेक देशांमध्ये बुद्धाचे मूल्य स्वीकारले जात असून त्यांची शिक्षा आचरणात आणली जात आहे. आपणही हे तत्त्वज्ञान आचरणात आणून शोषणाच्या व्यवस्था तोडण्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी डिसीपी नीलेश भरणे यांनी विचार मांडताना, जगात सर्व लोक अनेक धर्माने आचरण करतात. जे चांगले आहे ते टिकून राहते हा निसर्गाचा नियम आहे. बौद्ध धम्मात कुणी सांगितले, परंपरेने चालत आले म्हणून मान्य करा, असे नाही. बुद्धाने कधीही मी सांगतो म्हणून मान्य करा असे म्हटले नाही. तुम्ही माझे विचार समजले, पटले व जीवनात आवडले तर स्वीकारा असाच त्यांचा आग्रह होता. त्यामुळे बुद्ध समजला की प्रेरणेसाठी इतर कुठल्याच गोष्टीची गरज उरत नाही.त्यामुळे जगही आज त्यांच्याकडे झुकत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. दीपक खिरवडकर यांनी सत्य, अहिंसा, शांतीचा संदेश गौतम बुद्धाने दिल्याचे सांगत या महोत्सवातील कलेच्या माध्यमातून त्यांचे विचार अधिक प्रकटतेने समोर येतील, असे मनोगत व्यक्त केले. यावेळी संचिता सोनवाने या ११ वीच्या विद्यार्थिनीने लिहलेल्या ‘बुद्धिस्ट पिलग्रीमेज थ्रु आईज ऑफ टिनेज’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.३०० विद्यार्थ्यांनी सादर केले मैत्री गीतसांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीस ३०० पेक्षा अधिक शाळकरी मुलांनी मैत्रीगीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मृणाल थुलकर या विद्यार्थिनीने बुद्ध पुजेवर भरतनाट्यम नृत्याचे मनोरम सादरीकरण केले. माडर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांद्वारे झंकार बॅन्डने पहिल्या दिवशीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा शेवट झाला. कार्यक्रमाचे संचालन सरला वाघमारे व प्रास्ताविक प्रिया नील यांनी केले. वंदना मांडवकर यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर